शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

विसर्जनावर पावसाचे सावट

By admin | Updated: September 9, 2014 00:09 IST

दहा दिवसांच्या अस्सीम भक्तीनंतर सोमवारला गमपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू

भाविकांमध्ये उत्साह कायम : ढोलताशे, आतषबाजी नाहीभंडारा : दहा दिवसांच्या अस्सीम भक्तीनंतर सोमवारला गमपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाप्पाच्या विसर्जनावर पावसाचे सावट जाणवत होते. असे असले तरी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील तीन तलावांसह वैनगंगा नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्येही मोठ्या भक्तीभावात लाडक्या गणरायांचे विसर्जन झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशोत्सवात जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. प्रश्नमंजुषा, रक्तदान शिबिर, नृत्य, गायन, मनोरंजनात्मक खेळ आदी स्पर्धांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात लहाणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी हिरीरीने भाग घेतला. भंडारा जिल्ह्यात यावर्षी ५२३ ठिकाणी सार्वजनिक गणरायांची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. तसेच १२२ ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. यासाठी जिल्हाभरात ४०० पेक्षा जास्त पोलीस व होमगार्ड सैनिकांचा ताफा सुरक्षा व्यवस्थेत लावण्यात आला होता. दरम्यान गणरायांचे विसर्जन दि.१२ सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. यात भंडाराचा राजा १० सप्टेंबर रोजी तर गणेशपूरच्या राजाचे १२ सप्टेंबर रोजी विसर्जीत करण्यात येणार आहे.दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच घरगुती गणरायांच्या विसर्जनाला प्रारंभ झाल्याचे दिसले. पावसाची हजेरी दिवसभर असल्याने गणरायांच्या विसर्जनावर त्याचे सावट स्पष्ट झळकले. पावसामुळे फटाक्यांची आतषबाजी झालीच नाही. ढोलताशांचा गजरही कमी प्रमाणात ऐकू आला. (प्रतिनिधी)