शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कोरड्या दुष्काळाने होरपळले शेतकरी

By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST

मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला.

शेतकऱ्यांवर संकट : लोकप्रतिनिधींची चुप्पी संतापजनकयुवराज गोमासे - करडी (पालोरा)मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. रिसाळा मायरनरचे पाणी न मिळाल्याने करडी शेतशिवारात तर स्थिती भयावह आहे. हजारो एकर शेतात दुष्काळाच्या भेगाच दृष्टीस पडत आहेत. करडी परिसरातील शेती जुगार ठरली आहे. बिनभरवशाच्या पावसावर येथील शेती कसली जात आहे. कधी ओल्या तर बऱ्याचवेळा कोरड्या दुष्काळाचा भार येथील शेतकरी भोगत असतो. नशिबाचा भोग मानणाऱ्यांचे दु:ख समजू शकतो. मात्र मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे दु:ख पचवायला त्रास होत आहे. संपूर्ण करडी परिसर वैनगंगा नदीच्या पूर्वेकडे कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेला आहे. मात्र निसर्गाची अवकृपाच सदैव येथे पाहावयास मिळते. खोरा सुपिक जमिनीचा पोत असलेला असला तरी येथील विहिरींमध्ये पाण्याची मात्रा कमजोर आहे. लहान मोठे तलाव मोठ्या प्रमाणात असले तरी पाणी साठविण्याची क्षमता अगदी नगण्य आहे. तलाव उपसा करून पुनर्जीवन व खोलीकरण करण्यासंबंधीची मागणी अनेकदा होत असली तरी शासन प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेती व जंगलावर आधारित व्यवसाय परिसरातील लोकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा अभयारण्याने संपूर्ण जंगल ताब्यात घेतले. जंगलात जाण्याची मनाई असल्याने लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. नुकसानीचे सर्व्हेक्षण व मदत मिळाली पाहिजेकरडी परिसरात कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे, शेतीचे कंबरडे मोडले आहे. रिसाळा मायनरचे पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोहचले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाची, गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. परिसरातील सिंचनासाठी तलावाचे यांत्रीकी पद्धतीने खोलीकरण करून धापेवाडा उपसा सिंचन योजना तसेच सुरेवाडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सिंचनाचे जाळे परिसरात शासन व प्रशासनाने निर्माण करावे. कोरड्या दुष्काळाचे सर्व्हेक्षण करून तात्काळ मदत देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश इलमे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण करडी परिसरावर दुष्काळाचे डोंगर उभे झाले आहे. मेहनतीने कसलेली शेती कवडीमोल ठरली. पोळ्याच्या सणानंतर पाऊस न पडल्याने हलका धान कमजोर पडला. भारी धान तर उभा वाळला. ऐकेकाळी शेतकऱ्यांच्या ५ ते १० एकर शेतात बिजाईला सुद्धा धान जमिनीतून कोठारात आले नाही. जमिनीला भेगा पडल्या तशा शेतकऱ्यांच्या काळजाला सुद्धा चरा पडल्या. होत्याचे नव्हते झाले. धान पेरणी, रोवणी व कापणीचा खर्चाबरोचर खत व इंजीनने पाणी दिलेला खर्चही बोकांड्यावर बसला. उत्पन्न होण्याऐवजी कर्जाचा डोंगर माथ्यावर उभा झाला.