शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाने होरपळले शेतकरी

By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST

मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला.

शेतकऱ्यांवर संकट : लोकप्रतिनिधींची चुप्पी संतापजनकयुवराज गोमासे - करडी (पालोरा)मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. रिसाळा मायरनरचे पाणी न मिळाल्याने करडी शेतशिवारात तर स्थिती भयावह आहे. हजारो एकर शेतात दुष्काळाच्या भेगाच दृष्टीस पडत आहेत. करडी परिसरातील शेती जुगार ठरली आहे. बिनभरवशाच्या पावसावर येथील शेती कसली जात आहे. कधी ओल्या तर बऱ्याचवेळा कोरड्या दुष्काळाचा भार येथील शेतकरी भोगत असतो. नशिबाचा भोग मानणाऱ्यांचे दु:ख समजू शकतो. मात्र मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे दु:ख पचवायला त्रास होत आहे. संपूर्ण करडी परिसर वैनगंगा नदीच्या पूर्वेकडे कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेला आहे. मात्र निसर्गाची अवकृपाच सदैव येथे पाहावयास मिळते. खोरा सुपिक जमिनीचा पोत असलेला असला तरी येथील विहिरींमध्ये पाण्याची मात्रा कमजोर आहे. लहान मोठे तलाव मोठ्या प्रमाणात असले तरी पाणी साठविण्याची क्षमता अगदी नगण्य आहे. तलाव उपसा करून पुनर्जीवन व खोलीकरण करण्यासंबंधीची मागणी अनेकदा होत असली तरी शासन प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेती व जंगलावर आधारित व्यवसाय परिसरातील लोकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा अभयारण्याने संपूर्ण जंगल ताब्यात घेतले. जंगलात जाण्याची मनाई असल्याने लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. नुकसानीचे सर्व्हेक्षण व मदत मिळाली पाहिजेकरडी परिसरात कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे, शेतीचे कंबरडे मोडले आहे. रिसाळा मायनरचे पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोहचले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाची, गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. परिसरातील सिंचनासाठी तलावाचे यांत्रीकी पद्धतीने खोलीकरण करून धापेवाडा उपसा सिंचन योजना तसेच सुरेवाडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सिंचनाचे जाळे परिसरात शासन व प्रशासनाने निर्माण करावे. कोरड्या दुष्काळाचे सर्व्हेक्षण करून तात्काळ मदत देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश इलमे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण करडी परिसरावर दुष्काळाचे डोंगर उभे झाले आहे. मेहनतीने कसलेली शेती कवडीमोल ठरली. पोळ्याच्या सणानंतर पाऊस न पडल्याने हलका धान कमजोर पडला. भारी धान तर उभा वाळला. ऐकेकाळी शेतकऱ्यांच्या ५ ते १० एकर शेतात बिजाईला सुद्धा धान जमिनीतून कोठारात आले नाही. जमिनीला भेगा पडल्या तशा शेतकऱ्यांच्या काळजाला सुद्धा चरा पडल्या. होत्याचे नव्हते झाले. धान पेरणी, रोवणी व कापणीचा खर्चाबरोचर खत व इंजीनने पाणी दिलेला खर्चही बोकांड्यावर बसला. उत्पन्न होण्याऐवजी कर्जाचा डोंगर माथ्यावर उभा झाला.