शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोरड्या दुष्काळाने होरपळले शेतकरी

By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST

मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला.

शेतकऱ्यांवर संकट : लोकप्रतिनिधींची चुप्पी संतापजनकयुवराज गोमासे - करडी (पालोरा)मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. रिसाळा मायरनरचे पाणी न मिळाल्याने करडी शेतशिवारात तर स्थिती भयावह आहे. हजारो एकर शेतात दुष्काळाच्या भेगाच दृष्टीस पडत आहेत. करडी परिसरातील शेती जुगार ठरली आहे. बिनभरवशाच्या पावसावर येथील शेती कसली जात आहे. कधी ओल्या तर बऱ्याचवेळा कोरड्या दुष्काळाचा भार येथील शेतकरी भोगत असतो. नशिबाचा भोग मानणाऱ्यांचे दु:ख समजू शकतो. मात्र मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे दु:ख पचवायला त्रास होत आहे. संपूर्ण करडी परिसर वैनगंगा नदीच्या पूर्वेकडे कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेला आहे. मात्र निसर्गाची अवकृपाच सदैव येथे पाहावयास मिळते. खोरा सुपिक जमिनीचा पोत असलेला असला तरी येथील विहिरींमध्ये पाण्याची मात्रा कमजोर आहे. लहान मोठे तलाव मोठ्या प्रमाणात असले तरी पाणी साठविण्याची क्षमता अगदी नगण्य आहे. तलाव उपसा करून पुनर्जीवन व खोलीकरण करण्यासंबंधीची मागणी अनेकदा होत असली तरी शासन प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेती व जंगलावर आधारित व्यवसाय परिसरातील लोकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा अभयारण्याने संपूर्ण जंगल ताब्यात घेतले. जंगलात जाण्याची मनाई असल्याने लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. नुकसानीचे सर्व्हेक्षण व मदत मिळाली पाहिजेकरडी परिसरात कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे, शेतीचे कंबरडे मोडले आहे. रिसाळा मायनरचे पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोहचले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाची, गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. परिसरातील सिंचनासाठी तलावाचे यांत्रीकी पद्धतीने खोलीकरण करून धापेवाडा उपसा सिंचन योजना तसेच सुरेवाडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सिंचनाचे जाळे परिसरात शासन व प्रशासनाने निर्माण करावे. कोरड्या दुष्काळाचे सर्व्हेक्षण करून तात्काळ मदत देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश इलमे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण करडी परिसरावर दुष्काळाचे डोंगर उभे झाले आहे. मेहनतीने कसलेली शेती कवडीमोल ठरली. पोळ्याच्या सणानंतर पाऊस न पडल्याने हलका धान कमजोर पडला. भारी धान तर उभा वाळला. ऐकेकाळी शेतकऱ्यांच्या ५ ते १० एकर शेतात बिजाईला सुद्धा धान जमिनीतून कोठारात आले नाही. जमिनीला भेगा पडल्या तशा शेतकऱ्यांच्या काळजाला सुद्धा चरा पडल्या. होत्याचे नव्हते झाले. धान पेरणी, रोवणी व कापणीचा खर्चाबरोचर खत व इंजीनने पाणी दिलेला खर्चही बोकांड्यावर बसला. उत्पन्न होण्याऐवजी कर्जाचा डोंगर माथ्यावर उभा झाला.