शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गोसेखुर्द प्रकल्प परिसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 1, 2016 00:14 IST

महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल ....

तीन वर्षांपासून पावसाचा फटका : समस्या कायमप्रकाश हातेल  चिचाळमहाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल असे भाकीत अनेक नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करुन गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतू तिन चार वर्षापासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील गोसे, चिचाळ, पाथरी, सौंदळ, आकोट, वासेळा आदी गावात दुष्काळदृष्य परिस्थिती निर्माण होवून शेतकऱ्यांच्या पिकांची अपरिमित हानी झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विचार व्यक्त केले.गोसे खुर्द प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून जल साठवणीला चार वर्षापासून प्रारंभ झाला. त्याचा फायदा गोसे खुर्द प्रकल्पाच्या २५ किलोमिटर अंतरावरील शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून शेतकऱ्यांची उन्नती झाली आहे. पण गोसे खुर्द प्रकल्पाला लागून असलेल्या १० किमी परिसरात तिन ते चार वर्षापासून सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती पिकत नाही. २०१४ मध्ये गोसे, चिचाळ येथे योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे तसेच राहुन रोवणी होवू शकली नाही.गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवणे सुरु झाले. आणि या परिसरातील समस्यांना सुरुवात झालेली आहे. वैनगंगा नदीला नागपूरचे नागनदीचे अतिशय घाणरडे पाणी येवून मिळत असल्याने प्रकल्पातील पाणी दुषीत झाले असुन दुर्गंधी युक्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. यामुळे भविष्यात अनेक रोगांना सामोरे जावे लागु शकते. तरी यावर संबंधितांनी कोणती तरी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.सदर प्रकरणी काही भूगोल तज्ञाशी चर्चा केली असता धरण क्षेत्रात बाष्पीभवन होत असल्याने दमट वातावरण निर्माण होवून त्या भागात ढग निर्माण होतात. परंतु हे ढग दुसरीकडे वाऱ्यामार्फत वाहुन नेले जातात. त्यामुळे सदर परिसरात अत्यअल्प पाऊस पडून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. मात्र याचा फटका गेल्या चार वर्षापासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील लोकांना बसत आहे. सदर परिसरातील समस्या क्षेत्रातील पुढाऱ्यांनी शासन दरबारी मांडून शासनाच्या लक्षात आणून दयावे अशी मागणी गोसे खुर्द परिसरातील जनतेनी केली आहे. याकडे शासन प्रशासन गांर्भियाने लक्ष देणार काय? असा सवाल आहे.