शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

जिल्हा परिषद शाळांची अशीही कुरघोडी

By admin | Updated: July 28, 2016 00:30 IST

इंग्रजी माध्यम शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असल्याची ओेरड सुरु आहे.

आदेशाला केराची टोपली : अन्य शाळा असल्यावरही ५ वीचे वर्ग सुरुवरठी : इंग्रजी माध्यम शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असल्याची ओेरड सुरु आहे. पण जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा ऐकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार निर्देशनास येत आहेत. एकाच गावात असलेल्या प्राथमिक शाळांनी इयत्ता ५ वा वर्ग सुरु केल्यामुळे इतर शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यम पूर्वप्राथमिक केंद्र सुरु केल्यामुळे अंगणवाडी केंद्रात घट झाली आहे. जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने यात लक्ष दिले नाही तर जिल्हा परिषद शाळा बंद होण्यास जि.प. शाळाच कारणीभूत ठरणार यात शंका नाही.शिक्षणाचा कायदा २००९ अंतर्गत शासनाने प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा वर्ग संख्या वाढविली. नव्या धोरणानुसार प्राथमिक म्हणजे इयत्ता १ ते ५, उच्च प्राथमिक इयत्ता ६ ते ८ व माध्यमिक इयत्ता ९ ते १० असे करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या शाळा पूर्वीच्या धोरणानुसार प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ते ४ पर्यंतचे व उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ते ७ पर्यंतचे वर्ग सुरु होते, अशा ठिकाणी इयत्ता ५ व ८ चे वर्ग सुरु करण्याचे शासनाने ठरविले. राज्यात नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रस्ताव मागितले होते. विविध तालुक्यातील शाळांचे प्रस्ताव आले. मोहाडी तालुक्यातून इयत्ता ५ वी करिता १६ व ८ वी करिता २ प्रस्ताव प्राप्त झाले. ९ जून रोजी शिक्षण व क्रीडा विषय समितीच्या सभेत मोहाडी तालुक्यातील मुंढरी, सिहोरा, टाकला, काटेबाम्हणी, सालेबर्डी, देऊळगाव या ठिकाणी इयत्ता ५ वी व टांगा व धोप या ठिकाणी इयत्ता ८ वी करीता मंजूरी प्रदान करण्यात आली. वरठी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ यांना मंजुरी नाकारण्यात आली होती. प्रस्ताव मंजुरीकरिता एका शाळेपासून दुसऱ्या शाळेचे अंतर कमी असून जिल्हा परिषदेची जि.प. हायस्कुल शाळेत इयत्ता ५ ते १२ पर्यंत वर्ग असल्यामुळे मंजुरी नाकारण्यात आली. पण या शाळांना शिक्षण समितीचा अहवाल वेळेवर पोहचविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी दिरंगाई केल्यामुळे शाळेत इयत्ता ५ वा वर्ग सुरु करण्यात आले. प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वा वर्ग सुरु केल्यामुळे स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुलचे वर्ग बंद होण्याच्या स्थितीत आले आहे. साकोली, लाखनी व पवनी येथे नव्याने ५ वा वर्ग सुरु करण्याची आवश्यकता नसल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.ज्या ठिकाणी १ ली ते ४ थी पर्यंत शाळा आहे, व १ कि.मी. परिसरात ५ वी करीता त्याच माध्यमाची शाळा असल्यास अन्य शाळामध्ये ५ वी वर्ग देण्यात येवू नये आणि ३ कि.मी. परिसरात ८ वी ला वर्ग उपलब्ध असल्यास त्यांनाही मंजुरी देण्यात येवू नये याबाबत शिक्षण उपसंचालकांनी दि. ७ जुलैच्या पत्रात स्पष्ट सूचना दिली आहे. त्या आदेशाला शाळांनी केराची टोपली दाखवून वर्ग सुरु केल्यामुळे सुरु असलेल्या इतर शाळा अवसायानात निघाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा एकमेकांवर कुरघोडी करीत असल्याचे दृश्य आहे. (वार्ताहर) नियमाचा घोळ कायमप्राथमिक वर्गाचा स्तरात बदल केल्यानंतर शासनाने इतर शाळेत सुरु असलेला ५ किंवा ८ वा वर्ग बंद करावयास पाहिजे होता. आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी जिल्ह्यांचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी प्रस्ताव मागायला हवे होते. नियमाचा घोळ केल्याने अधिकाऱ्यांचा अज्ञान कारणीभूत ठरले. कारवाई झाल्यास नाहक शिक्षकाचा बळी जाईल. अंगणवाडी केंद्रात घटजिल्हा परिषद शाळा चालविणे आणि नोकरी टिकविणे शिक्षकांसाठी कसरत आहे. जिल्ह्यात काही प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमाचे पूर्व प्राथमिक केंद्र सुरु करण्यात आले. गावात या प्रकारचे वर्ग सुरु झाल्यामुळे अंगणवाडीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. अंगणवाडीत होणारे सर्व पोषण आहार, वैद्यकीय तपासणी, कुपोषण यावर प्रभाव पाडून शेकडो अंगणवाडी सेविकांवर भविष्यात उपासमार होणार यात शंका नाही.