शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम वर्षभराचा !

By admin | Updated: June 26, 2016 00:19 IST

प्रशासकीय बदलीचा कार्यकाळ साधारणत तीन वर्षांचा असतो. परंतु मागील १० वर्षांच्या कार्यकाळात भंडाऱ्यात सात जिल्हाधिकारी आले.

प्रशासकीय बदलीचा कार्यकाळ साधारणत तीन वर्षांचा असतो. परंतु मागील १० वर्षांच्या कार्यकाळात भंडाऱ्यात सात जिल्हाधिकारी आले. काही वर्षभर राहिले, काही दोन वर्ष राहिले तर काहींना वर्ष संपण्यापूर्वीच जावे लागले. २००६ ते २०१६ या दहा वर्षांच्या कालावधीत तीन वर्षांचा कार्यकाळ गृहित धरले तर तीन-चार अधिकारी येतील व जातील. परंतु भंडाऱ्यात या दहा वर्षाच्या काळात सात जिल्हाधिकारी आले आणि गेले. आता आठवे जिल्हाधिकारी लवकरच रूजू होतील. ते पूर्ण कार्यकाळ राहावे, ही अपेक्षा. २००६ मध्ये इंद्रमालो जैन आल्या. त्या १० महिनेच राहिल्या. त्यानंतर संभाजीराव सरकुंडे २ वर्षे, अंशु सिन्हा ११ महिने, प्रदीप काळभोर २ वर्षे, सच्चिंद्र प्रताप सिंह १ वर्षे, माधवी खोडे २१ महिने, धीरजकुमार ११ महिने असा त्यांचा कार्यकाळ राहिला. परंतु भंडाऱ्यातून कार्यकाळ संपण्यापूर्वीच जिल्हाधिकारी वारंवार का बदलतात, हा सर्वसामान्यांचा प्रश्न लोकप्रतिनिधींवर ठपका ठेवणारा आहे. राजकीय चढाओढीतून जिल्हाधिकारी आपल्या हाताचा बाहुला राहावा, अशी आमदार-खासदारांची सुप्त इच्छा असते. ही सुप्त इच्छा ज्यांना सांभाळता आली त्यांना कार्यकाळाच्या जवळपास पोहोचता आले. ज्यांना तसे जमले नाही त्यांना लवकरच अन्यत्र जावे लागले. जनतेची कामे ही लहानशी असली तरी जनतेतून निवडून आल्यामुळे लोकप्रतिनिधींवर दैनंदिन कामाचा ताण असतो. हा ताण कमी करावयाचा असेल तर जनतेच्या अधिकाधिक समस्या सुटाव्यात यासाठी लोकाभिमुख प्रशासन सांभाळणारा कर्तव्यदक्ष अधिकारी आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ताकद खर्ची घातली पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. आपण जिथे जाऊ तिथे आपल्यामागे गराडा घालणारे, लांगुलचालन करणारे माणसे असावीत, असे लोकप्रतिनिधींना कायम वाटत असते. अशातच अधिकारी लोकाभिमुख झाला तर आपल्याकडे कोण येईल? अशी भीती वाटू लागते. आपल्यापेक्षा जिल्हाधिकारीच वर्तमानपत्रात अधिक चमकतात, या गैरसमजातून सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्यासारख्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली होते. जैन, सरकुंडे, सिन्हा, काळभोर, खोडे, धीरजकुमार गेले त्याचे कुणालाही वाईट वाटले नाही, तसे वाटण्याचे कारणही नव्हते. कारण त्यांना लोकाभिमुख होता आले नाही. परंतु शेतकीर, सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्यासाठी काम करणारे सच्चिंद्र सिंहांचे स्थानांतरण झाल्यानंतर उपोषण, मोर्चे, रास्ता रोको आणि निवेदनांचा पाऊस पडला, याचा अर्थ हा अधिकारी लोकाभिमुख होता, असेच म्हणावे लागेल. अलिकडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना मी पाठिशी आहे, असे सांगून एका लोकप्रतिनिधीने काही अनियमित कामे नियमात बसवून करून घेतली. त्यानंतर न होणारी कामेही ते नियमात बसवून करू शकतात, असा समज पक्का होताच जिल्हाधिकारी त्यांच्या चक्रव्युहात अडकले. त्यानंतर काय? त्या लोकप्रतिनिधींची कोणतीही फाईल टेबलवर आली तर दुसऱ्यांची कामे बाजुला सारून त्यांना प्राधान्यक्रम दिला जायचा. जिल्ह्यात आजघडीला एकाच पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत. परंतु अंतर्गत कलहामुळे त्याच्यापेक्षा मी मोठा? तो लहान? यातून अधिकारी बदलविण्याचे प्रकार सुरू झाले. हा प्रकार या शासन काळातच घडत आहे, अशातला भाग नाही, यापूर्वीही असे घडायचे? जुनाच कित्ता आताही गिरविला जात आहे. त्यातूनच धीरजकुमार, सच्चिंद्र प्रताप सिंह यांना वर्षभरातच दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके व जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा वाद गाजला होता. त्याचवेळी दोघांचीही बदली होईल, अशी चर्चा होती. या वादाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. त्यात काही लोकप्रतिनिधीच्या दबावात झळकेंना सहा महिन्यातच जिल्ह्यातून जावे लागले. आता सहा महिन्यानंतर धीरजकुमार यांचा राजकीय गेम करण्यात आला.