शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

संक्रमक विषाणूंमुळे वाढताहेत आजार

By admin | Updated: September 2, 2014 23:31 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

भंडारा : बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू विषाणुंच्या संक्रमणाने होत असल्याचे दिसते. डास, पाणी, अन्नातूनही प्रसारभारतात होणाऱ्या संक्रामक आजारांमध्ये ९0 टक्के लोकांना अँन्टीबायोटिक्सची गरज नसते. मात्र, गोळ्या घेतल्याशिवाय बरे वाटत नसल्याची मानसिकता निर्माण झाल्याने आपण जबरदस्तीने औषधांचे सेवन करीत राहतो. आजारी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होणाऱ्या संक्रमणाच्या या क्रियेत अनेकदा सूक्ष्म जीवांचा प्रसार जलदगतीने आणि थेट होतो. कधी-कधी थेट संक्रमण न होता डास, पाणी, अन्न यामाध्यमातूनही प्रसार होतो. याचा वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. जिवाणूंचे संक्रमण झाल्याचे लक्षात येताच डॉक्टारांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. औषधांचा अयोग्य वापरशारीरिक किंवा मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी सवर्सामान्यपणे औषधांचा वापर केला जातो. औषधांमुळे जसा रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे अनेक नवीन आजार उदभवण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक औषधेसंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात. लस किंवा प्रतिसिरम यापैकी काही औषधे, खासकरुन पोलिओची लस, अन्य प्रभावी औषधी नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लसींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जिवाणू अर्धवट किंवा मृतावस्थेत असतात. लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लसीमुळे, विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशाप्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यासाठी शरीराला प्रतिक्षम बनवते. पटकी, घटसर्प, यकृत, शोथ (कावीळ), गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध असून लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे. मधुमेहासारखे विकारसंक्रमण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता असते. काही औषधीच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती घटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोषणाची स्थिती, मधुमेहासारखे विकार यांसारखे अनेक घटक रोगनिमिर्तीवर बरेवाईट प्रभाव पाडू शकतात. प्रभावी औषधोपचार घेत आहे अथवा नाही आणि इतरांना संसर्ग टाळावा म्हणून आपल्या परीने किती काळजी घेत आहे यांवरही संसर्गातून पसरणाऱ्या जीवांचे प्रमाण अवलंबून असते.