शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धान उत्पादकांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाईपासून परिसरातील अनेक शेतकरी वंचित असून अद्याप पर्यंत शेतकऱ्याना ती मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

आमगाव/दिघोरी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धान उत्पादकांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाईपासून परिसरातील अनेक शेतकरी वंचित असून अद्याप पर्यंत शेतकऱ्याना ती मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे धानपिके पाण्याखाली सडले होते. अनेकांची शेती पडित राहली होती. यामुळे शासनाने प्रति हेक्टर ७५०० रूपये नुकसान भरपाई जाहिर केली होती. त्यानुसार ही भरपाई प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार होती. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तलाठ्याकडे जमा केली. मात्र अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम अजूनपर्यं जमा झाली नाही.अनेकांनी याबाबत तलाठी कार्यालयामध्ये चकरा मारल्या मात्र तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची माहिती पाठविली आहे. खात्यामध्ये ती भरपाई जमा होणार, असे सांगून शेतकऱ्याला परत पाठविल्या जाते. शेतकरी बँकेमध्ये पैसे जमा झाले का हे पाहण्यासाठी जातात मात्र नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे बँकेकडून सांगितल्यावर शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे. आमगाव येथील रामाजी शिंगनजुडे या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अजूनपर्यंत जमा झाली नाही. असे कित्येक शेतकरी गावामध्ये असल्याचे समजते. शासनाने घोषणा करून वर्ष लोटला मात्र भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे.(वार्ताहर)