शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मग्रारोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: May 10, 2014 00:17 IST

केंद्र व महाराष्ट्र राज्य पुरस्कृत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा दूरदर्शन, रेडीओ, वर्तमानपत्रे, पोस्टर्स आदी विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसार व प्रचार करण्यासाठी ..

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र राज्य पुरस्कृत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा दूरदर्शन, रेडीओ, वर्तमानपत्रे, पोस्टर्स आदी विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसार व प्रचार करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येतात. परंतु शासनाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता कुठलेही ठोस प्रयत्न होत नसल्याने मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी मजुरांचे परराज्यात पलायन होत आहे.भंडारा तालुक्यातील खुटसावरी, माडगी, धारगाव, राजेगाव आदी गावांतील मजुरीसाठी दुष्काळी परिस्थिती असूनही कामाविना ते वंचित आहेत. पर्यायाने त्यांच्याजवळ उदरनिर्वाह करण्याकरिता पुरेसा पैसा नाही. मोठय़ा प्रमाणात गाजावाजा करण्यात आलेली ही योजना धारगाव परिसरातील मजुरांसाठी वेदनादायी ठरली आहे. धारगाव परिसरात सिंचनाची सोय नसल्याने मोठय़ा प्रमाणात खरीप हंगामात हलक्या प्रतिच्या खरीप हंगामात हलक्या प्रतिच्या धानाची लागवड केली जाते.ग्रामीण भागातील शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर मजुरांच्या रिकाम्या हातांना काम मिळणे कठीण झाले आहे. मजुरांना काम मिळावे, मजुरांचे आर्थिक उत्थान व्हावे, श्रमाची प्रतिष्ठा वाढावी, सदर कामाअंतर्गत शेततळे, वनतळे, बोडी, नाला, तलाव, खोलीकरण, कालव्याचे नूतनीकरण, भूमिगत बंधारे, मातीचे धरण आदी कामे व्हावीत, त्याद्वारे, शेतीला सिंचन व्हावे या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे त्यांचा आर्थिक सुबता नांदावी, शेतात जाण्याकरिता पांदण रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी व पाणी पुरवठा योजनासंबंधी रस्ते गावातील अंतर्गत रस्ते गाव रस्ते आदी विविध रस्त्यांच्या माध्यमातून लोकांची सोय व्हावीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती केली.मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी मग्रारोहयो अस्तित्वात आली. अकुशल कामगाराने काम मागीतल्यास १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक असून न दिल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतुद कायद्यात आहे तसेच १५ दिवसांच्या आत केलेल्या कामाची मजुरी बँकेमार्फत देण्यात यावी, अशीही तरतूद आहे. ५0 टक्के कामे शासकीय यंत्रनेकडून व ५0 टक्के कामे जिल्हा परिषदेकडून करावयाची आहेत. भंडारा तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश खेड्यातील ६0 टक्के युवक नोकरी मिळेल या आशेने शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. (नगर प्रतिनिधी)