शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

धरणाची नऊ वक्रद्वारे उघडली

By admin | Updated: July 4, 2016 00:20 IST

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे.

प्रकाश हातेल  चिचाळजिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. दूषित पाणी वाहून जाण्यात मदत मिळत आहे. दरम्यान प्रकल्पावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरवर आहे. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून गेल्या चार वर्षापासून जलसाठवणूकीला प्रांरभ झाला आहे. मात्र प्रकल्पाचा डावा कालवा व उजवा कालव्याचे काम संथ गतीने चालू असून बांधकामात निकृष्ठ दर्जाचे झाल्याने कालव्याचे बांधकाम तोडून नव्याने कामे सुरु असून त्या प्रकल्पातील जलसाठ्याचा मात्र कालव्याच्या कंत्राटदाराच्या निकृष्ठ बांधकामाचा प्रकल्प पुर्ण होवूनही पाणी साठवून नदीला सोडावे लागत आहे.पूर्व विदर्भातील भंडारा चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गोसे खुर्द प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ ला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असून प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रफळ ३४८६२ वर्ग किलोमीटर सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३२०.८० मिली लिटर, २२२५८ हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे. सांडव्याची लांबी ९०४ मीटर सांडव्याची वक्रद्वारे ३३ नग, १८.३ मीटर बाय १६.५० मीटर महाराष्ट्रातील सर्वात मोठे वक्रद्वारे आहेत. एका वक्रद्वाराचे वजन २५० मेट्रीक टन, सांडवा विसर्ग क्षमता ६७३०० घनमीटर प्रती सेकंद, धरणाची एकूण साठवण क्षमता ११४६ दशलक्ष घन मीटर, जिवीत साठा ७४० दशलक्ष घनमीटर मृतसाठा ४०६ दशलक्ष घनमीटर आहे.प्रकल्पाला डाव व उजवा उसे दोन कालवे असून डावा कालव्याची लांबी २३ किलोमीटर विसर्ग ४५ घनमीटर/ सेकंद, उजवा कालवा लांबी १०७ किलोमीटर विसर्ग ११३ घनमीटर/ सेकंद आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने व प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असले तरी डावा कालवा व उजवा कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाने कालव्याचे बांधकाम तोडून पुन्हा बांधकाम कासवगतीने सुरु आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यास विलंब होत आहे. राजकीय, सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना निवेदने देवून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कालव्यावर व प्रकल्पावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित.