शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

धरणाची नऊ वक्रद्वारे उघडली

By admin | Updated: July 4, 2016 00:20 IST

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे.

प्रकाश हातेल  चिचाळजिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. दूषित पाणी वाहून जाण्यात मदत मिळत आहे. दरम्यान प्रकल्पावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरवर आहे. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून गेल्या चार वर्षापासून जलसाठवणूकीला प्रांरभ झाला आहे. मात्र प्रकल्पाचा डावा कालवा व उजवा कालव्याचे काम संथ गतीने चालू असून बांधकामात निकृष्ठ दर्जाचे झाल्याने कालव्याचे बांधकाम तोडून नव्याने कामे सुरु असून त्या प्रकल्पातील जलसाठ्याचा मात्र कालव्याच्या कंत्राटदाराच्या निकृष्ठ बांधकामाचा प्रकल्प पुर्ण होवूनही पाणी साठवून नदीला सोडावे लागत आहे.पूर्व विदर्भातील भंडारा चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गोसे खुर्द प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ ला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असून प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रफळ ३४८६२ वर्ग किलोमीटर सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३२०.८० मिली लिटर, २२२५८ हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे. सांडव्याची लांबी ९०४ मीटर सांडव्याची वक्रद्वारे ३३ नग, १८.३ मीटर बाय १६.५० मीटर महाराष्ट्रातील सर्वात मोठे वक्रद्वारे आहेत. एका वक्रद्वाराचे वजन २५० मेट्रीक टन, सांडवा विसर्ग क्षमता ६७३०० घनमीटर प्रती सेकंद, धरणाची एकूण साठवण क्षमता ११४६ दशलक्ष घन मीटर, जिवीत साठा ७४० दशलक्ष घनमीटर मृतसाठा ४०६ दशलक्ष घनमीटर आहे.प्रकल्पाला डाव व उजवा उसे दोन कालवे असून डावा कालव्याची लांबी २३ किलोमीटर विसर्ग ४५ घनमीटर/ सेकंद, उजवा कालवा लांबी १०७ किलोमीटर विसर्ग ११३ घनमीटर/ सेकंद आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने व प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असले तरी डावा कालवा व उजवा कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाने कालव्याचे बांधकाम तोडून पुन्हा बांधकाम कासवगतीने सुरु आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यास विलंब होत आहे. राजकीय, सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना निवेदने देवून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कालव्यावर व प्रकल्पावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित.