शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धरणाची नऊ वक्रद्वारे उघडली

By admin | Updated: July 4, 2016 00:20 IST

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे.

प्रकाश हातेल  चिचाळजिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. दूषित पाणी वाहून जाण्यात मदत मिळत आहे. दरम्यान प्रकल्पावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरवर आहे. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून गेल्या चार वर्षापासून जलसाठवणूकीला प्रांरभ झाला आहे. मात्र प्रकल्पाचा डावा कालवा व उजवा कालव्याचे काम संथ गतीने चालू असून बांधकामात निकृष्ठ दर्जाचे झाल्याने कालव्याचे बांधकाम तोडून नव्याने कामे सुरु असून त्या प्रकल्पातील जलसाठ्याचा मात्र कालव्याच्या कंत्राटदाराच्या निकृष्ठ बांधकामाचा प्रकल्प पुर्ण होवूनही पाणी साठवून नदीला सोडावे लागत आहे.पूर्व विदर्भातील भंडारा चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गोसे खुर्द प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ ला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असून प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रफळ ३४८६२ वर्ग किलोमीटर सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३२०.८० मिली लिटर, २२२५८ हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे. सांडव्याची लांबी ९०४ मीटर सांडव्याची वक्रद्वारे ३३ नग, १८.३ मीटर बाय १६.५० मीटर महाराष्ट्रातील सर्वात मोठे वक्रद्वारे आहेत. एका वक्रद्वाराचे वजन २५० मेट्रीक टन, सांडवा विसर्ग क्षमता ६७३०० घनमीटर प्रती सेकंद, धरणाची एकूण साठवण क्षमता ११४६ दशलक्ष घन मीटर, जिवीत साठा ७४० दशलक्ष घनमीटर मृतसाठा ४०६ दशलक्ष घनमीटर आहे.प्रकल्पाला डाव व उजवा उसे दोन कालवे असून डावा कालव्याची लांबी २३ किलोमीटर विसर्ग ४५ घनमीटर/ सेकंद, उजवा कालवा लांबी १०७ किलोमीटर विसर्ग ११३ घनमीटर/ सेकंद आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने व प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असले तरी डावा कालवा व उजवा कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाने कालव्याचे बांधकाम तोडून पुन्हा बांधकाम कासवगतीने सुरु आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यास विलंब होत आहे. राजकीय, सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना निवेदने देवून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कालव्यावर व प्रकल्पावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित.