शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 21:39 IST

गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देहिवराज उके यांची मागणी : भाकपच्या सभेत विविध मागण्यांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत. म्हणून शासन, प्रशासन व संबंधित विभागाने वेलतूर - आंभोरा ते मौदी -बोरगाव दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केली आहे.ग्रामपंचायत निवडणूका, महसूल कर्मचाºयांचा संप, आचारसंहिता व पोलिस विभागाच्या सुचनामुळे भाकपची जनअभियान बाईक रॅली स्थगीत करण्यात आली. त्यानंतर लगेच दि.१३ आॅक्टोंबरला राणा भवन, भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा किसान सभेचे तालुका अध्यक्ष अरुण पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यासभेत हिवराज उके मार्गदर्शन करीत होते.सभेत हिवराज उके यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुध्द भाकपच्या देशव्यापी जनअभियानाच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रश्नांवर दुर्लक्ष केल्यास जनआंदोलन करण्याचे आवाहन केले.त्यात प्रामुख्याने विविध मागण्यांचा समावेश आहे. मोदी सरकारने विदेशात काळाधन ठेवणाºया पनामा पेपर्समधील भारतीयांची नावे जाहीर करावे, भांडवलदारांवरील बुडीत कर्जे वसुल करावे, भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बर्खास्त करावे, महागाईवर आळा, नोटबंदी व जीएसटीच्या दुष्परिणामांवर उपाय, शेतकºयांना कर्जमुक्ती, शासकीय हमीभाव केंद्रे सुरु करुन उत्पादन खर्चापेक्षा दिडपट भाव, के जी टू पीजी सर्वांना समान मोफत शिक्षण, सर्वांना उच्च दर्जाची मोफत आरोग्य सेवा, सर्वांना राशनवर स्वस्त दरात धान्य, साखर, केरोसीन, डाळ, घरगुती गॅस, पेट्रोल डिजेलचे दर ५० टक्के कमी करा, भारनियमन बंद करुन विजेचे दर कमी करा, प्रकल्पग्रस्तांचा २.१० लाखांचा पॅकेज लवकर द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. नागरिकांनी भाकपच्या जनअभियानात व जनआंदोलनात सहभागी व्हा असे ही आवाहन हिवराज उके यांनी केले.सभेचे संचालन गजानन पाचे यांनी केले तर समारोप अरुण पडोळे यांनी केले. या प्रसंगी प्रामुख्याने रत्नाबाई इमले, माणिकराव कुकडकर, सदानंद इलमे, सुखराम धनिस्कार, शिशुपाल अटारकर, गौतम भोयर, हिरालाल कुरंजेकर, युवराज गजभिये, दिलीप ढगे, महादेव पेशने, दिलीप क्षिरसागर, वामनराव चांदेवार इत्यादिंचा समावेश होता.