शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 21:39 IST

गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देहिवराज उके यांची मागणी : भाकपच्या सभेत विविध मागण्यांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत. म्हणून शासन, प्रशासन व संबंधित विभागाने वेलतूर - आंभोरा ते मौदी -बोरगाव दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केली आहे.ग्रामपंचायत निवडणूका, महसूल कर्मचाºयांचा संप, आचारसंहिता व पोलिस विभागाच्या सुचनामुळे भाकपची जनअभियान बाईक रॅली स्थगीत करण्यात आली. त्यानंतर लगेच दि.१३ आॅक्टोंबरला राणा भवन, भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा किसान सभेचे तालुका अध्यक्ष अरुण पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यासभेत हिवराज उके मार्गदर्शन करीत होते.सभेत हिवराज उके यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुध्द भाकपच्या देशव्यापी जनअभियानाच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रश्नांवर दुर्लक्ष केल्यास जनआंदोलन करण्याचे आवाहन केले.त्यात प्रामुख्याने विविध मागण्यांचा समावेश आहे. मोदी सरकारने विदेशात काळाधन ठेवणाºया पनामा पेपर्समधील भारतीयांची नावे जाहीर करावे, भांडवलदारांवरील बुडीत कर्जे वसुल करावे, भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बर्खास्त करावे, महागाईवर आळा, नोटबंदी व जीएसटीच्या दुष्परिणामांवर उपाय, शेतकºयांना कर्जमुक्ती, शासकीय हमीभाव केंद्रे सुरु करुन उत्पादन खर्चापेक्षा दिडपट भाव, के जी टू पीजी सर्वांना समान मोफत शिक्षण, सर्वांना उच्च दर्जाची मोफत आरोग्य सेवा, सर्वांना राशनवर स्वस्त दरात धान्य, साखर, केरोसीन, डाळ, घरगुती गॅस, पेट्रोल डिजेलचे दर ५० टक्के कमी करा, भारनियमन बंद करुन विजेचे दर कमी करा, प्रकल्पग्रस्तांचा २.१० लाखांचा पॅकेज लवकर द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. नागरिकांनी भाकपच्या जनअभियानात व जनआंदोलनात सहभागी व्हा असे ही आवाहन हिवराज उके यांनी केले.सभेचे संचालन गजानन पाचे यांनी केले तर समारोप अरुण पडोळे यांनी केले. या प्रसंगी प्रामुख्याने रत्नाबाई इमले, माणिकराव कुकडकर, सदानंद इलमे, सुखराम धनिस्कार, शिशुपाल अटारकर, गौतम भोयर, हिरालाल कुरंजेकर, युवराज गजभिये, दिलीप ढगे, महादेव पेशने, दिलीप क्षिरसागर, वामनराव चांदेवार इत्यादिंचा समावेश होता.