भंडारा
: ‘अरे.आत्ता लक्षात होते. पण विसरलो.’ असे तुम्हाला कधी होते का? किंवा तुमची मुले गरजेपेक्षा जास्त धिंगाणा घालतात का? याचे उत्तर ‘हो’ असेल तर.. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. खाद्यपदार्थात वापरण्यात येणार्या रंगांमुळेच अशा प्रकारचे लक्षात न येणार्या आणि घातक अशा विकारांनी बहुतांश लोकांना ग्रासले आहे.सर्वाधिक
रंग लहान मुलांच्या खाद्यपदार्थत वापरण्यात येतात. रंगांकडे पाहूनच मुले पालकांकडे ती वस्तू खरेदी करण्यासाठी हट्ट धरतात. मुलांचे हट्ट पुरविण्यात पालकही मागे राहत नाहीत. त्या मुलाला कोणतीही वस्तू खरेदी करून देतात. मात्र, ती वस्तू त्या मुलाच्या आरोग्यास किती घातक आहे, हे पालकांनाही माहिती नसते. किंबहुना
या विषयावर आतापर्यंत कुठेही वाच्यता झालेली नाही. त्यामुळेच सर्वच विक्रेते प्रमाणापेक्षा जास्त रंगांचा वापर करीत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. मिठाई, ज्युस, बर्फगोळा आदी पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी रंग वापरण्यात येतात. परंतु, या रंगांचे प्रमाण किंवा कोणत्या पदाथार्साठी किती रंग वापरावा, हे मोजण्याचे परिमाण विक्रेत्यांकडे नसतात. हा प्रकार रस्त्यांच्या कडेला लागलेल्या दुकानांमध्ये अधिक दिसून येतो.खाद्य
पदार्थांतील विविध रंगांमुळे विशेषत: लहान मुलांच्या विकासावरच परिणाम होत आहे. मुलांची वाढ खुंटणे, अनिमिया, चिडचिड होणे, गरजेपेक्षा जास्त धिंगाणा घालणे, अतिचंचलता असे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर गर्भवती महिलांवरही रंगांचा मोठय़ा प्रमाणावर परिणाम होत आहे.सर्वसामान्यांमध्ये
यकृत, किडनी, महिलांमध्ये वंध्यत्व, हृदयासंबंधी विकार, भूक न लागणे, पोट फुगणे यापासून ते कर्करोगापर्यंतचे विकार होण्याचा धोका खाद्यपदार्थात प्रमाणापेक्षा अधिक वापरल्या जाणार्या रंगांमुळे निर्माण झाला आहे. त्या-त्या प्रकारचे विकार होण्यामागे इतरही कारणे महत्त्वाची आहेत. खाद्य
पदार्थामध्ये वापरण्यात येणार्या रंगांमुळेही हे विकार होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था-संघटनांनी यासंदर्भात विविध माध्यमांतून जनजागृती केल्यास आरोग्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)