शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:00 IST

चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातही हुडहुडी : चंद्रपूर १०.८ तर ब्रह्मपुरी ९.९ अंश सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.चंद्रपूर जिल्हा तसा तप्त उन्हाळ्यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात, एवढी उन्हाची दाहकता असते. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्याने ऋतुचक्राला बगल दिली. प्रारंभी दमदार आलेला पाऊस पुढे कुठे गायब झाला, कळले नाही. पावसाने जिल्ह्यात सरासरीही गाठली नाही. अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्याने दगा दिला. त्यामुळे मागील वर्षीसारखा हिवाळाही दगा देईल, असे वाटत होते. प्रारंभी तसे वाटायलाही लागले. मात्र पुढे चांगली थंडी पडू लागली. हिवाळ्यात चांगली थंडी पडत असल्याने रबी पिकांना त्याचा फायदा होत आहे.एरवी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र यावेळी दिवाळी आॅक्टोबर महिन्यातच आल्यामुळे थंडी जाणवली नाही. उलट उन्ह तापत असल्याने अनेकांनी घरातील कुलर काढलेच नाही. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचा फारसा जोर नव्हता. दुपारचा उकाडा कायम होता. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थोडीफार गुलाबी थंडी जाणवू लागली. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचा अचानक जोर वाढला. डिसेंबरच्या पंधरवाड्यात तर पारा चांगलाच खाली आला होता. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली होती.मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी आता दिवसभरही जाणवत आहे. चौकाचौकात नागरिक उन्हात उभे राहताना दिसत आहे. शनिवारी चंद्रपुरात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पारा आणखी खाली घसरत आहे.ग्रामीण भागात शेकोट्याग्रामीण भागात तर थंडीचा जोर अधिक आहे. ब्रह्मपुरीत शनिवारी ९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील चौकाचौकात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याशिवाय एरवी पहाटे५ वाजताच आपली दिनचर्या सुरू करणारे ग्रामीण नागरिक आता सकाळी ७ वाजताउठू लागले आहेत.