शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

केंद्र शासनाच्या आदेशानेच धान खरेदी बंद

By admin | Updated: May 30, 2014 23:26 IST

शेतकर्‍यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी ३0 जूनपर्यंत सुरु राहणारे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ मे रोजीच बंद केल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनावर खापर फोडले जात असले तरीही योजना केंद्र

धान खरेदी केंद्र : अनिल बावनकर यांचा आरोपभंडारा : शेतकर्‍यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी ३0 जूनपर्यंत सुरु राहणारे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ मे रोजीच बंद केल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनावर खापर फोडले जात असले तरीही योजना केंद्र सरकारची असून केंद्राच्या आदेशानेच धान खरेदी बंद झाली आहे, असा आरोप आ.अनिल बावनकर यांनी पत्रपरिषदेत केला. ३0 जूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश असताना १५ मे रोजी केंद्र बंद करून राज्य सरकार शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप खा.नाना पटोले यांनी केला होता. याबाबची वस्तूस्थिती स्पष्ट करताना आ.बावनकर म्हणाले, आधारभूत खरेदी केंद्राची योजना केंद्र सरकारची असून, खरीप हंगामापूर्वीच केंद्राकडून आदेश जारी केले जातात. मागीलवर्षीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात केवळ खरीपाच्या हंगामातील धान खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर २0१३ ते फेब्रुवारी २0१४ या काळातच खरेदी केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. तथापि, शेतकर्‍यांचे हीत, लोकसभा निवडणूक आणि राजकीय पुढार्‍यांचा दबाव लक्षात घेता ३0 जूनपर्यंत खरेदी केंद्र पुढे चालविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाचे उत्पादन होत असून पूर्वी रब्बीचे धान होत नसल्याने केंद्र शासनाकडून या काळात खरेदी केंद्रायाची योजना राबविली जात नव्हती. मागील काही वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण होऊन पाण्याची सोय झाल्याने शेतकरी रब्बी आणि उन्हाळी धानाचे उत्पादन घेतात. महाराष्ट्रात रबी हंगामात धान खरेदी केंद्राची योजना नसतानही केवळ शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्य शासनाने ही योजना पुढे चालविली, असेही त्यांनी सांगितले. केंद्र मध्येच बंद केल्याचा कांगावा करीत राज्य शासनावर खापर फोडण्यापेक्षा खरेदी केंद्र पुढे सुरु ठेवण्यासाठी खा.पटोले यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. धान खरेदी केंद्र बंद झाल्याने क्विंटलमागे ५00 रुपये कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत, परिणामी शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे, असे सांगत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याबाबत २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचेही आ.बावनकर यांनी स्पष्ट केले.       (शहर प्रतिनिधी)