शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

संगणकीकृत दस्तऐवज बंद करणार

By admin | Updated: June 25, 2014 23:35 IST

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ग्राम पंचायत मधून संगणकीकृत दस्तऐवज देण्यात येत आहेत. यात नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.

चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ग्राम पंचायत मधून संगणकीकृत दस्तऐवज देण्यात येत आहेत. यात नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. हे दस्तऐवज बंद करण्याचा निर्णय सिहोरा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतला असून गावकऱ्यांना न्याय मिळणार आहे.राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने ग्राम पंचायतींना हायटेक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम पंचायतींना संगणक पुरवठा करण्यात आलेला आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे संगणक शो पीस झाली आहेत. अनेक ग्राम पंचायतीमध्ये विजेची सोय नाही. यामुळे संगणक धुळखात आहेत. याशिवाय आॅपरेटरच्या घरीच अनेक संगणक आहेत. दरम्यान विज कनेक्शन घेण्यास ग्राम पंचायती पुढाकार घेत नाहीत. ग्राम पंचायतींना बिगर घरगुतीच्या आधारावर वीज पुरवठा करणारे कनेक्शन विज वितरण कंपनी उपलब्ध करीत आहे. यामुळे अल्प उत्पन्न असणाऱ्या ग्राम पंचायती विज जोडणी पासून दोन हात दूर आहेत. दरम्यान ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना संगणकीकृत दस्तऐवज उपलब्ध केले जात आहेत. यात रहिवाशी दाखला, दारिद्रय रेषेखालील यादी क्रमांकाचा दाखला तथा अन्य दस्तऐवजाचा समावेश आहे. या प्रत्येकी दस्तऐवजाचे २५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. सरासरी ३ दस्तऐवजाचे ७५ रूपये गावकरी मोजत आहेत. यामुळे नागरिकांवर अतिरिक्त भुर्दंड बसत आहे. या दस्तऐवजांना गावकरी विरोध करीत आहेत. संगणक संचालित करणारे आॅपरेटर हे ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध राहत नाही. त्यांचा अधिक वेळ पंचायत समितीमध्ये आयोजित बैठकीत जात असल्याने, असे दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.या संगणकांना इंटरनेटने जोडण्यात आल्याचा मोठा उदोउदो करण्यात येत आहे. परंतु सिहोरा परिसरात तांत्रिक अडचणीमुळे संगणक आॅपरेटर सैरवैर झाली आहेत. ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक आॅपरेटर अन्य संगणक केंद्रमधून अडचण दुर करीत आहेत. याकरीता स्वत: अतिरिक्त पैसे मोजत आहेत. (वार्ताहर)