शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

दिघोरी-लाखांदूर रस्त्याच्या कामाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : निकृष्ट काम होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : साकोली ते वडसा या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असल्याने दिघोरी, लाखांदूर, सोनी, चप्राड परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम करून मुरुमाचा भराव टाकल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल तर काही ठिकाणी धूळीचे लोट उडत असल्याने नागरिक गत काही दिवसापासून त्रस्त झाले आहेत.रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत.वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो. सध्या रस्त्यावर भरावाचे काम सुरू असताना धूळ उडू नये, म्हणून कंत्राटदार कंपनीकडून रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे असताना टाळाटाळ करत होता. याबाबत विचारणा करण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.काही ठिकाणी चिखल झाल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यक तितकी सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.अल्पावधीतच रस्त्याला पडल्या भेगालाखांदूर ते दिघोरीपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम जोमाने सुरू आहे, मात्र बांधकामात गैरप्रकार होत असल्याने बांधकाम निकृष्ट होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. चिचाळ, बारव्हा, दिघोरी येथील नुकताच झालेल्या महामार्गावरील सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत, या मार्गावरून जड वाहतूक बंद आहे, तरीदेखील अल्पावधीतच भेगा पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार आहे याचा प्रत्यय येत असल्याने रस्ते कामावर बारव्हा परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या निकृष्ट बांधकामाची निष्पक्षपणे चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा