शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

दिघोरी-लाखांदूर रस्त्याच्या कामाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : निकृष्ट काम होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : साकोली ते वडसा या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असल्याने दिघोरी, लाखांदूर, सोनी, चप्राड परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम करून मुरुमाचा भराव टाकल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल तर काही ठिकाणी धूळीचे लोट उडत असल्याने नागरिक गत काही दिवसापासून त्रस्त झाले आहेत.रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत.वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो. सध्या रस्त्यावर भरावाचे काम सुरू असताना धूळ उडू नये, म्हणून कंत्राटदार कंपनीकडून रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे असताना टाळाटाळ करत होता. याबाबत विचारणा करण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.काही ठिकाणी चिखल झाल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यक तितकी सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.अल्पावधीतच रस्त्याला पडल्या भेगालाखांदूर ते दिघोरीपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम जोमाने सुरू आहे, मात्र बांधकामात गैरप्रकार होत असल्याने बांधकाम निकृष्ट होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. चिचाळ, बारव्हा, दिघोरी येथील नुकताच झालेल्या महामार्गावरील सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत, या मार्गावरून जड वाहतूक बंद आहे, तरीदेखील अल्पावधीतच भेगा पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार आहे याचा प्रत्यय येत असल्याने रस्ते कामावर बारव्हा परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या निकृष्ट बांधकामाची निष्पक्षपणे चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा