शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

बालकांचा किलबिलाट सुरु

By admin | Updated: June 27, 2015 00:51 IST

नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थ्यांना पुस्तके, मिष्ठान्न, भोजनाचे वाटपशिवशंकर बावनकुळे साकोलीनवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकल्यांनी हसत खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी आज उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार शाळेच्या प्रांगणात आपल्या सवंगड्याांची विचारपूस केली हसण्या, खेळण्यानी शाळेचा परिसर असा गजबजून जाऊन पुन्हा बच्चे कंपनीची किलबिलाट सुरु झाली.जवळपास दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर शाळातील घंटा आज पुन्हा खणाणली, नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेवून बच्चे कंपनी शाळेत पोहचली. तेव्हा पहिल्या दिवशीचा ठोका कानावर पडताच विद्यार्थी आनंदले, त्यांनी पहिल्या दिवशी धम्माल मस्ती केली.शाळेच्या पायऱ्या चढताच नवजीव कॉन्व्हेंट (सीबीएससी) प्राचार्य सैय्यद व मुख्याध्यापक समरित यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून एक वेगळ्या स्वरुपाचा त्यांना आनंद झाला. शाळेची पहिली घंटा वाजताच मुले शिस्तीत रांगेत उभे राहिली आणि एका सुरात राष्ट्रगीत गाऊ लागले. दोन महिन्यापासून एकांत सहन करणाऱ्या शाळेचा परिसर गजबजून गेला. जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.शाळेचा पहिला दिवस असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालकमंडळी तयारी करीत होते, सकाळी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई गडबड प्रत्येक घरोघरी सुरु होती. दोन महिन्याच्या सुटीनंतर बच्चे कंपनीतही उत्साह होता. शाळेत पाऊल टाकताच विद्यार्थी गप्पात रंगले, सुटी कशी घालवली या संदर्भात चर्चा केली. पुढच्या नियोजन संदर्भातही चर्चा केली. शिकवणी कुठे लावणार, शाळांचे तासीका कसे होणार या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या.जंक फुडशी कट्टी, भाजी-पोळीशी गट्टीशाळा सुरु झाली असून पालकांनी शक्यतो मुलांच्या जेवनाच्या डब्यात कडधान्याची भाजी, ऊसळ सोबत २० ते ३० ग्रॅम गुळ, पोळी, सलाद हे द्यावे, घरुन निघताना त्याला जेवनातही हेच पदार्थ द्यावेत. शाळेतून परतल्यानंतर फळे खायला द्यावीत. उघड्यावरचे पदार्थ टाळावेत रात्रीच्या जेवनात हिरव्या भाज्या, पोळी द्यावी. जेणेकरुन मुले कंटाळा करणार नाहीत. मुलांची पचन क्रीयाही योग्य राहिल. पावसाळ्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. पालकांनी सावध रहावे.