शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बालकांचा किलबिलाट सुरु

By admin | Updated: June 27, 2015 00:51 IST

नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थ्यांना पुस्तके, मिष्ठान्न, भोजनाचे वाटपशिवशंकर बावनकुळे साकोलीनवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकल्यांनी हसत खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी आज उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार शाळेच्या प्रांगणात आपल्या सवंगड्याांची विचारपूस केली हसण्या, खेळण्यानी शाळेचा परिसर असा गजबजून जाऊन पुन्हा बच्चे कंपनीची किलबिलाट सुरु झाली.जवळपास दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर शाळातील घंटा आज पुन्हा खणाणली, नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेवून बच्चे कंपनी शाळेत पोहचली. तेव्हा पहिल्या दिवशीचा ठोका कानावर पडताच विद्यार्थी आनंदले, त्यांनी पहिल्या दिवशी धम्माल मस्ती केली.शाळेच्या पायऱ्या चढताच नवजीव कॉन्व्हेंट (सीबीएससी) प्राचार्य सैय्यद व मुख्याध्यापक समरित यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून एक वेगळ्या स्वरुपाचा त्यांना आनंद झाला. शाळेची पहिली घंटा वाजताच मुले शिस्तीत रांगेत उभे राहिली आणि एका सुरात राष्ट्रगीत गाऊ लागले. दोन महिन्यापासून एकांत सहन करणाऱ्या शाळेचा परिसर गजबजून गेला. जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.शाळेचा पहिला दिवस असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालकमंडळी तयारी करीत होते, सकाळी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई गडबड प्रत्येक घरोघरी सुरु होती. दोन महिन्याच्या सुटीनंतर बच्चे कंपनीतही उत्साह होता. शाळेत पाऊल टाकताच विद्यार्थी गप्पात रंगले, सुटी कशी घालवली या संदर्भात चर्चा केली. पुढच्या नियोजन संदर्भातही चर्चा केली. शिकवणी कुठे लावणार, शाळांचे तासीका कसे होणार या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या.जंक फुडशी कट्टी, भाजी-पोळीशी गट्टीशाळा सुरु झाली असून पालकांनी शक्यतो मुलांच्या जेवनाच्या डब्यात कडधान्याची भाजी, ऊसळ सोबत २० ते ३० ग्रॅम गुळ, पोळी, सलाद हे द्यावे, घरुन निघताना त्याला जेवनातही हेच पदार्थ द्यावेत. शाळेतून परतल्यानंतर फळे खायला द्यावीत. उघड्यावरचे पदार्थ टाळावेत रात्रीच्या जेवनात हिरव्या भाज्या, पोळी द्यावी. जेणेकरुन मुले कंटाळा करणार नाहीत. मुलांची पचन क्रीयाही योग्य राहिल. पावसाळ्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. पालकांनी सावध रहावे.