शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचा किलबिलाट सुरु

By admin | Updated: June 27, 2015 00:51 IST

नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थ्यांना पुस्तके, मिष्ठान्न, भोजनाचे वाटपशिवशंकर बावनकुळे साकोलीनवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकल्यांनी हसत खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी आज उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार शाळेच्या प्रांगणात आपल्या सवंगड्याांची विचारपूस केली हसण्या, खेळण्यानी शाळेचा परिसर असा गजबजून जाऊन पुन्हा बच्चे कंपनीची किलबिलाट सुरु झाली.जवळपास दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर शाळातील घंटा आज पुन्हा खणाणली, नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेवून बच्चे कंपनी शाळेत पोहचली. तेव्हा पहिल्या दिवशीचा ठोका कानावर पडताच विद्यार्थी आनंदले, त्यांनी पहिल्या दिवशी धम्माल मस्ती केली.शाळेच्या पायऱ्या चढताच नवजीव कॉन्व्हेंट (सीबीएससी) प्राचार्य सैय्यद व मुख्याध्यापक समरित यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून एक वेगळ्या स्वरुपाचा त्यांना आनंद झाला. शाळेची पहिली घंटा वाजताच मुले शिस्तीत रांगेत उभे राहिली आणि एका सुरात राष्ट्रगीत गाऊ लागले. दोन महिन्यापासून एकांत सहन करणाऱ्या शाळेचा परिसर गजबजून गेला. जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.शाळेचा पहिला दिवस असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालकमंडळी तयारी करीत होते, सकाळी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई गडबड प्रत्येक घरोघरी सुरु होती. दोन महिन्याच्या सुटीनंतर बच्चे कंपनीतही उत्साह होता. शाळेत पाऊल टाकताच विद्यार्थी गप्पात रंगले, सुटी कशी घालवली या संदर्भात चर्चा केली. पुढच्या नियोजन संदर्भातही चर्चा केली. शिकवणी कुठे लावणार, शाळांचे तासीका कसे होणार या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या.जंक फुडशी कट्टी, भाजी-पोळीशी गट्टीशाळा सुरु झाली असून पालकांनी शक्यतो मुलांच्या जेवनाच्या डब्यात कडधान्याची भाजी, ऊसळ सोबत २० ते ३० ग्रॅम गुळ, पोळी, सलाद हे द्यावे, घरुन निघताना त्याला जेवनातही हेच पदार्थ द्यावेत. शाळेतून परतल्यानंतर फळे खायला द्यावीत. उघड्यावरचे पदार्थ टाळावेत रात्रीच्या जेवनात हिरव्या भाज्या, पोळी द्यावी. जेणेकरुन मुले कंटाळा करणार नाहीत. मुलांची पचन क्रीयाही योग्य राहिल. पावसाळ्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. पालकांनी सावध रहावे.