शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पारंपरिक विवाह सोहळ्यांचा बदलतोय ट्रेंड

By admin | Updated: April 11, 2015 00:36 IST

पूर्वी विवाह सोहळा म्हटला की लगीनघाई. वऱ्हाड्यांची धावपळ. यासह लग्न विधीसाठी करावा लागणारे सोपस्कार पार पाडण्यासाठी फार मोठी धावपळ व्हायची. ..

भंडारा : पूर्वी विवाह सोहळा म्हटला की लगीनघाई. वऱ्हाड्यांची धावपळ. यासह लग्न विधीसाठी करावा लागणारे सोपस्कार पार पाडण्यासाठी फार मोठी धावपळ व्हायची. परंतु दोन परिवारांना एकत्र आणणाऱ्या या विवाह सोहळ्याचे स्वरूप आता काळानुरूप बदलत चालले आहे. विवाहाच्या तयारीपासून दिल्या जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला पंगतीतील मेनूपर्यंत कालपरत्वे आमुलाग्र बदल होताना आता दिसत आहे.पूर्वी लग्नपत्रिका छापून घरातील भाऊबंध मंडळी, आप्तेष्ट, स्रेहीजण व नातेवाईक यांना प्रत्यक्ष घरी जावून महिला वऱ्हाडी असल्यास त्यांना जाण्यायेण्याचे प्रवासभाडे देण्याची प्रथा होती. परंतु आजच्या आधुनिक व तज्ज्ञानाच्या युगात यासर्व गोष्टींना फाटा देवून अतिशय धावपळीचा हा सोहळा व्हॉट्स अ‍ॅप, हाईक, ट्यूटर, ई-मेल, आॅनलाईन पत्रिका आणि इव्हेंट मॅनेजमेंटमुळे हायटेक होत चालला आहे. ग्रामीण भागात छोटेखानी विवाह सोहळे, आदर्श विवाह, मुलगी पहावयास गेले अन् लग्न उरकून आले अशाप्रकारचे विवाह सोहळे होत असले तरी शहरांमध्ये हायटेक विवाह सोहळ्यालाच तरूणाईची जास्त पसंती दिसत आहे. लग्नविधीच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी हळदीचा कार्यक्रम गवरण्याचा नेम, गोपाळ मुहूर्त, गोरज मुहूर्त, सायं मुहूर्त असे विविध टप्पे विवाह सोहळ्यात असतात. महिला वऱ्हाडी प्रामुख्याने हळदीच्या कार्यक्रमावर भर देताना दिसतात. काही ठिकाणी तर रात्री हळदीच्या कार्यक्रमावर भर देताना दिसतात. काही ठिकाणी तर रात्री हळदीनंतर गाण्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. गरिबातील गरीब व्यक्तीदेखील लग्न सोहळ्यात फोटोग्राफी व व्हीडीओ शुटींगवर खर्च करताना दिसतात. श्रीमंत लोकांमध्ये विवाह सोहळ्याच्या करिडमा अब्लमसाठी अधिक पसंती दिली जात आहे. तद्वतच विवाहात नवरदेवांमध्ये सूट, सफारी या पेहरावाला आता पसंती न देता शेरवानी आणि इण्डोवेस्टर्न फॅशनच्या कपड्यांच्या ट्रेंडला महत्व देताना दिसत आहे. यातही शेरवानी, सेमी शेरवानी, धोती कुर्ता, ओतपुरी, डिझायनर सुट या वेशभूषेचा लग्न सोहळ्यामध्ये समावेश असल्याचे दिसून येते. नवरदेवासोबतच वधंूमध्ये देखील आता मालिकांचा व चित्रपटांचा चांगलाच प्रभाव दिसत असून त्यामध्ये सधा वेट, ब्रासो वेलवेट असा विशिष्ट प्रकारच्या डिझायनर साड्यांना पसंती दिल्या जात आहे. ३ हजारापासून ते १५ हजारापर्यंतच्या साड्यांची रेंज भंडारा बाजारपेठेत उपलब्ध असून सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या वधूची देखील महागड्या साड्यांना पसंती दिल्या जात आहे.तरूण पिढीकडून अशाप्रकारचे नवीन ट्रेंड वापरले जाते. लग्नपत्रिकेतून जनजागृती करता येईल. इथपासून गरिबांना भोजन देण्यापर्यंतच्या पद्धती अवलंबिण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)