शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

सीमाबंध शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Updated: November 1, 2016 00:39 IST

जिल्ह्यात २४ आॅक्टोबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. ज्यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांनी बेधडक खरेदी सुरु केली.

धान खरेदी केंद्र अडचणीत : शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली, १०१० ला ‘अ’ दर्जा द्यामुखरू बागडे पालांदूरजिल्ह्यात २४ आॅक्टोबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. ज्यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांनी बेधडक खरेदी सुरु केली. मात्र काही खरेदी केंद्राना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशावेळी त्या केंद्राअंतर्गत गावांना धान विकता येत नाही. सातबारा शिवाय खरेदी होत नाही. शिवाय संगणीकृत खरेदीमुळे पारदर्शकता शक्य आहे. दरम्यान खरेदी केंद्रांना घातलेले गाव सीमेचे बंधन शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे.पालांदूरला सेवा सहकारी संख्येचे हमी धान खरेदी मिळाले आहे. मात्र कोठाराअभावी धान खरेदी सुरुच झालेली नाही. मात्र शेजारील गावात हमी केंद्र सुरु झालेली आहेत. त्या ठिकाणी बेधडक खरेदी सुरु आहे. अशावेळी पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा सोबत नेत धान विकला तर खरेदीला जिल्ह्यात कुठेही अडचण नसावी. भंडारा जिल्ह्यात जमिनीचा पोत व पाण्याची सुविधा पाहून धान पिकाची निवड केली जाते. ठोकळ धान व बारीक धान अशी दोन दर्जाची वाण जिल्ह्यात घेतली जातात. लाखनी तालुक्याच्या परिसरात ठोकळ धानाचे वाण अत्यल्प प्रमामात घेतले जाते. फाईन अर्थात बारीक धान कमी भावामुळे खरेदी केंद्रावर विकली जात नाही. अशावेळी त्या भागातील खरेदी केंद्रे रिकामीच असतात. ठोकळ धानाचा शेतकरी हमी केंद्राच्या सीमा वादात अडकण्यापेक्षा सातबाराच्या मर्यादेनुसार खरेदी व्हावी.व्यापाऱ्यांना नजरेसमोर ठेवून सीमा वादाचा मुद्दा पुढे येत असेल तर व्यापारी ही चतुर झाले आहेत. व्यापाऱ्यांनी मधूरसंबंधाने सातबारे (जमा) जमवूनच खरेदी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळूच शकत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. पालांदुरात कोठार व्यवस्था तोकडी असल्याने सेवा सहकारी संस्थेने धान खरेदी सुरु केली नाही. अपुऱ्या व्यवस्थेतून धान खरेदीला मार्ग निघू शकतो. परंतु शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा नसल्याने दररोजच संकटे वाढत आहेत. संस्थेच्या गोडावूनमध्ये खरेदी करून हप्ताभराच्या अंतराने मालाची उचल केल्या गेली तर पालांदुरला आजच खरेदी शक्य आहे.शासनाने पर्यायाने प्रशासनाने धान खरेदीत अ व ब अशी प्रतवारी केली आहे. अ दर्जाच्या धानाला अधिक भाव जाहीर केला. पालांदूर धान खरेदी केंद्रावर ठोकळ व लांब धान पूर्णत: सुकलेला असताना देखील त्याचा अ दर्जा मिळत नाही. २०२०, आय आ ६४, सारखे वाण अ दर्जात मोडतात. पण जिल्हा प्रशासनाला मान्य नाही. या विषयात तात्वीक चर्चा शेतकऱ्यांशी होणे काळाची गरज आहे. तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात १०१० सारखी ठोकळ वाण अ दर्जात खरेदी केली होती. मग आता का नाही? असा प्रश्न पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. धान खरेदी पारदर्शक व सुटसुटीत होण्याकरिता लोकप्रतिनिधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनशी सलगी करून यथोचित मार्गाची सक्त गरज आहे. खरेदी झालेला माल त्वरीत उचल करीत शेतकऱ्यांना नगदी चुकाऱ्याची सोय आवश्यक आहे. दिवाळी सारख्या सणाला शेतकऱ्यांना उधारीवर जगावे लागते हे कृषीप्रधान देशाचे दुर्भाग्य आहे. दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांची काय स्थिती आहे हे ग्रामीण भागात आल्यावर २१ व्या शतकातला भारत देश डोळ्यासमोर येईल. तेव्हा धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता ठोस निर्णयाची म्हणजे डॉ. स्वामीनाथन समितीची शिफारस आवश्यक आहे.