शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

आस्थेने चौकशी करुन दिली सन्मानाची वागणूक

By admin | Updated: September 9, 2014 00:09 IST

एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना

औचित्य धनादेश वाटपाचे : प्रकरण निराधार योजनेच्या मानधनाचे मोहाडी : एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना तहसीलदार कल्याण डहाट यांनी सन्मानाने बसविले. आस्थेने विचारपूस केली. एवढंच नाही तर त्यांना चहा पाजून आपल्या सहृदयतेचा परिचय दिला.औचित्य होते, मोहाडी तहसील कार्यालयात राष्ट्रीय सामाजिक, कौटुंबिक अर्थसहाय्य योजनेद्वारे विधवा महिलांना धनादेश वाटपाचा. शनिवारी तलाठ्यांमार्फत धनादेश स्वीकारण्यासाठी आधार गेलेल्या महिलांना तहसील कार्यालयात बोलावण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या त्या महिला तहसीलदार यांची प्रतिक्षा करीत पडवीत बसून होत्या. फावल्या वेळात एकमेकांच्या दु:खाची वाटणी करीत होत्या. एक महिला आपलं तान्ह बाळ घेऊन मिळणाऱ्या अर्थसहाय्यासाठी आपली होती. विविध गावातून त्या विधवा ताटकळत बसून होत्या. त्यांची प्रतीक्षा संपली. एकाच वेळी आमदार अन् तहसीलदार आले. साहेब आल्याने विधवांच्या चेहऱ्यावरची निराशा गेली होती. तहसीलदारांनी लगेच त्या महिलांना दालनात बोलावले. त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. अन् सरळ त्या निराधार महिलांनी तहसीलदारांनी संवाद साधला. एजंटामार्फत तुम्हाला सांगण्यात आलं का, कुणी पैसे मागितले का, याची चौकशी केली. संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसहाय्य तुम्हाला मिळतं का अशीही विचारणा केली. पण उपस्थित असणाऱ्या अठरा महिलांपैकी एकीलाही संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसहाय्य मिळत नसल्याचे लक्षात आले. कुटुंब प्रमुख अध्यापेक्षा जास्त आम आदमी विमा काढला गेला नाही. एक अधिकारी जनतेला विविध योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी धडपडतोय. पण महसूल विभागातील कणा असलेले तलाठी मात्र शासकीय योजना गरीबांपर्यंत कशी जाईल याची किंचीतही पर्वा करीत नसल्याचे लक्षात आले. एका लाभार्थ्यांचे २००९ पासून अर्थसहाय्य योजनेसाठी फार्म तलाठ्यांकडून तहसील कार्यालयात पाठविण्यात आला. पण आज पर्यंत तो फार्म मंजूर - नामंजूर याचा सोक्षमोक्ष लागला नसल्याचे निदर्शनास आले. त्या शिवाय अनेक संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजनेचे बरेच फॉर्म अडगळीत पडल्याचे तसेच गहाळ झाल्याचे तहसीलदार यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)