शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन् विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने त्याचा घात...

By admin | Updated: February 21, 2015 00:45 IST

तो आपल्या कुटूंबासह नविन दिवसाचे स्वागत करण्यासाठी भल्या पहाटेच उठला. दिवसभराचे

हृदयशून्य मानवता : कुटुंबावर काळाचा आघात, विजेच्या जिवंत प्रवाहाला स्पर्श झाल्याने गेला बळीप्रशांत देशाई ल्ल भंडारातो आपल्या कुटूंबासह नविन दिवसाचे स्वागत करण्यासाठी भल्या पहाटेच उठला. दिवसभराचे नियोजन करून त्याची मनात खुणगाठ बांधून तो कुटूंबासह घराबाहेर पडला. नियतीला मात्र त्याचा सुखीसंसार बघवत नव्हता. अनेकदा त्याच्यावर काळाने झेप घेतली व तो त्यातून सुखरूप बाहेर पडला. आज काळ बनून आलेल्या जिवंत विद्युत तारांनी त्याला आपल्या कवेत घेतले. यात तो तडफडला. परंतू, त्याला वाचविण्यासाठी कुणीही धजावला नाही व यातच त्याने जगाचा निरोप घेतला. ती काळरूपी वेळ होती सकाळी ९.३० वाजताची. मानव असो की पशुपक्षी सर्वांना देवाने सुंदर जीवन दिले आहे. आयुष्यात सर्वांना सुख मिळतेच असे नाही. काहींना आयुष्यभर संघर्ष करुनही यश मिळविता येत नाही, तर काहींच्या पायाशी लक्ष्मी लोळण घालते. दोन पैसे कमविण्यासाठी सर्वचजण जीवाचा आटापिटा करतात. भल्यापहाटे उठून कामाला लागतात व आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवितात. कुटूंबाचा गाडा हाकण्यासाठी अख्ख कुटंूबच घराबाहेर पडून सर्वांना हातभार लावलात. ही स्थिती असते प्रत्येक मानवांच्या घरात. तर पशुपक्षीही मानवापेक्षा मागे नाहीत. मनुष्य बोलून दाखवितात तर पशुपक्ष्यांना वाचा नसल्यामुळे ते बोलू शकत नसले तरी त्यांच्या विशिष्ट शैलीत एकेमेकांशी संवाद साधतात. पहाट झाली की, जशी मनुष्याला आपल्या कुटूंबाच्या खाण्यापिण्याची चिंता असते तशीच परिस्थिती पशुपक्षांमध्येही असते. अशाच विवंचनेत आज शुक्रवारी सुर्यनारायणाच्या स्वागतासाठी ‘हे’ कुटूंबही भल्यापहाटे उठले. घरातील कर्त्याने उर्वरीत सर्वांना उठवून दैनंदिन सोपस्कार पार पाडले. व सुर्याचे तेजोमय किरण अंगावर घेऊन सर्वच कुटूंबाने मोठ्या आनंदात स्वागत करून दिवसभराच्या कार्यासाठी सर्वच घराबाहेर पडले.मात्र, त्यांच्या सुखी जीवनाला वाईट नजर लागली होती. आनंदात एक-एक मजल दरमजल समोर जात असताना नियतिने त्यांच्यासाठी वेगळेच काहीतरी आखले होते. याची पुसटशीही कल्पना या कुटूंबाला नव्हती. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषदे समोरून गेलेल्या विद्युत विभागाच्या जिवंत तारांवर काळ ‘त्या’ कुटूंबाची वाट बघत होता. याची कल्पना नसलेल्या त्या कुटूंबावर काळाने झडप घातलीच. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने कुटंूब प्रमुख असलेला ‘तो’ चिपकला. तसाच तो किंचाळला. यामुळे परिसरातील नागरिकांना काही कळायच्या आत तो तारांपासून दुर फेकल्या गेला. तो जमीनीवर पडून तडफडत राहिला. मात्र, उपस्थित नागरिकांनी त्याला मदतीचा हात देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान त्याचे कुटूंबीयांनी अशा परिस्थितीत मदतीच्या किंचाळ्या मारल्या. पण तिथे उपस्थित असलेल्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतल्याने कुटूंबीय हतबल झाले होते.एखादी महिला किंवा तरूणीवर कुठलाही अनर्थ घडला असता किंवा अपघात झाला असता तर याच मानवांनी धावून तिला मदतीचा हात दिला असता. परंतू, ‘तो’ जीवाच्या आकांताने ओरडून प्राण वाचविण्यासाठी किंचाळत होता. मात्र, तो मनुष्य नसून मूक ‘माकड’ असल्यामुळे उपस्थितांनी मदतीचा हात दिला नाही. मनुष्य असो की, पशुपक्षी कोणावरही संकट ओढविले तरी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मानवालाच मदत करणे हे मानव धर्माचे कर्तव्य नसून पशुपक्ष्यांनाही मदत करणे गरजेचे आहे. यात ‘त्या’ माकडाची काय चूक, त्याला जर मानवासारख कळले असत तर तो इथून त्याने उड्या मारल्या नसत्या. पायदळ चालून निर्धारित ठिकाणी पोहचला असता. देवाने मनुष्य व मुक्या प्राण्यांमध्ये यासाठीच हा भेद ठेवला आहे. जर ‘माकडाला’ वेळीच मदत मिळाली असती तर त्याचे प्राण वाचले असते. मात्र, तिथे उपस्थित हृदयशुन्य मानवाला त्या मुक्या माकडाची काय पर्वा.