शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

आम्रबहराचा सुगंध दरवळू लागला सर्वत्र

By admin | Updated: February 19, 2015 00:33 IST

आम्रवृक्षाच्या सानिध्यात आले की त्या भोवताल आम्र बहराचा मंद सुगंध मन प्रसन्न करते. आम्रवृक्षाच्या कक्षात जाताच थोडा अल्पकाळ थांबल्यावाचून राहत नाही.

राजू बांते मोहाडीआम्रवृक्षाच्या सानिध्यात आले की त्या भोवताल आम्र बहराचा मंद सुगंध मन प्रसन्न करते. आम्रवृक्षाच्या कक्षात जाताच थोडा अल्पकाळ थांबल्यावाचून राहत नाही. अशा या आम्रराईच्या बहराने सारा परिसर सुगंधाने दरवळू लागलाय.कोणत्याही मार्गाने जा, एकतरी आम्रवृक्ष पडतोच. आम्रवृक्षाबाजूने जा नाही तर त्या वृक्षाच्या खालून जा. आंबेबहराचा मंद असा सुगंध हवाहवासा वाटतो. पुढे जाण्याच्या आधी त्या आम्रवृक्षाच्या बहराकडे नजर गेल्यावाचून राहत नाही. त्याला वेगळे कारण आहे. या वर्षी आंब्याच्या सर्वच झाडांना प्रचंड प्रमाणात बहर आल्याचे दिसत आहे. आंब्याची पाने त्या बहराने झाकून गेली आहेत. शिवरात्रीच्या एक आठवड्याअगोदर आऊस पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात आम्रबहर जमीनदोस्त झाला. तरीही आजच्या स्थितीत आमराईमधील आंब्याची झाडे बहराने फुलून गेल्याचे दिसत आहे. पुढील काळात हवा तुफान मोठ्या प्रमाणात आला नाही. अवकाळी पाऊस झाला नाही तर बहराने फुललेल्या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळ येवू शकतात. हवामानाचा अंदाज लक्षात घेता शिवरात्री झाल्यानंतर वातावरणात फार मोठा बदल होत नाही. म्हणजेच या वर्षी आंब्याच्या वृक्षांना येणारा बहर विक्रमी आहे. बहर गळून पडला नाही तर प्रचंड प्रमाणात आंब्याचे पीक येणार आहे. मागील वर्षी अनेक झाडांना बहरच आलेला नव्हता. त्यामुळे गावरान आंबे महागले होते. लग्नकार्यात आमटी खायला मिळाली नव्हती. आज आम्रवृक्षाच्या बहराची स्थिती लक्षात घेतली तसेच आंब्याच्या पिकाची प्राथमिक अंदाज लक्षात घेता आंब्याचे उत्पादन अधिक होईल. गावागावात आंब्याचे उत्पादन खूप झाले तर नक्कीच आंब्याचे भाव उतरून आंबे स्वस्त होणार आहेत.आमराया झाल्या दिसेनाशादोन अडीच दशकापूर्वी खासगी आमराया बघायला मिळत होत्या. काही सरकारी जागेवर एका ठिकाणी दहा पंधरा आम्रवृक्ष दिसून येत होते. आज त्या आमरायांचे दृष्य बघणे दुर्लभ झाले आहे. आमरायाच्या ठिकाणी शेती केली जात आहे. गावरान आंब्याचे पीक आले की त्याला भाव मिळत नव्हता. खुशालपणे दुसऱ्यांना आंबे तोडण्याची मुभा होती. पण सगळे चित्र आज बदललेले आहे. आमराया नष्ट झाल्या. उत्पादन आंब्याचे कमी होत आहे. काही हौशी शेतकरीच शेती मोडून आम्रबाग लावल्याचे दिसत आहेत. पण ज्या शेतात मोडक जून, नवीन आम्रवृक्ष आहे. त्या आंब्याच्या झाडांना फळे अधिक येणार आहेत. उन्हाळ्यात आता थंड पाण्याने तहान भागविण्यापेक्षा आंब्याच्या रसाने मन प्रसन्न केले जाणार आहे. कच्च्या कैऱ्या खाणाऱ्यांना या वर्षी पर्वणी लाभणार आहे.