शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

रब्बी धानाची रक्कम अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 00:33 IST

रब्बी हंगामात घेतलेल्या धानाची विक्री शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राला केली. आता खरीप हंगाम सुरू झालेला असतानाही खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या...

बळीराजावर संकट : ४० लाखांचे चुकारे थांबले, शेतकऱ्यांमध्ये संतापमुखरु बागडे पालांदूररब्बी हंगामात घेतलेल्या धानाची विक्री शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राला केली. आता खरीप हंगाम सुरू झालेला असतानाही खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या धानाची सुमारे ४० लाखांची रक्कम बळीराजाला दिलेली नाही. त्यामुळे ऐन हंगामातच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून खरेदी केंद्राकडून त्यांची बोळवण होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने हमी दरात बोनसह सेवा सहकारी सोसायटी मार्फत खरेदी केले. दोन हप्त्याचे पेमेंट केवळ हमी दराने मिळाले. बोनस मिळालाच नाही तर उर्वरित महिनाभरातील खरेदीचे सुमारे ४० लक्ष रुपये आजही मिळाले नाही. कर्जाशिवाय जगणे आता शक्यच नसल्याचे पीक कर्ज वाटपावरुन पुढे आले आहे. याकरिता शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचे स्वाभिनाथन समितीने पुढे आणले आहे. मात्र पांढरपेशांच्या दबावाखाली काम करणारे शासन-प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागत नाही हे बळीराजाचे खरे दुर्देव आहे. सगळे व्यवहार नगदीवर आले असतांना बळीराजाचे पीक उधारीवर का खरेदी केले जाते हे अनाकलनीय आहे. लोकशाहीत बळीराजाच्या हिताकरिता कायदेच नाहीत का? आम्ही गुलामच म्हणून लाचार जगायचे का? कर्जात जन्मून कर्जातच मरायचे का? केवळ मतदानाकरिताच आमचा उपयोग का? आदी प्रश्नांनी बळीराजा व त्यांचा परिवार चिंताग्रस्त आहे. खरीप हंगाम जोमात सुरु असुन पेरणी १०० टक्के आटोपून रोवणी ५० टक्केच्यावर आटोपत आली आहे. बियाणे, खते, मंजुरी, औषधी नगदी खरेदी करावी लागतात. उधारीवर खरेदी केल्यास फसवणूक शक्य आहे. नाईलाजाने जमेल तिथून आर्थिक जुळवाजुळव करुन अपेक्षीत खरेदी न करता तुटपुंजी खरेदी सुरु आहे. याचे वास्तव कृषी केंद्राच्या व्यवहारावरुन उजागर होत आहे. रासायनिक खतांचे दर कमी होऊन १५ दिवसांच्या वर झाले पंरतु एकाही अधिकाऱ्याने म्हणा किंवा पुढाकाऱ्याने पुढे येत प्रत्यक्ष विक्रीची चौकशी केली नाही. कित्येक अधिकाऱ्यांना तर कोणला खताचे किती दर कमी झाले हे सुध्दा माहित नाही. यावरुन शासनाची प्रशासनावर किती पकड आहे हे सिध्द होते. कृषिप्रधान देशात बळीराजाचे अस्तीत्व शिखरावर असायला हवे. परंतू इथे तर सर्वात शेवटच्या टोकावर बळीराजा शेवटची घटका मोजत आहे. शेतकऱ्यांचे शोषण सर्वच स्तरातून सुरु आहे. चालू वर्षात धानाचे भाव ६० रुपयांनी वाढवून हमी भाव १४१० वरुन १४७० केल्या गेले. खरचं वाढत्या महागाईच्या तुलनेत किंवा सातव्या वेतन आयोगाच्या स्तरावर धानाचे मोल ठरवल्या गेले का? असा प्रश्न आर्थिक चिकित्सकांना पडला आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय क्षणात व्हायला नवल नसावे. परंतू हे घडत नाही हेच धान उत्पादकांचे दुर्देव आहे. पावसाळी अधिवेशन सुरु आहे. बळीराजा मात्र स्वत:च्या अस्तित्वाकरिता शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढत आहे. तेव्हा प्रशासनाने तात्काळ धानाचे चुकारे देवून बळीराजांची बोळवण थांबवावी अशी मागणी होत आहे.