शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

रब्बी धानाची रक्कम अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 00:33 IST

रब्बी हंगामात घेतलेल्या धानाची विक्री शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राला केली. आता खरीप हंगाम सुरू झालेला असतानाही खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या...

बळीराजावर संकट : ४० लाखांचे चुकारे थांबले, शेतकऱ्यांमध्ये संतापमुखरु बागडे पालांदूररब्बी हंगामात घेतलेल्या धानाची विक्री शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राला केली. आता खरीप हंगाम सुरू झालेला असतानाही खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या धानाची सुमारे ४० लाखांची रक्कम बळीराजाला दिलेली नाही. त्यामुळे ऐन हंगामातच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून खरेदी केंद्राकडून त्यांची बोळवण होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने हमी दरात बोनसह सेवा सहकारी सोसायटी मार्फत खरेदी केले. दोन हप्त्याचे पेमेंट केवळ हमी दराने मिळाले. बोनस मिळालाच नाही तर उर्वरित महिनाभरातील खरेदीचे सुमारे ४० लक्ष रुपये आजही मिळाले नाही. कर्जाशिवाय जगणे आता शक्यच नसल्याचे पीक कर्ज वाटपावरुन पुढे आले आहे. याकरिता शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचे स्वाभिनाथन समितीने पुढे आणले आहे. मात्र पांढरपेशांच्या दबावाखाली काम करणारे शासन-प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागत नाही हे बळीराजाचे खरे दुर्देव आहे. सगळे व्यवहार नगदीवर आले असतांना बळीराजाचे पीक उधारीवर का खरेदी केले जाते हे अनाकलनीय आहे. लोकशाहीत बळीराजाच्या हिताकरिता कायदेच नाहीत का? आम्ही गुलामच म्हणून लाचार जगायचे का? कर्जात जन्मून कर्जातच मरायचे का? केवळ मतदानाकरिताच आमचा उपयोग का? आदी प्रश्नांनी बळीराजा व त्यांचा परिवार चिंताग्रस्त आहे. खरीप हंगाम जोमात सुरु असुन पेरणी १०० टक्के आटोपून रोवणी ५० टक्केच्यावर आटोपत आली आहे. बियाणे, खते, मंजुरी, औषधी नगदी खरेदी करावी लागतात. उधारीवर खरेदी केल्यास फसवणूक शक्य आहे. नाईलाजाने जमेल तिथून आर्थिक जुळवाजुळव करुन अपेक्षीत खरेदी न करता तुटपुंजी खरेदी सुरु आहे. याचे वास्तव कृषी केंद्राच्या व्यवहारावरुन उजागर होत आहे. रासायनिक खतांचे दर कमी होऊन १५ दिवसांच्या वर झाले पंरतु एकाही अधिकाऱ्याने म्हणा किंवा पुढाकाऱ्याने पुढे येत प्रत्यक्ष विक्रीची चौकशी केली नाही. कित्येक अधिकाऱ्यांना तर कोणला खताचे किती दर कमी झाले हे सुध्दा माहित नाही. यावरुन शासनाची प्रशासनावर किती पकड आहे हे सिध्द होते. कृषिप्रधान देशात बळीराजाचे अस्तीत्व शिखरावर असायला हवे. परंतू इथे तर सर्वात शेवटच्या टोकावर बळीराजा शेवटची घटका मोजत आहे. शेतकऱ्यांचे शोषण सर्वच स्तरातून सुरु आहे. चालू वर्षात धानाचे भाव ६० रुपयांनी वाढवून हमी भाव १४१० वरुन १४७० केल्या गेले. खरचं वाढत्या महागाईच्या तुलनेत किंवा सातव्या वेतन आयोगाच्या स्तरावर धानाचे मोल ठरवल्या गेले का? असा प्रश्न आर्थिक चिकित्सकांना पडला आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय क्षणात व्हायला नवल नसावे. परंतू हे घडत नाही हेच धान उत्पादकांचे दुर्देव आहे. पावसाळी अधिवेशन सुरु आहे. बळीराजा मात्र स्वत:च्या अस्तित्वाकरिता शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढत आहे. तेव्हा प्रशासनाने तात्काळ धानाचे चुकारे देवून बळीराजांची बोळवण थांबवावी अशी मागणी होत आहे.