शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शेतकऱ्यांचा आमदारांना घेराव

By admin | Updated: August 26, 2014 23:15 IST

भारनियमनाच्या मुद्दयावरून पाच गावातील शेतकऱ्यांनी आमदारांना काल सोमवारी घेराव घातला. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली. तुमसर तालुक्यातील उमरवाडा,

सहा गावात तलाव नाही : नियमित पाणी द्यातुमसर : भारनियमनाच्या मुद्दयावरून पाच गावातील शेतकऱ्यांनी आमदारांना काल सोमवारी घेराव घातला. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली. तुमसर तालुक्यातील उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी, माडगी व पिपरा या गावात साधा मालगुजारी तलाव नाही. बारमाही वाहणारी वैनगंगेचा फायदा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना मुळीच होत नाही, बावनथडी प्रकल्पाची कामे रखडलेली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार केवळ आठ तास पाण्याचा उपसा विहिरीतून व अन्य जलाशयातून करण्याचे फर्मान आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. सर्वाेच्च न्यायालयाने तशा सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री विजपुरवठा करण्याचे वेळापत्रक जारी केले आहे. सकाळचे वेळापत्रकात सलग आठ तासाऐवजी केवळ सहाच तास विज पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाड हे कारण येथे पुढे केले जाते तर रात्री १२.३० पासून सकाळी ८.३० पर्यत वीजपुरवठा दुसऱ्या आठवड्यात होते. रात्री वीज सुरू करण्याकरिता बांधावर कसे जावे असा प्रश्न या गावातील नागरिकांनी आ. अनिल बावनकरांना केला. सरसकट सकाळ पाळीतच आठ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कृषीपंपधारक शेतकऱ्यांची मीटर रिडींग सहा सहा महिने घेतली जात नाही. सरासरी बिल दिले जाते. बांधावर येथील कर्मचारी जात नाही. पिपरा येथील एका शेतकऱ्याला १९ हजार युनिटचे बिल देण्यात आले. सिंचन सुविधा नसलेल्या गावात १५ ते २० दिवस केवळ सकाळी ८ तास देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)