शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

९९८ कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 18, 2015 00:44 IST

भंडारा जिल्हयाचे मुख्य पीक भात असुन या जिल्हयात रोजगाराच्या इतर दुसरी साधने उपलब्ध नसल्याने शेतकरी पारंपारिक व्यवसाय म्हणून शेती करीत आहेत.

साकोली उपविभागातील प्रकार : भारनियमन सुरूच, लोकप्रतिनिधीचांही कानाडोळासाकोली : भंडारा जिल्हयाचे मुख्य पीक भात असुन या जिल्हयात रोजगाराच्या इतर दुसरी साधने उपलब्ध नसल्याने शेतकरी पारंपारिक व्यवसाय म्हणून शेती करीत आहेत. मात्र या शेतकऱ्यांवर कधी निसर्ग तर कधी विज वितरण कंपनीची दृष्ट छाया कारणीभुत ठरुन शेतकऱ्याची पिळवणूक करतात. साकोली तालुक्याचा विचार केल्यास १० वर्षात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे साकोली, लाखनी व लांखादूर तालुक्यात ९९८ कृषीपंपाना विज जोडणीची प्रतिक्षा आहे. यावरुन शासन शेतकऱ्याच्या हिताचे आहे काय हे समजून येते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. नेहमी दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी व बोरवेल केल्या व याच पाण्याने शेतीचे उत्पन्न घेऊन कर्ज फेडू या आशेने शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीला विज कनेक्शनसाठी अर्ज केला. मात्र दोन दोन वर्षाचा कालावधी लोटुनही शेतकऱ्यांना विज कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेऊन खोदलेल्या विहिरी व बोरवेलचे कर्जही फेडता आले नाही. रोवणी खोळंबलीकृषी पंपाला विज कनेक्शन नसल्याने काही शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून बरेच शेतकरी विजचोरी करतांना दिसतात. रात्री तारावर वायर लावुन पंप सुरु करतानी व दिवसा काढुन टाकतात. त्यामुळे जमिनीत पाणी साचत नाही. परिणामी रोवणी तर खोळंबली आहेच शिवाय ज्यांची रोवणी झाली त्याची पिके पाण्याअभावी वाळत आहे. ही वास्तविक स्थीति विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना दिसत नाही हे आश्चर्यच आहे.चार वर्षानंतर मिळाले ‘कनेक्शन’साकोली परिहार यांची जमनापुर शिवारात शेती आहे. परिहार यांनी सन २०१२ लाच आपल्या शेतात बोरवेल केली व कनेक्शनसाठी अर्ज केला या अर्जानुसार त्यांना डीमांड देण्यात आला. परिहार यांनी २०१२ लाच डिमांड भरला. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना मिटरच मंजुर झाले नाही. हे कारण सांगुन तब्बल ४ वर्षानंतर म्हणजे आॅगस्ट २०१५ मध्ये विद्युत कनेक्शन जोडून दिली अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या शेतकऱ्याला मानसिक त्रासापोटी विजवितरण कंपनीने आर्थिक मदत का करु नये असा सवाल आहे.विद्युत तारांना काठीचा आधारलाखांदूर : ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना शेतकऱ्यांना ुफायदयाची असली तरीपण मागील तीन वर्षापासून ६०० कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन विद्युत खांबाअभावी काठीच्या आधाराने सुरु असल्याने भर पावसात जिव टांगणीला टाकुन शेतकऱ्यांना कृषी पंप सुरु करण्याची पाळी आली आहे.तालूक्यात सिंचनासाठी विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. त्यासाठी विद्युत कनेक्शन आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिर बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण करीत. तब्बल ६०० सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. त्यासाठी शासनाने विद्युत विभागाने महावितरण आपल्या दारी ही महत्वपूर्ण योजना सुरु करुन प्रत्येक कृषी पंप धारकाला मागणीनुसार विद्युत कनेक्शन देण्यासाठी पूढाकार घेतला. गरज महत्वाची असल्याने अनेकाना अर्ज करुन तात्काळ विद्युत कनेक्शनची मागणी केल्या. पंरतू विद्युत खांबाला पूरवठा नसल्याने व विद्युत कनेक्शनचा मागणी असल्याने या विभागाने तात्काळ सेवा देण्याच्या हेतूने काठीचा आधार घेत विद्युत खांब देण्याची प्रतिक्षा न करता कृषी पंपाचा विद्युत पूरवठा सन २०१३-१५ या वर्षी केला. तीन वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप विद्युत खांबाला पूरवठा न झाल्याने भर पावसात शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून लोड शेडिगंच्या नावावर रात्री शेतात कृषी पंप सुरु करण्यासाठी जावे लागते. एकीकडे काठीच्या आधाराने विजेच्या तारा लोंबकळत असतांनी शेतकऱ्यांनी पर्वा न करता मागील तीन वर्षापासून शेती केली परंतु विद्युत खांबाला पुरवठा करण्यात आला नाही. (तालुका प्रतिनिधी)