शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

७.६८ लाख पाठय़पुस्तके पोहोचले

By admin | Updated: May 29, 2014 23:45 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात ११ लाख ३८ हजार ३२ विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळणार आहेत. सद्यस्थितीत सातही तालुक्यात सात लाख ६७ हजार ७५४ पाठय़पुस्तके पोहचलेली आहेत.

११.३८ लाख पुस्तकांची मागणी : उर्वरित पुस्तकांचे वाटप लवकरच देवानंद नंदेश्‍वर - भंडाराभंडारा : सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात ११ लाख ३८ हजार ३२ विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळणार आहेत. सद्यस्थितीत सातही तालुक्यात सात लाख ६७ हजार ७५४ पाठय़पुस्तके पोहचलेली आहेत. तीन लाख ७0 हजार २७८ पुस्तके येणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके देण्याच्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आलेले आहे.मागीलवर्षी विद्यार्थी संख्येनुसार  बालभारतीकडे पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यावर्षीही बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वितरण करण्यात येणार आहे. बालभारतीकडून संपूर्ण पुस्तके सातही पंचायत समितीत पोहोचविण्यात येत आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भार कमी झाले आहे.दरम्यान, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातंर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत. इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही मुल पाठय़पुस्तकांपासून वंचित राहू नये, पाठय़पुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठय़पुस्तके योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी जिल्ह्यात ८ लाख २ हजार ७४ पाठय़पुस्तके तर ३ लाख ३५ हजार ९५८ स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप होणार आहे. सद्यस्थितीत सातही तालुक्यात सात लाख ६७ हजार ७५४ पाठय़पुस्तके पोहचली आहेत. भंडारा तालुक्यासाठी १ लाख ५३ हजार १३२, लाखांदूर ७६ हजार ७४0, लाखनी ८४ हजार ८२, मोहाडी ९२ हजार ६४४, पवनी १ लाख ९ हजार ८२0, साकोली ८४ हजार २१७ आणि तुमसर तालुक्यात १ लाख ३९ हजार ५२५, असे एकूण ७ लाख ४0 हजार १६0 पाठय़पुस्तके आणि लाखांदूर तालुक्यात २७ हजार ५९४ स्वाध्याय पुस्तिका प्राप्त झाल्या आहेत. यात ६१ हजार ९१४ पाठय़पुस्तिका तर ३ लाख ८ हजार ३६४ स्वाध्याय पुस्तिकांचा समावेश आहे. अप्राप्त पाठय़पुस्तकांमध्ये  इयत्ता तिसरीच्या १५ हजार ७0१, चवथीच्या ३१ हजार ७९८, पाचवीच्या  १४ हजार ४१५ पाठय़पुस्तकांचा समावेश आहे. प्राप्त पाठय़पुस्तकांची टक्केवारी ९२.२८ टक्के तर स्वाध्याय पुस्तिकांची टक्केवारी ८.२१ एवढी आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, अनुदानित अथवा अंशत: अनुदानित खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर पाठय़पुस्तके पुरविण्यात येणार आहे. शाळा उघडण्याच्या ७ दिवसांपूर्वी ही पुस्तके संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात देण्यात येतील.शाळेच्या पहिल्याच दिवशी पदाधिकार्‍यांच्या हस्ते पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यात येईल. शाळेची पहिली घंटा २६ जूनला वाजणार आहे. यावर्षी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी स्वाध्यायपुस्तिका नाहीत. त्या केवळ सहावी ते आठवीसाठी मागविण्यात आलेल्या आहेत. १२ जूनपर्यंत उर्वरित सर्व पुस्तिका शाळेपर्यंत पोहचतील, असा विश्‍वास शिक्षण विभागाला आहे.