शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

५,६०६ रक्तपिशव्यातून जीवनदान

By admin | Updated: October 1, 2015 00:54 IST

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून ९ महिन्यांमध्ये ३७१ सिकलसेलग्रस्तांना रक्ताचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला

रक्तदान दिन आज : नऊ महिन्यात सहा हजार ६७९ रक्त पिशव्यांचे संकलनदेवानंद नंदेश्वर भंडाराभंडारा : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून ९ महिन्यांमध्ये ३७१ सिकलसेलग्रस्तांना रक्ताचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला. थॅलेसिमिया रुग्णांसाठी ३७८, तसेच ब्लड आॅन कॉल अंतर्गत ५८७ रुग्णांना रक्तपिशव्या देण्यात आले़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीअंतर्गत ९ महिन्यांमध्ये १२० शिबिरे घेण्यात आली़ रक्तासाठी आधी रक्तदानाची अट नसली तरी रक्तदान प्रत्येकाने करायलाच पाहिजे, यासाठी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला प्रोत्साहित केले जाते. सोबतच विविध रक्तदान शिबिरातून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे अधिकारी विविध शिबिरांच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व पटवून देत असतात. रक्तगटांपैकी निगेटीव्ह असलेले सर्वच रक्तगट हे दुर्मिळ आहेत. अशा रुग्णांसाठी कधीही रक्ताची गरज निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येक निगेटीव्ह गटाचे रक्त रक्तपेढीत राखीव करुन ठेवले जातात. जवळपास तीन टक्के लोक निगेटीव्ह रक्तगटात मोडतात. ओ, ए, बी निगेटीव्ह रक्तगटाची मागणी सारखीच होत असते. कधीकधी यापैकी रक्तगट उपलब्ध राहत नाही. अशावेळी मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होत असते. तेव्हा नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला बोलावून साठा पूर्ण केला जातो. दरवर्षी रक्ताचा पुरवठा नियमित होत असला तरी उन्हाळ्यात मात्र रक्ताची टंचाई जाणवत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांवर भटकंतीची वेळ येते. मार्च ते जुलै या कालावधीत रक्तदान शिबिर होत नाहीत. याच कारणामुळे रक्ताची टंचाई भासते. हा कालावधी सुट्यांचा, लग्नाच्या धामधुमीचा असतो. अपघातही याच कालावधीत घडतात.रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. मात्र त्याचवेळी रक्तपेढीत रक्त उपलब्ध राहत नाही. परिणामी, रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी रक्तपेढीकडून शिबिरांचे आयोजन केले जातात. नियमित रक्तदात्यांना संपर्क करुन रक्ताची व्यवस्था केली जाते. नेमके याचवेळी महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आवश्यक असतो. परंतु, त्यांचा सहभाग नसतो. रक्ताअभावी रुग्णांचा जीव जाण्याची भीती असते.रक्तदान ही चळवळ होणे गरजेचेसमाजात रक्तदानाबाबत जागृती झाली असली तरी ती पूर्णपणे नाही. आजही रक्तदानाबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे ते रक्तदान करण्यासाठी धजावत नाही. यासाठी रक्तदान ही चळवळ होणे आवश्यक आहे. कालपरवापर्यंत मोजक्या संघटन रक्तदान शिबिरांचे आयोजन करायचे. आता आयोजक वाढले आहेत. या संस्थांकडे प्रत्येक गटाच्या रक्तदात्याची सूची आहे. शहरातील अनेक संस्था नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. काही स्वयंसेवी रक्तदाते दर तीन महिन्यानी स्वेच्छा रक्तदान करतात. नियमित रक्तदान करणाऱ्या संस्थांमध्ये रविंद्रनाथ टागोर युवा मंच, अशोक लेलँड, गणेशपूर उत्सव मंडळ, डॉ.बांडेबुचे, लॉयन्स क्लब तुमसर, श्री संप्रदाय मंडळ, शेप महाबचत, छावा संग्राम परिषद, सिंधी वेलफेअर असोसिएशन आदी संस्थांची नावे आघाडीवर आहेत. रक्तदानासाठी शिबिरे घेतली जातात. परंतु, रक्तदानाविषयी महाविद्यालयीन तरुणांमध्ये कमालीची उदासिनता दिसून येत आहे. कोणत्याही ठराविक वेळेस लोकसंख्येच्या एक टक्के रक्तदान केले तर सर्व रुग्णांची गरज भागू शकते. परंतु, तेवढेही रक्त संकलन होत नाही. शहरातील महाविद्यालयात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आहेत. परंतु, रक्तदानाविषयी ते जागृत नाही. महाविद्यालयीन तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे. -डॉ.मदन काटे, रक्त संक्रमण अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा.