शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

५,६०६ रक्तपिशव्यातून जीवनदान

By admin | Updated: October 1, 2015 00:54 IST

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून ९ महिन्यांमध्ये ३७१ सिकलसेलग्रस्तांना रक्ताचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला

रक्तदान दिन आज : नऊ महिन्यात सहा हजार ६७९ रक्त पिशव्यांचे संकलनदेवानंद नंदेश्वर भंडाराभंडारा : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून ९ महिन्यांमध्ये ३७१ सिकलसेलग्रस्तांना रक्ताचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला. थॅलेसिमिया रुग्णांसाठी ३७८, तसेच ब्लड आॅन कॉल अंतर्गत ५८७ रुग्णांना रक्तपिशव्या देण्यात आले़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीअंतर्गत ९ महिन्यांमध्ये १२० शिबिरे घेण्यात आली़ रक्तासाठी आधी रक्तदानाची अट नसली तरी रक्तदान प्रत्येकाने करायलाच पाहिजे, यासाठी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला प्रोत्साहित केले जाते. सोबतच विविध रक्तदान शिबिरातून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे अधिकारी विविध शिबिरांच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व पटवून देत असतात. रक्तगटांपैकी निगेटीव्ह असलेले सर्वच रक्तगट हे दुर्मिळ आहेत. अशा रुग्णांसाठी कधीही रक्ताची गरज निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येक निगेटीव्ह गटाचे रक्त रक्तपेढीत राखीव करुन ठेवले जातात. जवळपास तीन टक्के लोक निगेटीव्ह रक्तगटात मोडतात. ओ, ए, बी निगेटीव्ह रक्तगटाची मागणी सारखीच होत असते. कधीकधी यापैकी रक्तगट उपलब्ध राहत नाही. अशावेळी मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होत असते. तेव्हा नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला बोलावून साठा पूर्ण केला जातो. दरवर्षी रक्ताचा पुरवठा नियमित होत असला तरी उन्हाळ्यात मात्र रक्ताची टंचाई जाणवत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांवर भटकंतीची वेळ येते. मार्च ते जुलै या कालावधीत रक्तदान शिबिर होत नाहीत. याच कारणामुळे रक्ताची टंचाई भासते. हा कालावधी सुट्यांचा, लग्नाच्या धामधुमीचा असतो. अपघातही याच कालावधीत घडतात.रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. मात्र त्याचवेळी रक्तपेढीत रक्त उपलब्ध राहत नाही. परिणामी, रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी रक्तपेढीकडून शिबिरांचे आयोजन केले जातात. नियमित रक्तदात्यांना संपर्क करुन रक्ताची व्यवस्था केली जाते. नेमके याचवेळी महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आवश्यक असतो. परंतु, त्यांचा सहभाग नसतो. रक्ताअभावी रुग्णांचा जीव जाण्याची भीती असते.रक्तदान ही चळवळ होणे गरजेचेसमाजात रक्तदानाबाबत जागृती झाली असली तरी ती पूर्णपणे नाही. आजही रक्तदानाबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे ते रक्तदान करण्यासाठी धजावत नाही. यासाठी रक्तदान ही चळवळ होणे आवश्यक आहे. कालपरवापर्यंत मोजक्या संघटन रक्तदान शिबिरांचे आयोजन करायचे. आता आयोजक वाढले आहेत. या संस्थांकडे प्रत्येक गटाच्या रक्तदात्याची सूची आहे. शहरातील अनेक संस्था नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. काही स्वयंसेवी रक्तदाते दर तीन महिन्यानी स्वेच्छा रक्तदान करतात. नियमित रक्तदान करणाऱ्या संस्थांमध्ये रविंद्रनाथ टागोर युवा मंच, अशोक लेलँड, गणेशपूर उत्सव मंडळ, डॉ.बांडेबुचे, लॉयन्स क्लब तुमसर, श्री संप्रदाय मंडळ, शेप महाबचत, छावा संग्राम परिषद, सिंधी वेलफेअर असोसिएशन आदी संस्थांची नावे आघाडीवर आहेत. रक्तदानासाठी शिबिरे घेतली जातात. परंतु, रक्तदानाविषयी महाविद्यालयीन तरुणांमध्ये कमालीची उदासिनता दिसून येत आहे. कोणत्याही ठराविक वेळेस लोकसंख्येच्या एक टक्के रक्तदान केले तर सर्व रुग्णांची गरज भागू शकते. परंतु, तेवढेही रक्त संकलन होत नाही. शहरातील महाविद्यालयात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आहेत. परंतु, रक्तदानाविषयी ते जागृत नाही. महाविद्यालयीन तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे. -डॉ.मदन काटे, रक्त संक्रमण अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा.