शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

५५ लक्ष रूपयांचे चुकारे अडले

By admin | Updated: September 6, 2014 23:31 IST

येथील खरेदी विक्री असोशिएशन व लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या माध्यमातून दोन ठिकाणी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले होती. या दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचे

शेतकरी आर्थिक संकटात : धान खरेदी केंद्राने दिला दगामुकेश देशमुख - दिघोरी मोठीयेथील खरेदी विक्री असोशिएशन व लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या माध्यमातून दोन ठिकाणी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले होती. या दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचे तब्बल ५५ लक्ष रूपये शिल्लक असल्याने ९० दिवसांचा कालावधी होत असला तरी अजुनपर्यंत शेतकऱ्यांचे चुकारे मिळाले नसल्याने दिघोरीतील शेतकरी ‘धान खरेदी केंद्राने दिला दगा व वाजले बारा’ , असे बोलावयास लागले आहेत.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच राजकीय पुढारी शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्याची लुबाडणूक होऊ नये, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचवावा, यासाठी शेतकऱ्यांची अडचण समजून घेत नाही.शेतकऱ्यांनी शासनाला संकटकाळी हाक मारली आहे. परंतु त्यांच्या घामाचा व हक्काचा पैसा शासनाने का अडकवून ठेवावे, हे एक न उलगडणारे कोडे आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. शेती ही भारताचा कणा आहे, असे शब्द फक्त भाषणापुरते मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जातीने लक्ष देवून कामे ठरणे ही काळाची गरज आहे.एकीकडे शासन शासकीय कर्मचाऱ्यांना वारंवार पगारवाढ देतो, वेतन आयोग लागू करतो, कर्मचाऱ्यांचे महिन्याच्या महिन्याला बरोबर पगार होतात मग शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी ाशसनाजवळ निधी नाही का, असा सवाल शेतकरी करीत आहेत. मग शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रात धान विकण्यापेक्षा खाजगी व्यापाऱ्यांना धान विकणे सोयीस्कर ठरले आहे.उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू व्हावा यासाठी जिल्ह्यातील नामवंत पुढाऱ्यांनी निकराचे प्रयत्न करून धान खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाला भाग पाडले. मग शेतकऱ्यांचे चुकारे मिळावे यासाठी हे पुढारी का प्रयत्न करीत नाही, कुठे गेला यांचा पुढारीपणा, असा गंभीर आरोप दिघोरीत शेतकरी करीत आहेत. शासनाने आतातरी जागे होवून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे चुकारे देणे काळाची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही व त्याला कुणीही वाचवू शकणार नाही.