शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

५५ लक्ष रूपयांचे चुकारे अडले

By admin | Updated: September 6, 2014 23:31 IST

येथील खरेदी विक्री असोशिएशन व लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या माध्यमातून दोन ठिकाणी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले होती. या दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचे

शेतकरी आर्थिक संकटात : धान खरेदी केंद्राने दिला दगामुकेश देशमुख - दिघोरी मोठीयेथील खरेदी विक्री असोशिएशन व लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या माध्यमातून दोन ठिकाणी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले होती. या दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचे तब्बल ५५ लक्ष रूपये शिल्लक असल्याने ९० दिवसांचा कालावधी होत असला तरी अजुनपर्यंत शेतकऱ्यांचे चुकारे मिळाले नसल्याने दिघोरीतील शेतकरी ‘धान खरेदी केंद्राने दिला दगा व वाजले बारा’ , असे बोलावयास लागले आहेत.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच राजकीय पुढारी शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्याची लुबाडणूक होऊ नये, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचवावा, यासाठी शेतकऱ्यांची अडचण समजून घेत नाही.शेतकऱ्यांनी शासनाला संकटकाळी हाक मारली आहे. परंतु त्यांच्या घामाचा व हक्काचा पैसा शासनाने का अडकवून ठेवावे, हे एक न उलगडणारे कोडे आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. शेती ही भारताचा कणा आहे, असे शब्द फक्त भाषणापुरते मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जातीने लक्ष देवून कामे ठरणे ही काळाची गरज आहे.एकीकडे शासन शासकीय कर्मचाऱ्यांना वारंवार पगारवाढ देतो, वेतन आयोग लागू करतो, कर्मचाऱ्यांचे महिन्याच्या महिन्याला बरोबर पगार होतात मग शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी ाशसनाजवळ निधी नाही का, असा सवाल शेतकरी करीत आहेत. मग शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रात धान विकण्यापेक्षा खाजगी व्यापाऱ्यांना धान विकणे सोयीस्कर ठरले आहे.उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू व्हावा यासाठी जिल्ह्यातील नामवंत पुढाऱ्यांनी निकराचे प्रयत्न करून धान खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाला भाग पाडले. मग शेतकऱ्यांचे चुकारे मिळावे यासाठी हे पुढारी का प्रयत्न करीत नाही, कुठे गेला यांचा पुढारीपणा, असा गंभीर आरोप दिघोरीत शेतकरी करीत आहेत. शासनाने आतातरी जागे होवून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे चुकारे देणे काळाची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही व त्याला कुणीही वाचवू शकणार नाही.