शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त भूसंपादनाने ५०० कोटींचा भुर्दंड

By admin | Updated: December 23, 2014 22:59 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

भंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी काही जमिनींचा मोबदला देण्यात आला असून अनेक शेतकऱ्यांनी मोबदला घेण्यासाठी नकार दिला आहे. तथापि चुकीचे सर्व्हेक्षणामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होऊन शासनावर सुमारे ५०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे. परिणामी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी शेतकरी आणि जमिनमालकांनी पत्रपरिषदेत केली.विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी काही जमिनींचा मोबदला देण्यात आला असून अनेक शेतकऱ्यांनी मोबदला घेण्यासाठी नकार दिला आहे. तथापि चुकीचे सर्व्हेक्षणामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होऊन शासनावर सुमारे ५०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे. परिणामी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी शेतकरी आणि जमिनमालकांनी पत्रपरिषदेत केली.गोसेखुर्द प्रकल्पातील धरणाच्या जलशयाची महत्तम पातळी २४५.५ मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. शासन आणि विभागाच्या तांत्रिक अहवालानुसार ही पातळी गृहीत धरून बाधीत क्षेत्रातील जमिनीचे संपादन करावयाचे होते. जलाशयाचे बॅकवॉटर जोपर्यंत पोहचेल त्यानुसार बाधितक्षेत्र ठरवून अधिग्रहण करणे गरजेचे होते. मात्र गोसेखुर्द प्रकल्पाच्या अभियंत्यांनी धरणाच्या जलाशयाची पातळी २४६ मीटर दर्शवून त्यानुसार शेतजमिनीची मार्किंग करीत संपादनाची कारवाई केली. भंडारा व पवनी तालुक्यातील १९३ गावांमधील सुमारे १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट झाली. २४५.५ मीटर पातळीचा आधार घेऊन शेतजमीन संपादित करावयाची असताना अर्धा मीटरने पातळी अधिक दर्शवून अतिरिक्त २० टक्के जमिन संपादित करण्यात आली. सिंचन विभागाच्या निकषानुसार ज्या गावातील ७५ टक्के शेतजमीन आणि घरे बाधित होतात त्याच गावाचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात येते. परंतु शेती आणि घरे अंशत: बाधित होत असलेल्या गावांचेही पुनर्वसन करण्यात येत असून शेतकऱ्यांना विस्थापित केले जात असल्याचा आरोप आहे. अशा गावांच्या पुनर्वसनाकरिता दुसरीकडे जागा संपादित करण्यापासून ते पुनर्वसन कामासाठी सरकारी तिजोरीवर कोट्यवधीचा भुर्दंड बसल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही शेतजमीनी बाधीत होत असल्याचे नोंद गोसेखुर्द पुनर्वसन विभागात असून या कार्यालयातर्फे तसे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र बाधीत क्षेत्र म्हणून त्याच गटाची नोंद भूसंपादन कार्यालयात आहे. गोसे विभागाने तयार केलेल्या नकाशानुसार काही गटातील शेतजमीन अंशत: बाधीत होत असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी संपूर्ण गट बाधीत दाखवून अधिग्रहीत करण्यात आले आहे. अतिरिक्त संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे, बाधीत क्षेत्रात येत नसलेल्या जमिनी मोकळ्या करून त्यांची खरेदी विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासकीय स्तरावर निर्णय न झाल्यास न्यायालयात याचिका टाकणार असल्याचे महादेव मेश्राम, धनंजय मुलकलवार, विनोद बांते, केवळराम वाढई, सुनिल बांते, पद्माकर पनके, वामन पंचबुद्धे व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)