शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा

By admin | Updated: October 27, 2016 00:26 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे.

तलावात ५६ टक्के पाणी : उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकेतभंडारा : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे. जिल्हा प्रशासनाने वेळेपूर्वीच दखल घेतल्यास त्यावर काही प्रमाणात अंकुश लावता येईल. माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत एकुण ६३ प्रकल्प आहेत. यापैकी मध्यम प्रकल्प चार असून पाण्याचा उपयुक्त साठा ११.२५५ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २६.२९ इतकी आहे. जिल्ह्यात जुने मालगुजारी तलाव २८ आहेत. त्यामध्ये ५६.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाही तलावात १०० टक्के जलसाठा नाही. तसेच ७५ टक्क्यापेक्षा जास्त जलसाठा असलेल्या तलावांची संख्या ८ आहे. परिणामी भविष्यात जनावरांसाठीही पाण्याची सुविधा कशी करावी असा प्रश्न उपस्थित होईल यात शंका नाही. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा २१.५१२ दलघमी असून त्याची टक्केवारी ४०.१८ इतकी आहे. या लघुप्रकल्पांपैकी फक्त १ प्रकल्प तुडूंब भरला आहे. तो प्रकल्प लाखनी तालुक्यातील वाकल येथील आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जलसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या चार इतकी आहे. तसेच ९० ते ९९ टक्के जलसाठा असलेला फक्त एक प्रकल्प आहे. पूर्ण ६३ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठा ४७.०३७ दलघमी असून त्याची टक्केवारी ३८.६४ टक्के आहे.सन २०१४ मध्ये याच दिवशी सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याची टक्केवारी २४.८१८ दलघमी होती. तर सन २०१५ मध्ये हीच टक्केवारी २४.०६ टक्के इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पांमध्ये जलसाठ्याची टक्केवारी १४ टक्क्याने वाढली असली तरी भविष्यात पाण्याची टंचाई भासणार हे निश्चित आहे. परतीच्या पावसामुळे या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु परतीचा पाऊस सर्वत्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. धान खरेदी केंद्र सुरु झाले असले तरी भारी धानाची कापणी झालेली नाही. (प्रतिनिधी)