शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा

By admin | Updated: October 27, 2016 00:26 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे.

तलावात ५६ टक्के पाणी : उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकेतभंडारा : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे. जिल्हा प्रशासनाने वेळेपूर्वीच दखल घेतल्यास त्यावर काही प्रमाणात अंकुश लावता येईल. माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत एकुण ६३ प्रकल्प आहेत. यापैकी मध्यम प्रकल्प चार असून पाण्याचा उपयुक्त साठा ११.२५५ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २६.२९ इतकी आहे. जिल्ह्यात जुने मालगुजारी तलाव २८ आहेत. त्यामध्ये ५६.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाही तलावात १०० टक्के जलसाठा नाही. तसेच ७५ टक्क्यापेक्षा जास्त जलसाठा असलेल्या तलावांची संख्या ८ आहे. परिणामी भविष्यात जनावरांसाठीही पाण्याची सुविधा कशी करावी असा प्रश्न उपस्थित होईल यात शंका नाही. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा २१.५१२ दलघमी असून त्याची टक्केवारी ४०.१८ इतकी आहे. या लघुप्रकल्पांपैकी फक्त १ प्रकल्प तुडूंब भरला आहे. तो प्रकल्प लाखनी तालुक्यातील वाकल येथील आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जलसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या चार इतकी आहे. तसेच ९० ते ९९ टक्के जलसाठा असलेला फक्त एक प्रकल्प आहे. पूर्ण ६३ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठा ४७.०३७ दलघमी असून त्याची टक्केवारी ३८.६४ टक्के आहे.सन २०१४ मध्ये याच दिवशी सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याची टक्केवारी २४.८१८ दलघमी होती. तर सन २०१५ मध्ये हीच टक्केवारी २४.०६ टक्के इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पांमध्ये जलसाठ्याची टक्केवारी १४ टक्क्याने वाढली असली तरी भविष्यात पाण्याची टंचाई भासणार हे निश्चित आहे. परतीच्या पावसामुळे या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु परतीचा पाऊस सर्वत्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. धान खरेदी केंद्र सुरु झाले असले तरी भारी धानाची कापणी झालेली नाही. (प्रतिनिधी)