शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा

By admin | Updated: October 27, 2016 00:26 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे.

तलावात ५६ टक्के पाणी : उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकेतभंडारा : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे. जिल्हा प्रशासनाने वेळेपूर्वीच दखल घेतल्यास त्यावर काही प्रमाणात अंकुश लावता येईल. माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत एकुण ६३ प्रकल्प आहेत. यापैकी मध्यम प्रकल्प चार असून पाण्याचा उपयुक्त साठा ११.२५५ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २६.२९ इतकी आहे. जिल्ह्यात जुने मालगुजारी तलाव २८ आहेत. त्यामध्ये ५६.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाही तलावात १०० टक्के जलसाठा नाही. तसेच ७५ टक्क्यापेक्षा जास्त जलसाठा असलेल्या तलावांची संख्या ८ आहे. परिणामी भविष्यात जनावरांसाठीही पाण्याची सुविधा कशी करावी असा प्रश्न उपस्थित होईल यात शंका नाही. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा २१.५१२ दलघमी असून त्याची टक्केवारी ४०.१८ इतकी आहे. या लघुप्रकल्पांपैकी फक्त १ प्रकल्प तुडूंब भरला आहे. तो प्रकल्प लाखनी तालुक्यातील वाकल येथील आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जलसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या चार इतकी आहे. तसेच ९० ते ९९ टक्के जलसाठा असलेला फक्त एक प्रकल्प आहे. पूर्ण ६३ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठा ४७.०३७ दलघमी असून त्याची टक्केवारी ३८.६४ टक्के आहे.सन २०१४ मध्ये याच दिवशी सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याची टक्केवारी २४.८१८ दलघमी होती. तर सन २०१५ मध्ये हीच टक्केवारी २४.०६ टक्के इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पांमध्ये जलसाठ्याची टक्केवारी १४ टक्क्याने वाढली असली तरी भविष्यात पाण्याची टंचाई भासणार हे निश्चित आहे. परतीच्या पावसामुळे या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु परतीचा पाऊस सर्वत्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. धान खरेदी केंद्र सुरु झाले असले तरी भारी धानाची कापणी झालेली नाही. (प्रतिनिधी)