शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३८ जणांना डेंग्यूची लागण

By admin | Updated: September 6, 2014 23:30 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ३८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्ह्यात ७ जणांचा डेंग्यूने तर एकाचा विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला

आठ रूग्णांचा मृत्यू : १७३ रूग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविलेभंडारा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ३८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्ह्यात ७ जणांचा डेंग्यूने तर एकाचा विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला असून १७३ रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविले आहे.जिल्ह्यात डेंग्यूने मृत्यू झालेल्यांमध्ये राखी भोयर रा. पालोरा, भूमिता गोटेफोडे रा. परसोडी, काजल रंगारी रा. सानगडी, अतिश उपरीकर रा. पळसगांव, आकांक्षा राऊत रा. धानोड, काजल वैद्य रा. देवाडा, विश्वजीत गोपाल जांभूळकर रा. चिचोली यांचा समावेश आहे. जून ते आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात दुषीत पाणीपुरवठा, घाणकचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने यातून अनेक प्रकारचे विषाणूजन्य किटकांची उत्पत्ती होते. पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात अनेकांना विषाणूजन्य आजाराने ग्रासले. जिल्हा आरोग्य विभागाने यातील काहींचे रक्त नमूने घेतले आहे. १७३ रूग्णांचे रक्त नमूने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यातील ३८ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून तो मृत्यू किटकजन्य आजारामुळे झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींमध्ये डेंग्यूची लागण झाली आहे. या गावाच्या ग्रामसेवक व सरपंचांची जनजागृतीच्या संदर्भात जिल्हास्तरावर सभा घेऊन त्यांना डेंग्यूबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती सुरू आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिली जात आहे. यासोबतच उपचार शिबीर व गावांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)बारव्हा परिसरात तापाची साथबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा जैतपूर या गावासह बोथली, धर्मापूरी, खोलमारा, कोदामेळी, तावशी आदी गावात मेंदूज्वर, कावीळ, डेंग्यूसदृष्य आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसापासून बारव्हा परिसरातील गावात तापाच्या तसेच कावीळच्या रुग्णात वाढ झाल्याने खासगी तथा शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना या आजाराची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. अनेक रुग्णांची तपासणी केल्यानंतर सदर रुग्णांमध्ये डेंग्युसदृष्य आजाराची लक्षणे आढळून आली. परिसरातील गावात डेंगूसदृष्य आजाराने कहर केला असून आतापर्यंत ९.१० जणांना याची बाधा झाली असल्याची माहिती आहे.त्यांच्यावर खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. यात धर्मापूरी येथील चिंटू महेश रंधये या आठ वर्षीय बालकाचा समावेश असून त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच तावशी, जैतपूर, कोदामेळी या गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त आहे.मागील पंधरा दिवसापासून तापाच्या रुग्णात वाढ होत असून यावर उपाय योजना करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने बारव्हा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर आजारावर प्रतिबंधक उपचार व्हावे म्हणून गावागावात शिबिर लावून उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच गावात नळयोजनेद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आजारात वाढ होत असल्याची माहिती आहे. बारव्हा जैतपूर येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग शेणखताचे ढिगामुळे डासाची उत्पत्ती होत असून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बारव्हा येथील वॉर्ड क्र. ३ मधील अंगणवाडी समोर जनावरे बांधली जातात आणि आजूबाजूचा परिसर कचऱ्याने वेढलेला आहे. अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना रस्त्याची सुविधा नसल्याने काडी कचऱ्यापासून मार्गक्रमण करावा लागतो. त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास त्यांना डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीतील पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. वरिष्ठांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी आहे.