शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

By admin | Updated: September 9, 2014 00:09 IST

गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील ४८ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या प्रवाहात वाढ होवून जलस्तर वाढत असल्यामुळे काल रात्री १० वाजेपासून सोमवारी

गोसे (बुज.) : गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील ४८ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या प्रवाहात वाढ होवून जलस्तर वाढत असल्यामुळे काल रात्री १० वाजेपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडली होती. आज सकाळी पाऊस कमी झाल्यामुळे दारे कमी करून १५ दारे उघडण्यात आली आहेत.मागील ४८ तासापासून गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात व भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे भंडाराकडून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या प्रवाहात वाढ होवून धरणाचा जलस्तर वाढणे सुरू झाले होते. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका होवू नये याकरीता धरणाचा जलस्तर २३९.२०० मीटरवर स्थिर ठेवून काल रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व ३३ वक्रदारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली होती. या ३३ वक्रदारातून ३,००० घनमीटर पाण्याचा विसर्ग प्रती सेकंद दराने नदी पात्रात होत होता.सोमवारी सकाळपासून पाऊस कमी झाल्यामुळे सकाळी ६ नंतर वक्रदारे कमी करून १५ वक्रदारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत. धरणाचा जलस्तर २३९.२०० मीटर आहे. (वार्ताहर)