शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

तीन वर्षांत २.६० लाख वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:25 IST

शासनाच्या विविध योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागातर्फे सन २०१३ ते २०१५ च्या पावसाळ्यात २ लाख ५९ हजार ८८२ वृक्षांची लागवड करण्यात आली.

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम : सप्ताहात होणार ७.६० लाखांची वृक्ष लागवडदेवानंद नंदेश्वर भंडाराशासनाच्या विविध योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागातर्फे सन २०१३ ते २०१५ च्या पावसाळ्यात २ लाख ५९ हजार ८८२ वृक्षांची लागवड करण्यात आली.भंडारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी व साकोली असे पाच सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचा समावेश आहे. राज्यात सन १९८२ मध्ये शासनाने स्वतंत्र सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली. वाढती लोकसंख्या व वाढते औद्योगिकरण यामुळे वनांविषयी असलेल्या दैनंदिन गरजामुळे उपलब्ध असलेल्या वनांवर पडत असलेला ताण कमी व्हावा, ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच दिवसेंदिवस ढासळत असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये वृक्षांचे असलेले अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करणे तसेच पाणवहाळ, रोहयो, मग्रारोहयो, कालवे आदी विविध योजनेंतर्गत सामूहिक, खासगी पडीत जमिनीवर वृक्ष लागवड, रस्ते दुतर्फा वृक्ष लागवड, शाळेच्या परिसरात तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्याचे कार्य वनीकरण विभागाकडे आहे. सन २००३ मध्ये ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये होते. त्यापैकी विविध योजनेंतर्गत ७५ हजार ८४१ वृक्ष लावण्यात आले. सन २०१४ च्या पावसाळ्यात मग्रारोहयोंतर्गत विविध योजनेखाली ४७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये देण्यात आले होते. यापैकी सामाजिक वनीकरण विभागाने ४५ हजार २५० वृक्ष लागवड केली. तर मागील वर्षी सन २०१५ च्या पावसाळ्यात १७ हजार ७०० वृक्ष लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ आवश्यकपर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली जे जे काही दिसते ते पर्यावरण. यात सजीव-निर्जीव यांचा समावेश आहे, परंतु आज पर्यावरणाबाबत अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे आहेत. नद्यांच्या काठावरील उद्योगांकडून प्रक्रिया न झालेले दूषित सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण होते. आपल्याकडे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला जातो, पण ती एक औपचारिकता दिसते. कारण कधी शेकडो, तर कधी हजारो रोपटी लावली जातात, पण पुढे काय होते ते कळत नाही. त्यातच वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, जल, वायू, प्लॅस्टिक पिशव्या आदी कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकाची जबाबदारी नाही. पर्यावरण जपणे ही जनतेचीही तेवढीच जबाबदारी आहे. तेव्हा सरकार काय करेल, अशी आशा न बाळगता सर्वसामान्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे आणि पर्यावरण रक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी नद्यांचे संरक्षण, वन्य जीवांचे संरक्षण, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करू. ती पर्यावरण रक्षणाची आणि प्रदूषणाची नांदी ठरेल.पर्यावरण सप्ताह ७.६० लाख वृक्षांची लागवडग्रामविकास विभागातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ९ जूनपर्यंत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्ह्यात ७.६० लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत ७ लाख ५९ हजार ७०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यात वनविभागांतर्गत ६ लाख २३ हजार ७०० सामाजिक वनीकरण विभागांतर्गत १५ हजार वनविकास महामंडळांतर्गत १७०० व इतर शासकीय विभागांतर्गत १ लाख १९ हजार ३०० वृक्षांची लागवड करण्यात येईल. यासाठी ६ लाख ३१ हजार ७२५ खड्डे खोदण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील वनविभागाच्या नर्सरीत ११ लाख १५ हजार ५८७, सामाजिक वनीकरण विभागात १ लाख २८ हजार, कृषी विभाग १० हजार व खासगी व्यक्तींकडे ३२ हजार रुपये उपलब्ध आहेत.