शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:56 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे५४१ ग्रामपंचायती : उत्कृष्ट ग्रामपंचायती व गटांना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची भंडारा जिल्ह्यात परिणामकारक अमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अभियानात जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड सहभागी झाले आहेत. त्यात भंडारा पंचायत समिती ३०८ वॉर्ड, मोहाडी २३७, तुमसर ३०९, लाखनी २२२, साकोली १९६, लाखांदूर १९५, पवनी २४० अशा वॉर्डाचा समावेश आहे.१ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. यातून व्यापक प्रमाणात जनजागृती झाली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा सुरु झाली. गटविकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक तपासणी समिती गठीत करण्यात आली. या समित्या आपला अहवाल नोव्हेंबर महिन्यात सादर करणार आहेत. त्यातील उत्कृष्ठ ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.उत्कृष्ट वॉर्डाला दहा हजाराचा पुरस्कारया स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ठ ठरलेल्या वॉर्डांना रोख दहा हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. तसेच त्या वॉर्डातील कुटूंबांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद गटातील ग्रामपंचातींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील ५२ गटातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.