शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
3
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
4
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
6
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
7
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
8
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
9
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
10
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
11
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
12
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
13
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
14
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
15
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
16
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
17
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
18
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
19
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
20
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:56 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे५४१ ग्रामपंचायती : उत्कृष्ट ग्रामपंचायती व गटांना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची भंडारा जिल्ह्यात परिणामकारक अमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अभियानात जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड सहभागी झाले आहेत. त्यात भंडारा पंचायत समिती ३०८ वॉर्ड, मोहाडी २३७, तुमसर ३०९, लाखनी २२२, साकोली १९६, लाखांदूर १९५, पवनी २४० अशा वॉर्डाचा समावेश आहे.१ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. यातून व्यापक प्रमाणात जनजागृती झाली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा सुरु झाली. गटविकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक तपासणी समिती गठीत करण्यात आली. या समित्या आपला अहवाल नोव्हेंबर महिन्यात सादर करणार आहेत. त्यातील उत्कृष्ठ ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.उत्कृष्ट वॉर्डाला दहा हजाराचा पुरस्कारया स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ठ ठरलेल्या वॉर्डांना रोख दहा हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. तसेच त्या वॉर्डातील कुटूंबांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद गटातील ग्रामपंचातींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील ५२ गटातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.