शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

विकासावर ११३ कोटी खर्च

By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST

जिल्हा वार्षिक योजना सन २०१३-१४ अंतर्गत मार्च २०१४ अखेर ११४ कोटी ४१ लक्ष रुपये प्राप्त रकमेपैकी ११३ कोटी ३७ लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी ९९.०९ इतकी आहे.

जिल्हा नियोजन समिती सभा : पालकमंत्री राजेंद्र मुुळक यांची माहितीभंडारा : जिल्हा वार्षिक योजना सन २०१३-१४ अंतर्गत मार्च २०१४ अखेर ११४ कोटी ४१ लक्ष रुपये प्राप्त रकमेपैकी ११३ कोटी ३७ लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी ९९.०९ इतकी आहे. सर्वसाधारण योजना ७० कोटी ९८ लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपयोजना २९ कोटी ९९ लक्ष रुपये आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजनेवर १२ कोटी ४० लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य मधुकर किंमतकर, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे, प्रभारी उपआयुक्त (नियोजन) सरीता मुऱ्हेकर उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सर्वांगीन व समतोल विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनांच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामे लोकाभिमुख झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मुळक म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना मिळणारा निधी हा निर्धारित वेळेत खर्च झाला पाहिजे. निधी खर्चाबाबत असलेल्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत ते प्रस्ताव अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाठवावे. ते त्वरित मंजूर करता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यास मदत होईल. विज वितरण कंपनी दोषपूर्ण मीटरचे सरासरी बील ग्राहकांना देत असल्याची बाब समिती सदस्याने पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी दोषपूर्ण मीटर वीज वितरण कंपनीने तातडीने लावण्याचे निर्देश उपस्थित वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकाला दिले.जिल्ह्यातील नगर परिषदेअंतर्गत असलेल्या पर्यटन व तिर्थस्थळाच्या विकासाचे प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवावा. गोसीखुर्द प्रकल्पाच्या राजीव टेकडीवर पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी तसा प्रस्ताव विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. हे दोन्ही पर्यटन व तिर्थस्थळ म्हणून विकसित करावे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे तलावातील गाळ उपसण्यासाठी पोकलँड व जेसीबी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च नाविन्यपूर्ण योजनेतून करणार असल्याचे ते म्हणाले. १५ आॅगस्ट रोजी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने सर्व विषय चर्चेअंती मंजूर करावे, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील कोणताही आदिवासी बांधव घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला पालकमंत्र्यांनी यावेळी दिले जिल्ह्यातील जंगलालगतच्या शेतपिकाचे वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपण लावण्याकरीता नाविण्यपूर्ण योजनेतून जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ अंतर्गत जुलै २०१४ अखेर यंत्रणांना २३ कोटी ४५ लक्ष वितरीत करण्यात आले. त्यापैकी १ कोटी २४ लक्ष ७५ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी दिली. यावेळी मागासक्षेत्र अनुदान निधी योजना सन २०१४-१५ च्या आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. सभेला निमंत्रित सदस्य माजी आ.आनंदराव वंजारी, जिया पटेल, नलिनी कोरडे, पंढरीनाथ सावरबांधे, विजया शहारे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)