शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

...तर दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:45 IST

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले

- नीता ब्रह्मकुमारीएकदा एक व्यक्ती रेल्वेच्या जेवणाच्या डब्यात बसून जेवत होती. त्याच्यासमोर एक अनोळखी जोडपे बसले होते. त्या स्त्रीने उंची वस्त्रे आणि हिऱ्याची किमती आभूषणे घातली होती, पण ती आनंदी दिसत नव्हती. ती प्रत्येक गोष्टीबद्दल तक्र ार करत होती की, ही जागा किती घाणेरडी आहे, देण्यात आलेली सेवा चांगली नाही आणि अन्न तर अगदीच गचाळ, पण तिचा पती याउलट अगदी मनमोकळा, गोड स्वभाव आणि सर्व गोष्टी सहजतेने घेणारा.

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले. पत्नीची ओळख करून देताना स्मित हास्य करत म्हणाला की, ‘माझी पत्नी उत्पादन व्यवसायात आहे.’ तिच्याकडे बघून थोडेसे प्रश्नचिन्ह उभे राहिले, कारण ती एखाद्या कारखानदार वा व्यावसायिकासारखी वाटत नव्हती. म्हणून ती व्यक्ती विचारते, ‘कशाचे उत्पादन करता?’ त्याने मस्करीत उत्तर दिले की, ‘ती तिच्याच दु:खाचे उत्पादन करते’ हे उत्तर ऐकून तिथले वातावरण बर्फासारखे थंडगार झाले.

खरेच या महिलेसारखे कित्येकजण असे आहेत की, ते नकारात्मक विचारांनी स्वत:च्या जीवनात सतत दु:खाचे उत्पादन करीत असतात, पण हे सत्य आहे की, आपले विचार आणि दृष्टिकोनाद्वारे आपण आपल्यासाठी सुख किंवा दु:ख निर्माण करण्याचे साहित्य गोळा करत असतो. आनंदी राहण्याची सवय स्वत:ला लावण्याची गरज आहे. जसे एखादे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे साहित्य आवश्यक असते. त्यात काही वस्तू बिलकूल निकामी असतात; परंतु त्यापासून काही उत्तम बनवले जाते.

सुखाची निर्मिती करायची असेल तर वाईट प्रसंगातून मिळालेली शिकवण, आपली सहनशक्ती, व्यक्तींची खरी ओळख असे फायदेही असतात. ते पाहायची सवय लावली तर सर्वोत्तम असे करू शकतो. ‘काहीही असो मला आनंदी राहायचंय’ हे वारंवार लक्षात आणल्याने दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक