शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तर दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:45 IST

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले

- नीता ब्रह्मकुमारीएकदा एक व्यक्ती रेल्वेच्या जेवणाच्या डब्यात बसून जेवत होती. त्याच्यासमोर एक अनोळखी जोडपे बसले होते. त्या स्त्रीने उंची वस्त्रे आणि हिऱ्याची किमती आभूषणे घातली होती, पण ती आनंदी दिसत नव्हती. ती प्रत्येक गोष्टीबद्दल तक्र ार करत होती की, ही जागा किती घाणेरडी आहे, देण्यात आलेली सेवा चांगली नाही आणि अन्न तर अगदीच गचाळ, पण तिचा पती याउलट अगदी मनमोकळा, गोड स्वभाव आणि सर्व गोष्टी सहजतेने घेणारा.

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले. पत्नीची ओळख करून देताना स्मित हास्य करत म्हणाला की, ‘माझी पत्नी उत्पादन व्यवसायात आहे.’ तिच्याकडे बघून थोडेसे प्रश्नचिन्ह उभे राहिले, कारण ती एखाद्या कारखानदार वा व्यावसायिकासारखी वाटत नव्हती. म्हणून ती व्यक्ती विचारते, ‘कशाचे उत्पादन करता?’ त्याने मस्करीत उत्तर दिले की, ‘ती तिच्याच दु:खाचे उत्पादन करते’ हे उत्तर ऐकून तिथले वातावरण बर्फासारखे थंडगार झाले.

खरेच या महिलेसारखे कित्येकजण असे आहेत की, ते नकारात्मक विचारांनी स्वत:च्या जीवनात सतत दु:खाचे उत्पादन करीत असतात, पण हे सत्य आहे की, आपले विचार आणि दृष्टिकोनाद्वारे आपण आपल्यासाठी सुख किंवा दु:ख निर्माण करण्याचे साहित्य गोळा करत असतो. आनंदी राहण्याची सवय स्वत:ला लावण्याची गरज आहे. जसे एखादे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे साहित्य आवश्यक असते. त्यात काही वस्तू बिलकूल निकामी असतात; परंतु त्यापासून काही उत्तम बनवले जाते.

सुखाची निर्मिती करायची असेल तर वाईट प्रसंगातून मिळालेली शिकवण, आपली सहनशक्ती, व्यक्तींची खरी ओळख असे फायदेही असतात. ते पाहायची सवय लावली तर सर्वोत्तम असे करू शकतो. ‘काहीही असो मला आनंदी राहायचंय’ हे वारंवार लक्षात आणल्याने दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक