शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

मन हेची परमेश्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:17 IST

Spirituality मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते.

आपल्याला जर परमेश्वर हवा असेल तर त्यासाठी ज्ञान हवे नि भक्ती हवी. त्या करिता या मनाला शांत करण्याची गरज आहे. नुसते शांत नाही तर त्याची ओढ़ भक्ती मार्गाकडे कशी लागेल यासाठी प्रयत्न करावा लागेल. मनाची एकाग्रता वाढवावी लागेल. कारण एकाग्रता ही सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे.मन गोरख, मन गोविंद, मन ही औघड होयजो मन राखै जतन करि, आपै करता होय ।।मन हे योगी गोरखनाथ आहे. मन हेच ईश्वर आहे. अर्थात मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते. मन एकाग्र करून जो मनुष्य साधना करतो तो स्वत:च आपला करता (स्वामी) होतो.मनाबद्दल संत कबीर म्हणतात...मन मोटा, मन पातरा, मन पानी, मन लायमनके जैसी उपजै, तैसी ही हवै जाय ।।हा मनरूपी भवरा कधी खूपच बलवान बनतो तर कधी अत्यंत नाजुक बनतो. कधी पाण्याच्या समान शीतल तर, कधी अग्निसारखा क्रोधी बनतो. अर्थात जशी आपल्या मनाची इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणे ते मन परिवर्तित होते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा ते सल्ला देतात. म्हणून ते म्हणतात,मना मानसी दुख आणू नको रेमना सर्वथा शोक चिंता नको रे।।विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावीविदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।।भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, प्रत्येक वस्तुचा एक स्वभाव असतो. जसे की वाºयाचे घोंगावणे, अग्नीचे पेट घेणे, पाण्याचे अवखळ वाहणे तसाच मनाचा देखील स्वभाव आहे जसे की इच्छा धरणे, चिंता करणे, स्वप्न पाहणे, एखादी गोष्ट घडली की उत्तेजित होणे किंवा अस्वस्थ होणे. मन हे कोबीच्या भाजीसारखे आहे. आपण जर कोबीचा एक एक पदर काढत गेलो तर शेवटी कोबी म्हणून काहीच राहत नाही. तसेच मानवी मनाचे आहे, आपण जर आपले सगळे विचार काढून टाकले तर मन नावाचे स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. परंतु असे कधीच होऊ शकत नाही, कारण विचार करणे हा मनाचा स्थायी भाव आहे. संत बहिणाबाईंनी आपल्या लिखानात मनाला उपमा दिली आहे.मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोरकिती हाकल हाकल तरी येत पिकावर ।।याही पलिकडे  जाऊन रामकृष्ण परमहंस असे म्हणतात की, मन म्हणजे माकडाचा खोडकरपणा आणि मस्तवाल हत्तीची चाल आहे. मनाचा स्वभाव हा कधी एकच नसतो. ते ज्या शरीरात असते त्याप्रमाणे आपला व्यवहार करीत असते. तीळामध्ये ज्याप्रमाणे तेल सामावलेले असते, त्याचप्रमाणे मन आपल्या शरीरामध्ये वास करीत असते. ज्यावेळी मन योग्य व अयोग्य गोष्टींचा विचार करून योग्य अशा निर्णयावर येऊन पोचते त्यास बुद्धी म्हणतात. मन जेव्हा एकरूप होऊन विचारांची मांडणी करते व ती साठवते त्यास चित्त असे म्हणतात. जेव्हा मन मदमस्त अवस्थेत येऊन मी मी करते तेव्हा त्याला अहंकार म्हणतात.

 समर्थांनी एका मनाच्या श्लोकात हा इलाज सांगून ठेवलाय. ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी, नकोरे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगिकारू, नकोरे मना मत्सरू दंभ भारू !!याउलट, बहिणाबाईंनी आईच्या मायेने सोप्या भाषेत मनाचे वर्णन करून सावधगिरीचा सल्ला दिला. त्या म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याच्या ठायी ठायी वाटा, जशा वाºयानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. त्या म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू त्याचि काय सांगू मात, आता वहात भुईवर, गेलं गेलं आभायात.‘ स्वच्छंद मन क्षणात चंद्रावर जाते, तर बुद्धीला तेथे जाण्यासाठी ‘यान’ बनवावे लागते. मन आणि बुद्धीतला हा फरक चांगल्या जीवनाकडे नेतो. मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते.

- शून्यानंद भारतीखामगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक