शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 1, 2020 18:13 IST

गीतरामायणातील हे काव्य आयुष्याचे मर्म सांगणारे, जगण्याला बळ देणारे आणि सबंध रामायणाचे सार कथन करणारे आहे.

ठळक मुद्देगदिमांच्या प्रत्येक काव्यात दोन ओळींमधला अर्थ शोधून लिहायचा ठरवला, तरीदेखील तो प्रबंधाचा विषय होईल. संवेदनशील कवी, लेखक, अभिनेते यापलीकडे समाजभान राखणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी गदिमांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची आहे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'आधुनिक वाल्मिकी' अशी ज्यांना बिरुदावली मिळाली, ते लोकप्रिय गीतकार ग.दि.माडगुळकर अर्थात आपले गदिमा, यांची आज जयंती. संवेदनशील कवी, लेखक, अभिनेते यापलीकडे समाजभान राखणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी गदिमांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची आहे. त्यांचे अनेक किस्से आपण ऐकले, वाचले असतीलही. परंतु, गदिमा हे नाव उच्चारताच ओघाने शब्द येतो, तो 'गीतरामायण.' प्रासादिक काव्यपुष्पांचा नजराणा. त्यातील कोणतेही काव्यपुष्प घ्यावे, हुंगावे आणि रामकथेचा प्रसंग शब्दचित्रातून साकार होताना पहावा, एवढे जीवंत वर्णन. 

त्याच संग्रहातले एक काव्यपुष्प, आयुष्याचे मर्म सांगणारे, जगण्याला बळ देणारे आणि सबंध रामायणाचे सार कथन करणारे आहे. गदिमांच्या जयंतीनिमित्त, त्या गीताची उजळणी करूया. ते गीत आहे...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!

दैव जात दु:खे भरता, दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा।

वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून, माता कैकयीने केलेल्या दुष्कृत्याचा धिक्कार करून, जीवापाड प्रेम असलेल्या ज्येष्ठ भावाची भेट घेण्यासाठी, त्यांना अयोध्येत परत नेण्यासाठी भरत अगतिक झाला आहे. तेव्हा त्याची समजूत काढताना प्रभू श्रीराम सांगतात, `जे घडलं, त्याचा दोष कोणालाही देऊ नकोस, प्रत्येकाला आपले प्रारब्ध भोगावेच लागतात. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु, जन्म आणि मृत्यू यादरम्यान मिळालेले आयुष्य सार्थकी कसे लाववायचे, ते आपल्या हातात आहे. तू शोक करण्यात वेळ वाया घालवू नकोस, 'अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा....पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' 

हेही वाचा: एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

ही अशी समजूत काढल्यावर भरताची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी! ज्यांच्या हाती विश्वाची सूत्रे आहेत, तोच सूत्रधार दुसऱ्याच्या हाती आपल्या आयुष्याची सूत्रे सोपवून स्वत:ला पराधीन म्हणतो आणि आहे ती परिस्थिती स्वीकारून मार्गक्रमण कर सांगतो, ते बोल अखिल विश्वाला प्रेरक ठरतात. 

'शो मस्ट गो ऑन' असे आपण म्हणतो. परंतु, हे वास्तव स्वीकारणे अतिशय अवघड. मात्र गदिमा लिहितात, 'मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा.' मरण शाश्वत आहे, ते स्वीकारून प्रत्येकाला पुढे जावेच लागते. हे सत्य, प्रभू रामचंद्रांनी स्वीकारले, पचवले, तिथे आपली काय कथा? 

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

भरताला उद्देशून रामरायांच्या तोंडी लिहिलेले हे गीत दहा कडव्यांचे आहे. त्यातील पुढीच कडवे, तर उच्चांकच!

दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट,एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ,क्षणिक आहे तेवी बाळा, मेळ माणसाचा,पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!

नदीच्या पात्रात वाहत आलेले दोन ओंडके काही क्षणांसाठी एकत्र येतात आणि प्रवाहाला वेग मिळाला, की आपापले मार्ग बदलून दोन दिशांना जातात. हेच मनुष्य जीवनाचेही सत्य आहे. आपली भेट क्षणिक आहे. दोन ओंडके कधी वेगळे होतील माहित नाही, म्हणून हे क्षण भरभरून जगून घ्या. रुसवे, फुगवे यात वेळ वाया घालवू नका. कधी कोणती लाट येईल आणि आयुष्याची दिशा बदलेल, सांगता येत नाही, ते कोणाच्याच हाती नाही, म्हणून आपण पराधीन. तरीही परिस्थिती स्वीकारून मनस्थिती बदलणे आणि आपले विहित कार्य करणे, हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. 

गदिमांच्या प्रत्येक काव्यात असा दोन ओळींमधला अर्थ शोधून लिहायचा ठरवला, तरीदेखील तो प्रबंधाचा विषय होईल. असे महाकवी आपल्याला लाभले, हे आपले भाग्यच. ही शब्दसुमनांजली त्यांना अर्पण करून, आपणही सदर गीतातून बोध घेऊया.