शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 1, 2020 18:13 IST

गीतरामायणातील हे काव्य आयुष्याचे मर्म सांगणारे, जगण्याला बळ देणारे आणि सबंध रामायणाचे सार कथन करणारे आहे.

ठळक मुद्देगदिमांच्या प्रत्येक काव्यात दोन ओळींमधला अर्थ शोधून लिहायचा ठरवला, तरीदेखील तो प्रबंधाचा विषय होईल. संवेदनशील कवी, लेखक, अभिनेते यापलीकडे समाजभान राखणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी गदिमांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची आहे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'आधुनिक वाल्मिकी' अशी ज्यांना बिरुदावली मिळाली, ते लोकप्रिय गीतकार ग.दि.माडगुळकर अर्थात आपले गदिमा, यांची आज जयंती. संवेदनशील कवी, लेखक, अभिनेते यापलीकडे समाजभान राखणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी गदिमांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची आहे. त्यांचे अनेक किस्से आपण ऐकले, वाचले असतीलही. परंतु, गदिमा हे नाव उच्चारताच ओघाने शब्द येतो, तो 'गीतरामायण.' प्रासादिक काव्यपुष्पांचा नजराणा. त्यातील कोणतेही काव्यपुष्प घ्यावे, हुंगावे आणि रामकथेचा प्रसंग शब्दचित्रातून साकार होताना पहावा, एवढे जीवंत वर्णन. 

त्याच संग्रहातले एक काव्यपुष्प, आयुष्याचे मर्म सांगणारे, जगण्याला बळ देणारे आणि सबंध रामायणाचे सार कथन करणारे आहे. गदिमांच्या जयंतीनिमित्त, त्या गीताची उजळणी करूया. ते गीत आहे...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!

दैव जात दु:खे भरता, दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा।

वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून, माता कैकयीने केलेल्या दुष्कृत्याचा धिक्कार करून, जीवापाड प्रेम असलेल्या ज्येष्ठ भावाची भेट घेण्यासाठी, त्यांना अयोध्येत परत नेण्यासाठी भरत अगतिक झाला आहे. तेव्हा त्याची समजूत काढताना प्रभू श्रीराम सांगतात, `जे घडलं, त्याचा दोष कोणालाही देऊ नकोस, प्रत्येकाला आपले प्रारब्ध भोगावेच लागतात. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु, जन्म आणि मृत्यू यादरम्यान मिळालेले आयुष्य सार्थकी कसे लाववायचे, ते आपल्या हातात आहे. तू शोक करण्यात वेळ वाया घालवू नकोस, 'अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा....पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' 

हेही वाचा: एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

ही अशी समजूत काढल्यावर भरताची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी! ज्यांच्या हाती विश्वाची सूत्रे आहेत, तोच सूत्रधार दुसऱ्याच्या हाती आपल्या आयुष्याची सूत्रे सोपवून स्वत:ला पराधीन म्हणतो आणि आहे ती परिस्थिती स्वीकारून मार्गक्रमण कर सांगतो, ते बोल अखिल विश्वाला प्रेरक ठरतात. 

'शो मस्ट गो ऑन' असे आपण म्हणतो. परंतु, हे वास्तव स्वीकारणे अतिशय अवघड. मात्र गदिमा लिहितात, 'मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा.' मरण शाश्वत आहे, ते स्वीकारून प्रत्येकाला पुढे जावेच लागते. हे सत्य, प्रभू रामचंद्रांनी स्वीकारले, पचवले, तिथे आपली काय कथा? 

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

भरताला उद्देशून रामरायांच्या तोंडी लिहिलेले हे गीत दहा कडव्यांचे आहे. त्यातील पुढीच कडवे, तर उच्चांकच!

दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट,एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ,क्षणिक आहे तेवी बाळा, मेळ माणसाचा,पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!

नदीच्या पात्रात वाहत आलेले दोन ओंडके काही क्षणांसाठी एकत्र येतात आणि प्रवाहाला वेग मिळाला, की आपापले मार्ग बदलून दोन दिशांना जातात. हेच मनुष्य जीवनाचेही सत्य आहे. आपली भेट क्षणिक आहे. दोन ओंडके कधी वेगळे होतील माहित नाही, म्हणून हे क्षण भरभरून जगून घ्या. रुसवे, फुगवे यात वेळ वाया घालवू नका. कधी कोणती लाट येईल आणि आयुष्याची दिशा बदलेल, सांगता येत नाही, ते कोणाच्याच हाती नाही, म्हणून आपण पराधीन. तरीही परिस्थिती स्वीकारून मनस्थिती बदलणे आणि आपले विहित कार्य करणे, हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. 

गदिमांच्या प्रत्येक काव्यात असा दोन ओळींमधला अर्थ शोधून लिहायचा ठरवला, तरीदेखील तो प्रबंधाचा विषय होईल. असे महाकवी आपल्याला लाभले, हे आपले भाग्यच. ही शब्दसुमनांजली त्यांना अर्पण करून, आपणही सदर गीतातून बोध घेऊया.