शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

शिवभोजन थाळीची वाटचाल झुणका-भाकर केंद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:04 IST

प्रभात बुडूख बीड : गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनातर्फे शिवभोजन थाळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ...

प्रभात बुडूख

बीड : गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनातर्फे शिवभोजन थाळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये १० रुपयात जेवण दिले जाते, मात्र, बोगस लाभार्थी दाखवून अनुदान लाटण्याचा सपाटा काही शिवभोजन केंद्रांनी लावल्याची माहिती समोर आली आहे. याचप्रकारे झुणका भाकर केंद्रांमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्यामुळे ती योजना बंद झाली होती. तशीच परिस्थीती असल्यामुळे शिवभोजन थाळीची वाटचाल झुणका भाकर केंद्राकडे होत असल्याचे चित्र आहे.

शासनाकडून गर्दीच्या ठिकाणी जसे की बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, जिल्हा रुग्णालय, मोढा, बाजारसमिती यासह इतर ठिकाणी शिवभोजन केंद्रांची स्थापना संस्थेमार्फ केलेली आहे. बीड शहरात ७ व इतर तालुक्यात १७ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राला ७५ ते १२५ थाळ्यांचे रोजचे उद्धिष्ट देण्यात आलेले आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात पार्सल सुविधा उपलब्ध होती. ती बंद करून आता त्याठिकाणीच जेवण करण्याची तरतूद केलेली आहे. तसेच बहुतांश शिवभोजन केंद्रचालकांचे चहा किंवा नाष्ट्याचे हॉटेल आहेत. त्यामुळे त्याठिकाणी आलेल्या ग्राहकाचा थाळीसोबतचा फोटो ऑनलाईन अपलोड केला जात असल्याची सूत्रांची माहिती असून, विशेष म्हणजे तो ग्राहक फक्त त्याठिकाणावरून चहा पिऊन गेल्याचे देखील दिसून आलेले आहे. त्यामुळे या बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून शासनाचे प्रत्येक महिन्याला सरासरी लाखों रुपयांचे अनुदान लाटले जात आहे. या गैरप्रकाराची प्रशासनाकडून चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच शिवभोजन केंद्रचालकांवर अंकुश ठेवण्याची आवश्यता आहे.

चौकट,

शनिवार ,रविवारी देखील आकडे सारखेच

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा जिल्हा परिषदे समोर शिवभोजन केंद्र मंजूर आहेत. या शासकीय कार्यालयांना शनिवारी, रविवारी तसेच महत्त्वाच्या सणासुदीच्या सुटी असते, त्यामुळे इतर दिवसांपेक्षा या दिवशी त्याठिकाणी गर्दी कमी असते. तरी देखील सुटीच्या दिवशीही या केंद्रामधून इतर दिवसांसारखेच गरजू लाभार्थी जेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालक बोगस लाभार्थी दाखवत असल्याचे उघड होत आहे.

चौकट,

अन्... झुणका भाकर केंद्र योजना बंद झाली

शिवसेना-भाजपच्या काळात १९९५ साली शिवभोजनप्रमाणेच झुणका-भाकर केंद्र योजना सुरु केली होती. मात्र, या योजनेच्या नावाखाली अनेकांनी शासनाच्या जागा बळकावल्या होत्या. तसेच त्याठिकाणी हॉटेल सुरु केले होते. त्यामुळे या योजनेत देखील मोठा भ्रष्टाचार झाला व ही योजना बंद झाली. तोच प्रकार शिवभोजन योजनेत होऊ नये यासाठी शिवभोजन केंद्राचा लाभ गरजुंना होत आहे का याचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे मत, संभाजी ब्रिगेडचे राहुल वायकर यांनी व्यक्त केले आहे.

चौकट,

तहसीलदारांकडून तपासणी नाहीच

शिवभोजन योजनेसाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. तर, तालुकास्तरावर तहसीलदार यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तपासणी करून अहवाल सादर करावा असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र, तहसिलदारांडकडून अद्याप तपासणी अहवाल प्रप्त झालेले नाहीत.