शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शिवभोजन थाळीची वाटचाल झुणका-भाकर केंद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:04 IST

प्रभात बुडूख बीड : गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनातर्फे शिवभोजन थाळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ...

प्रभात बुडूख

बीड : गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनातर्फे शिवभोजन थाळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये १० रुपयात जेवण दिले जाते, मात्र, बोगस लाभार्थी दाखवून अनुदान लाटण्याचा सपाटा काही शिवभोजन केंद्रांनी लावल्याची माहिती समोर आली आहे. याचप्रकारे झुणका भाकर केंद्रांमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्यामुळे ती योजना बंद झाली होती. तशीच परिस्थीती असल्यामुळे शिवभोजन थाळीची वाटचाल झुणका भाकर केंद्राकडे होत असल्याचे चित्र आहे.

शासनाकडून गर्दीच्या ठिकाणी जसे की बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, जिल्हा रुग्णालय, मोढा, बाजारसमिती यासह इतर ठिकाणी शिवभोजन केंद्रांची स्थापना संस्थेमार्फ केलेली आहे. बीड शहरात ७ व इतर तालुक्यात १७ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राला ७५ ते १२५ थाळ्यांचे रोजचे उद्धिष्ट देण्यात आलेले आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात पार्सल सुविधा उपलब्ध होती. ती बंद करून आता त्याठिकाणीच जेवण करण्याची तरतूद केलेली आहे. तसेच बहुतांश शिवभोजन केंद्रचालकांचे चहा किंवा नाष्ट्याचे हॉटेल आहेत. त्यामुळे त्याठिकाणी आलेल्या ग्राहकाचा थाळीसोबतचा फोटो ऑनलाईन अपलोड केला जात असल्याची सूत्रांची माहिती असून, विशेष म्हणजे तो ग्राहक फक्त त्याठिकाणावरून चहा पिऊन गेल्याचे देखील दिसून आलेले आहे. त्यामुळे या बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून शासनाचे प्रत्येक महिन्याला सरासरी लाखों रुपयांचे अनुदान लाटले जात आहे. या गैरप्रकाराची प्रशासनाकडून चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच शिवभोजन केंद्रचालकांवर अंकुश ठेवण्याची आवश्यता आहे.

चौकट,

शनिवार ,रविवारी देखील आकडे सारखेच

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा जिल्हा परिषदे समोर शिवभोजन केंद्र मंजूर आहेत. या शासकीय कार्यालयांना शनिवारी, रविवारी तसेच महत्त्वाच्या सणासुदीच्या सुटी असते, त्यामुळे इतर दिवसांपेक्षा या दिवशी त्याठिकाणी गर्दी कमी असते. तरी देखील सुटीच्या दिवशीही या केंद्रामधून इतर दिवसांसारखेच गरजू लाभार्थी जेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालक बोगस लाभार्थी दाखवत असल्याचे उघड होत आहे.

चौकट,

अन्... झुणका भाकर केंद्र योजना बंद झाली

शिवसेना-भाजपच्या काळात १९९५ साली शिवभोजनप्रमाणेच झुणका-भाकर केंद्र योजना सुरु केली होती. मात्र, या योजनेच्या नावाखाली अनेकांनी शासनाच्या जागा बळकावल्या होत्या. तसेच त्याठिकाणी हॉटेल सुरु केले होते. त्यामुळे या योजनेत देखील मोठा भ्रष्टाचार झाला व ही योजना बंद झाली. तोच प्रकार शिवभोजन योजनेत होऊ नये यासाठी शिवभोजन केंद्राचा लाभ गरजुंना होत आहे का याचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे मत, संभाजी ब्रिगेडचे राहुल वायकर यांनी व्यक्त केले आहे.

चौकट,

तहसीलदारांकडून तपासणी नाहीच

शिवभोजन योजनेसाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. तर, तालुकास्तरावर तहसीलदार यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तपासणी करून अहवाल सादर करावा असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र, तहसिलदारांडकडून अद्याप तपासणी अहवाल प्रप्त झालेले नाहीत.