राजकीय द्वेषातून केलेले निलंबन मागे घ्यावे - भाजपची मागणी
अंबाजोगाई : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याचा अंबाजोगाई भाजपकडून निषेध नोंदविण्यात आला. राजकीय द्वेषातून करण्यात आलेले त्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
अधिवेशन काळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात त्यांच्या मतदार संघातील विविध सामाजिक, शैक्षणिक, शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व इतर विषयांवर भाजपा आमदारांनी सभागृहात आवाज उठविला. तो आवाज बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १२ आमदारांना निलंबित केले. हे निलंबन निषेधार्ह असून, हेे आमदार जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आमदार आहेत. ते मतदार संघातील जनतेचे प्रश्न मंडण्यासाठी अधिवेशनात सहभागी होतात. त्यांचे निलंबन कारणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, असे निवेदनात नमूद करून, निलंबनाच्या कृतीचा निषेध नोंदविण्यात आला. त्या १२ आमदारांचे निलंबन राजकीय द्वेषातून करण्यात आले आहे. ते मागे घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
या व विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी भाजपचे नंदकिशोर मुंदडा, तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर कचगुंडे, हिंदुलाल काकडे, पंडित जोगदंड, देवाण मुंडे, नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, अनंत अरसुडे, इस्माईल शेख, अमोल साखरे, बळीराम चोपणे, महेश आंबाड, मोहित कऱ्हाड, सचिन मुंडे, बाबासाहेब आडे, शिरीषकुमार मुखडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
060721\avinash mudegaonkar_img-20210706-wa0033_14.jpg