शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तलावांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 15:13 IST

जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

पाटोदा ( बीड ), दि. 3 : जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

पाटोदा तालुक्यात गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली. यात विवध ठिकाणची आठ लहान - मोठे तलाव फुटले. जमिनी, रस्ते वाहून गेल्या अब्जावाधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, वर्ष उलटून गेले तरी फुटलेल्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे या काळात झालेल्या पावसाचे पाणी तलावात साठू शकले नाही. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर तलावांमध्ये पाणीसाठे झाले असते. याचा उपयोग शेकडो एकर जमीनीवरील पिकांना व शेतक-यांना झाला असता. 

सध्या सर्वत्र जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होत आहे. परंतु. दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष्य नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानची दुरुस्ती किंवा पुनर्निर्माणासाठी केंद्र सरकार स्वतंत्र निधी देते. यात केवळ प्रशासकीय उदासीनता आणि तालुक्यात प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे दुरुस्तीच्या कामाकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आता दुरुस्त्या कधी होणार याबाबत साशंकताच आहे .