शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

तलावांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 15:13 IST

जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

पाटोदा ( बीड ), दि. 3 : जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

पाटोदा तालुक्यात गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली. यात विवध ठिकाणची आठ लहान - मोठे तलाव फुटले. जमिनी, रस्ते वाहून गेल्या अब्जावाधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, वर्ष उलटून गेले तरी फुटलेल्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे या काळात झालेल्या पावसाचे पाणी तलावात साठू शकले नाही. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर तलावांमध्ये पाणीसाठे झाले असते. याचा उपयोग शेकडो एकर जमीनीवरील पिकांना व शेतक-यांना झाला असता. 

सध्या सर्वत्र जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होत आहे. परंतु. दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष्य नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानची दुरुस्ती किंवा पुनर्निर्माणासाठी केंद्र सरकार स्वतंत्र निधी देते. यात केवळ प्रशासकीय उदासीनता आणि तालुक्यात प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे दुरुस्तीच्या कामाकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आता दुरुस्त्या कधी होणार याबाबत साशंकताच आहे .