शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

तलावांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 15:13 IST

जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

पाटोदा ( बीड ), दि. 3 : जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

पाटोदा तालुक्यात गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली. यात विवध ठिकाणची आठ लहान - मोठे तलाव फुटले. जमिनी, रस्ते वाहून गेल्या अब्जावाधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, वर्ष उलटून गेले तरी फुटलेल्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे या काळात झालेल्या पावसाचे पाणी तलावात साठू शकले नाही. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर तलावांमध्ये पाणीसाठे झाले असते. याचा उपयोग शेकडो एकर जमीनीवरील पिकांना व शेतक-यांना झाला असता. 

सध्या सर्वत्र जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होत आहे. परंतु. दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष्य नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानची दुरुस्ती किंवा पुनर्निर्माणासाठी केंद्र सरकार स्वतंत्र निधी देते. यात केवळ प्रशासकीय उदासीनता आणि तालुक्यात प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे दुरुस्तीच्या कामाकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आता दुरुस्त्या कधी होणार याबाबत साशंकताच आहे .