शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

बीडकरांनो काळजी नसावी, २७१ व्हेंटीलेटर उपलब्ध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. परंतु सध्यातरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. परंतु सध्यातरी जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात २७१ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. यात शासकीय संस्थेत २४८ तर खाजगीतील ३३ व्हेंटीलेटरचा समावेश आहे. हे सर्व व्हेंटीलेटर सुरु असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत २६ हजार ७१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पैकी ६५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मागील काही दिवसांपासून तर रोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. तसेच नव्या रुग्णांमध्ये गंभीर असलेल्यांची संख्याही वाढत असून ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची मागणीही वाढत आहे. असे असले तरी अद्याप व्हेंटीलेटरबाबत तक्रारी आलेल्या नाहीत. त्या येऊ नयेत, यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

अंबाजोगाईतील तक्रारी वाढल्या

अंबाजाेगाई येथील स्वामी रामानंत तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात ७४ व्हेंटीलेटर आहेत. परंतू यातील बोटावर माेजण्याइतकेच चालू असल्याचे समोर आलेले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार येथे जवळपास २७ व्हेंटीलेटर बंद आहेत. काही व्हेंटीलेटर तर बसविल्यापासून ते सुरुच केले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांमधीलही अशीच काहीशी अवस्था आहे. पीएम केअर मधून आलेले व्हेंटीलेटर अद्यापही काही ठिकाणी सुरु केले नसल्याचे समजते.

जिल्ह्यात मुबलक व्हेंटीलेटर आहेत. अद्याप कोठेही तुटवडा जाणवलेला नाही. जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा खाजगी रुग्णालये अधिगृहित केले जातील. रुग्णांनी घाबरुन जाऊ नये, आरोग्य विभाग सतर्क आहे.

-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड

बीडमध्ये अद्यापतरी तुटवडा नाही

जिल्हा रुग्णालयात ६२ व्हेंटीलेटर आहेत. यातील किती चालू आणि किती बंद याची अधिकृत माहिती मिळत नसली तरी ते सर्व सुरु असल्याचा दावा होत आहे.

दरम्यान, या व्हेंटीलेटरबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आयसीयूमध्ये कर्तव्य बजावणाऱ्यांना त्याबद्दल माहितीच नाही.

सध्या कोरोनासाठी स्वतंत्र पदभरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक हे नवीन आहेत. त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.