शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

यंदा व्यक्ती, जाती-केंद्रित निवडणूक

By admin | Updated: September 29, 2014 22:53 IST

आघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले.

गणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले. त्यामुळे यापूर्वी कोण कोणत्या पक्षात होता, आता त्याने कोण्या पक्षाची उमेदवारी घेतली, हे मतदारांना कळेनासे झाले आहे. एकूणच ही निवडणूक व्यक्ती आणि जातीकेंद्रित झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांसह सामजिक संघटना, अपक्ष उमेदवारांची विधानसभा निवडणुकीत भाऊगर्दी झाली आहे. मतदारसंघात प्रभाव पाडणारे नेतृत्व विधानसभा निवडणूक लढवीत असल्याने मतदारही संभ्रमात आहेत. सरस उमेदवारांची मैदानात गर्दी होणार असल्याने मतदारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, ही निवडणूक सरतेशेवटी उमेदवारांचे व्यक्तीवलय आणि समाजाभोवती फिरणार असल्याचे संकेत आहे. इतर राज्यांत पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फारसे यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंघांत उमेदवारांचे व्यक्तिगत हितसंबंध व समाजाचे प्राबल्य यावर बरेच काही अवलंबून राहील. प्रत्येक मतदारसंघात विशिष्ट समाजाचे प्राबल्य असल्याने तो समाज ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील, त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. यात पक्षाचेही मतदान महत्त्वपूर्ण ठरते. अमरावती, बडनेरा मतदारसंघात मुस्लिम, दलितांची मते निर्णायक राहतील. अमरावतीत परंपरागत देशमुख, पाटील व हिंदी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. अचलपुरात माळी, दर्यापूर येथे पाटील, कोळी, बारी मेळघाटात पाटील, व्यापारी तर तिवस्यात धनगर, कोळी समाजाची मते निर्णायक मानली जाते. मोर्शीत माळी, आदिवासी तर धामणगावात पाटील, तेली व दलित मतांवर उमेदवारांची भिस्त आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना धक्का देण्यासाठी बसपाने अमरावती, अचलपूर, तिवसा येथून उमेदवार उभे केले आहेत. मात्र, बसपाचे उमेदवार फार प्रभाव पाडतील, असे तुर्तास तरी चित्र नाही. एक आॅक्टोबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. प्रत्येक उमेदवार विशिष्ट समाजाची मते त्यांच्या बाजूने वळविण्यासाठी जातीय समीकरणे मांडणाच्या तयारीत आहेत. मैदानात उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी त्या उमेदवारांच्या चारित्र्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. उमेदवारांनी नाती-गोती, समाजाचे प्राबल्य कसे उपयोगी पडेल, याची जोरदार तयारी चालविली आहे.