शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

यंदा व्यक्ती, जाती-केंद्रित निवडणूक

By admin | Updated: September 29, 2014 22:53 IST

आघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले.

गणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले. त्यामुळे यापूर्वी कोण कोणत्या पक्षात होता, आता त्याने कोण्या पक्षाची उमेदवारी घेतली, हे मतदारांना कळेनासे झाले आहे. एकूणच ही निवडणूक व्यक्ती आणि जातीकेंद्रित झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांसह सामजिक संघटना, अपक्ष उमेदवारांची विधानसभा निवडणुकीत भाऊगर्दी झाली आहे. मतदारसंघात प्रभाव पाडणारे नेतृत्व विधानसभा निवडणूक लढवीत असल्याने मतदारही संभ्रमात आहेत. सरस उमेदवारांची मैदानात गर्दी होणार असल्याने मतदारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, ही निवडणूक सरतेशेवटी उमेदवारांचे व्यक्तीवलय आणि समाजाभोवती फिरणार असल्याचे संकेत आहे. इतर राज्यांत पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फारसे यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंघांत उमेदवारांचे व्यक्तिगत हितसंबंध व समाजाचे प्राबल्य यावर बरेच काही अवलंबून राहील. प्रत्येक मतदारसंघात विशिष्ट समाजाचे प्राबल्य असल्याने तो समाज ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील, त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. यात पक्षाचेही मतदान महत्त्वपूर्ण ठरते. अमरावती, बडनेरा मतदारसंघात मुस्लिम, दलितांची मते निर्णायक राहतील. अमरावतीत परंपरागत देशमुख, पाटील व हिंदी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. अचलपुरात माळी, दर्यापूर येथे पाटील, कोळी, बारी मेळघाटात पाटील, व्यापारी तर तिवस्यात धनगर, कोळी समाजाची मते निर्णायक मानली जाते. मोर्शीत माळी, आदिवासी तर धामणगावात पाटील, तेली व दलित मतांवर उमेदवारांची भिस्त आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना धक्का देण्यासाठी बसपाने अमरावती, अचलपूर, तिवसा येथून उमेदवार उभे केले आहेत. मात्र, बसपाचे उमेदवार फार प्रभाव पाडतील, असे तुर्तास तरी चित्र नाही. एक आॅक्टोबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. प्रत्येक उमेदवार विशिष्ट समाजाची मते त्यांच्या बाजूने वळविण्यासाठी जातीय समीकरणे मांडणाच्या तयारीत आहेत. मैदानात उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी त्या उमेदवारांच्या चारित्र्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. उमेदवारांनी नाती-गोती, समाजाचे प्राबल्य कसे उपयोगी पडेल, याची जोरदार तयारी चालविली आहे.