शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

बांधावर खत योजना गुंडाळणार?

By admin | Updated: June 30, 2015 00:24 IST

खरीप हंगामात एकाच वेळी शेतकऱ्यांची मागणी वाढते त्या तुलनेत खतांचा पुरवठा होत नाही,..

एकाही गटाची मागणी नाही : गतवर्षीची नापिकी, पीक कर्जासाठी बँकांच्या असहकाराचा परिणामगजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामात एकाच वेळी शेतकऱ्यांची मागणी वाढते त्या तुलनेत खतांचा पुरवठा होत नाही, कधी कृत्रिम टंचाईचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खत उपलब्ध करून देण्याची योजना २०१२ पासून सुरू आहे. शेतकरी गटासाठी असणाऱ्या या योजनेत एकाही गटाने मागणी नोंदविलेली नाही. अशीच स्थिती राहिल्यास ही योजना शासनाद्वारा गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी वाढल्यामुळे खत वितरणामध्ये अडचणी निर्माण होतात. वाढती मागणी व मर्यादित खतपुरवठा याचा गैरफायदा घेऊन काही खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. त्याचप्रमाणे चढ्या भावाने खतांची विक्री केली जाते. खतांसोबत अनावश्यक निविष्ठांची (लिंकींग) शेतकऱ्यांना सक्तीने विक्री केली जाते. खतांची साठेबाजी केली जाते. काही ठिकाणी खतांचा काळाबाजारही होतो.हे टाळण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रास्त भावात व वेळेवर खतपुरवठा होण्यासाठी खरीप हंगामात २०१२ पासून प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खत वितरित केली जात आहे.या अंतर्गत कृषी विभागाने रासायनिक खतांचा संरक्षित (बफर स्टॉक) केलेला आहे. बांधावरील खत योजना प्रक्रियेत थेट गावात खते मिळत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचतो व खत टंचाईलाही आळा बसतो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सर्व तालुक्यांना उद्दिष्ट्यदेखील दिले आहे. खरीप हंगाम सुरू असताना अद्याप एकाही शेतकरी गटाने मागणी नोंदवायला उत्साह दाखविलेला नाही. याला बऱ्याच प्रमाणात दुष्काळी स्थितीदेखील कारणीभूत आहे. मात्र अशीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांना लाभदायी ठरलेली बांधावर खत योजना गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीचाही परिणामसलग तीन वर्षांपासून नापिकी आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न नाही, शेतकरी आर्थिक कोंडीत अडकला असताना पीक कर्जासाठी बँकांचा असहकार आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे बांधावर खत योजनेवर परिणाम झाला आहे. १० ते १२ मेट्रिक टनाची हवी मागणीवेळेवर खत मिळण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी १५ दिवस अगोदर पुरवठादार संस्थेकडे मागणी नोंदवायला हवी. ही मागणी वाहतुकीच्या सोईने एकाच प्रकारच्या खताची असावीकाय आहे योजना ?कृषी विभागाद्वारा बफर स्टॉकसाठी रासायनिक खत कंपन्यांना पत्र दिले जाते. त्यानुसार कंपन्या जिल्हास्तरावर कृषी विभागाकडे स्टॉक जमा करतात. जिल्ह्यात टंचाई निर्माण झाल्यास किंवा शेतकरी गटाने मागणी नोंदविल्यास कृषी विभाग शेतकऱ्यांना थेट बांधावर खते पोहचवितात. बांधावर खत योजनेसाठी काही गावांतील शेतकरी गटांद्वारा विचारणा करण्यात आली. मात्र डीडीसह मागणी एकाही गटाने अद्याप नोंदविली नाही.- दत्तात्रेय मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.