शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

शेवटच्या शेतकऱ्याला मिळेल का प्रकल्पाचे पाणी?

By admin | Updated: October 10, 2015 00:37 IST

पेयजल, सिंचन आणि नंतर उद्योगाकरिता प्रकल्पाचे पाणी आरक्षित केले जाते. असे असूनही अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना ...

रबी हंगाम : दोन वर्षांपासून सतत पाण्यात कपात, आंदोलनाला तीन वर्षे पूर्णधामणगाव रेल्वे : पेयजल, सिंचन आणि नंतर उद्योगाकरिता प्रकल्पाचे पाणी आरक्षित केले जाते. असे असूनही अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून पासून कपात करण्यात येत आहे़ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी कधी पोहोचणार, असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे़ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी आंदोलन छेडले. यंदा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर लोकशाही पद्धतीने पुन्हा प्रशासनाशी दोन हात केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया धामणगाव तालुक्यातील बोरगाव धांदे, हिरपूर, रायपूर कासारखेडा या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.चांदूररेल्वे या जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रूपयांच्या प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला. ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ या प्रकल्पातून सिंचनाचा सर्वाधिक लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्यांना मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, वरूड या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे. विशेषत: अमरावतीकरांची तहान या पाण्याने भागवावी, असे स्वप्न त्यावेळी पाहिले गेले. मात्र, शेतीसाठी प्रकल्पातून पाणी मिळविण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांवर वेळोवेळी आंदोलने करण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील स्थिती विदारक धामणगाव तालुक्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प, धामणगावअंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव घुसळी वितरिका, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी रबी हंगामात देणे सुरू केले़ त्यावेळी केवळ २३़१८ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले तरी या तालुक्याची स्थिती अत्यंत वेगळी आहे़ अप्परवर्धेतून सोडलेले पाणी तब्बल सहा ते सात दिवसांनंतर शेवटच्या टोकावरील रायपूर, कासारखेड, भातकुली येथील शेतकऱ्यांना मिळते़ या पाण्याची उंची केवळ गुडघ्या इतकी असते़ गहू किंवा हरभऱ्याची पेरणी शेतकरी एकाच वेळी करीत असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही़पाण्याचे महत्त्व कळणार कधी ?आठ वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना अप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी मिळत आहे़ यंदा अप्परवर्धाच्या कालव्यातून रब्बी पिकांकरिता १११ दिवस पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. शेतकरी वेळ असतानाच मागणीपत्र देत नसल्याने पाण्याचा लाभ घेत नाहीत. दरवर्षी पाणी सुटायच्या चार दिवसांपूर्वी मागणीपत्र संबंधित कार्यालयात दिले जाते. त्यामुळे प्रशासनाची नाहक धावपळ होते़ परिसरातील पाटचऱ्यांची साफसफाई केल्यानंतर जलदगतीने पाणी मिळेल, हे ही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व आताच कळले नाही तर अप्परवर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरण्याऐवजी केवळ पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठरेल, हे निश्चित. दोन वर्षांपासून सिंचनाच्या पाण्यात कपातअप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी मागील दोन वर्षांपूर्वी ३२७़२़९६ दलघमी इतके सोडण्यात येत होते़ त्यामुळे धामणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी सिंचनासाठी मिळत होते. परंतु आता या पाण्यात कपात करण्यात आली आहे़ २०२़़२०३ दशलक्ष घनमीटर पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे़ त्यामुळे तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्रपाळीत पाणी घ्यावे लागणार आहे़