शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या शेतकऱ्याला मिळेल का प्रकल्पाचे पाणी?

By admin | Updated: October 10, 2015 00:37 IST

पेयजल, सिंचन आणि नंतर उद्योगाकरिता प्रकल्पाचे पाणी आरक्षित केले जाते. असे असूनही अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना ...

रबी हंगाम : दोन वर्षांपासून सतत पाण्यात कपात, आंदोलनाला तीन वर्षे पूर्णधामणगाव रेल्वे : पेयजल, सिंचन आणि नंतर उद्योगाकरिता प्रकल्पाचे पाणी आरक्षित केले जाते. असे असूनही अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून पासून कपात करण्यात येत आहे़ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी कधी पोहोचणार, असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे़ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी आंदोलन छेडले. यंदा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर लोकशाही पद्धतीने पुन्हा प्रशासनाशी दोन हात केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया धामणगाव तालुक्यातील बोरगाव धांदे, हिरपूर, रायपूर कासारखेडा या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.चांदूररेल्वे या जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रूपयांच्या प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला. ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ या प्रकल्पातून सिंचनाचा सर्वाधिक लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्यांना मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, वरूड या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे. विशेषत: अमरावतीकरांची तहान या पाण्याने भागवावी, असे स्वप्न त्यावेळी पाहिले गेले. मात्र, शेतीसाठी प्रकल्पातून पाणी मिळविण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांवर वेळोवेळी आंदोलने करण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील स्थिती विदारक धामणगाव तालुक्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प, धामणगावअंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव घुसळी वितरिका, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी रबी हंगामात देणे सुरू केले़ त्यावेळी केवळ २३़१८ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले तरी या तालुक्याची स्थिती अत्यंत वेगळी आहे़ अप्परवर्धेतून सोडलेले पाणी तब्बल सहा ते सात दिवसांनंतर शेवटच्या टोकावरील रायपूर, कासारखेड, भातकुली येथील शेतकऱ्यांना मिळते़ या पाण्याची उंची केवळ गुडघ्या इतकी असते़ गहू किंवा हरभऱ्याची पेरणी शेतकरी एकाच वेळी करीत असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही़पाण्याचे महत्त्व कळणार कधी ?आठ वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना अप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी मिळत आहे़ यंदा अप्परवर्धाच्या कालव्यातून रब्बी पिकांकरिता १११ दिवस पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. शेतकरी वेळ असतानाच मागणीपत्र देत नसल्याने पाण्याचा लाभ घेत नाहीत. दरवर्षी पाणी सुटायच्या चार दिवसांपूर्वी मागणीपत्र संबंधित कार्यालयात दिले जाते. त्यामुळे प्रशासनाची नाहक धावपळ होते़ परिसरातील पाटचऱ्यांची साफसफाई केल्यानंतर जलदगतीने पाणी मिळेल, हे ही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व आताच कळले नाही तर अप्परवर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरण्याऐवजी केवळ पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठरेल, हे निश्चित. दोन वर्षांपासून सिंचनाच्या पाण्यात कपातअप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी मागील दोन वर्षांपूर्वी ३२७़२़९६ दलघमी इतके सोडण्यात येत होते़ त्यामुळे धामणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी सिंचनासाठी मिळत होते. परंतु आता या पाण्यात कपात करण्यात आली आहे़ २०२़़२०३ दशलक्ष घनमीटर पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे़ त्यामुळे तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्रपाळीत पाणी घ्यावे लागणार आहे़