शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पांढरे सोने मातीमोल

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

खरिपाचे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. प्रत्यक्षात बाजारात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर ४०५० रुपये या हमीभावाच्यावर दर पोहोचलेच नाही.

अमरावती : खरिपाचे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. प्रत्यक्षात बाजारात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर ४०५० रुपये या हमीभावाच्यावर दर पोहोचलेच नाही. या आठवड्यात कापसाचे भाव पाडण्यात आले. ग्रामीण भागात ३५०० ते ३८०० रुपये भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. मंगळवारी अमरावती बाजार, समितीमध्ये कापूस ३८०० रुपयांनी विकला गेला. केवळ सीसीआयचे व पणन महासंघाचे सात खरेदी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत असताना शासन गपगार आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. सोयाबीननंतर हे सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे. खरीप हंगामात सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार कापसावर होती. लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव व जमिनीत कमी झालेली आर्द्रता यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. जिरायती क्षेत्रात २ ते ३ क्विंटल व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतात ५ ते ६ क्विंटल असे उत्पादन होत आहे. कपाशीचे महागडे बियाणे, खते, फवारणी, निंदण, मशागत, वखरणी, ५ ते ६ रुपये किलोप्रमाणे वेचाई व वाहतूक खर्च असा एकूण एकरी २० ते २५ हजारांचा खर्च होत असताना उत्पन्न मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेच आहे. जिल्ह्यात साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून कापसाची वेचाई सुरू झाली. भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांची कापसाची साठवणूक केली. प्रत्यक्षात यंदा कापसाचे भाव ४०५० रुपये या हमीभावापेक्षा कधी चढलेच नाही. मंगळवाररी बाजार समितीत ३८०० रुपये भावाने कापूस विक्री, तर खासगीत ३५०० ते ३६०० रुपयांनी कापसाची खरेदी झाली.