शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पांढरे सोने मातीमोल

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

खरिपाचे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. प्रत्यक्षात बाजारात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर ४०५० रुपये या हमीभावाच्यावर दर पोहोचलेच नाही.

अमरावती : खरिपाचे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. प्रत्यक्षात बाजारात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर ४०५० रुपये या हमीभावाच्यावर दर पोहोचलेच नाही. या आठवड्यात कापसाचे भाव पाडण्यात आले. ग्रामीण भागात ३५०० ते ३८०० रुपये भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. मंगळवारी अमरावती बाजार, समितीमध्ये कापूस ३८०० रुपयांनी विकला गेला. केवळ सीसीआयचे व पणन महासंघाचे सात खरेदी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत असताना शासन गपगार आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. सोयाबीननंतर हे सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे. खरीप हंगामात सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार कापसावर होती. लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव व जमिनीत कमी झालेली आर्द्रता यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. जिरायती क्षेत्रात २ ते ३ क्विंटल व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतात ५ ते ६ क्विंटल असे उत्पादन होत आहे. कपाशीचे महागडे बियाणे, खते, फवारणी, निंदण, मशागत, वखरणी, ५ ते ६ रुपये किलोप्रमाणे वेचाई व वाहतूक खर्च असा एकूण एकरी २० ते २५ हजारांचा खर्च होत असताना उत्पन्न मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेच आहे. जिल्ह्यात साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून कापसाची वेचाई सुरू झाली. भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांची कापसाची साठवणूक केली. प्रत्यक्षात यंदा कापसाचे भाव ४०५० रुपये या हमीभावापेक्षा कधी चढलेच नाही. मंगळवाररी बाजार समितीत ३८०० रुपये भावाने कापूस विक्री, तर खासगीत ३५०० ते ३६०० रुपयांनी कापसाची खरेदी झाली.