शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

१५० वर्गखोल्या पाडणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:24 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या १ हजार ६६० शाळांमधील २५० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० वर्गखोल्यांचे आतापर्यंत निर्लेखन करण्यात आले असले तरी उर्वरित वर्गखोल्यांचे निर्लेखन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देचिमुकले धोक्यात : बांधकाम विभागाच्या निर्लेखन आदेशानंतरही अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या १ हजार ६६० शाळांमधील २५० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० वर्गखोल्यांचे आतापर्यंत निर्लेखन करण्यात आले असले तरी उर्वरित वर्गखोल्यांचे निर्लेखन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २५० वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा मोडकळीस आल्या आहेत. शिकस्त वर्गखोल्यांची परिस्थिती ही दोन ते तीन वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. यामध्ये सन २०१६- २०१७ ते अद्यापर्यतच्या जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व शाळा व्यवस्थापन समित्यांच्या मध्यमातून गेले आहेत. काही शाळांमध्ये वर्गखोल्या शिकस्त असल्याने एकाच वर्गात दोन वर्ग भरविले जातात.विशेष म्हणजे, सन २०१८ ते २०२० या वर्षात शिक्षण विभागाकडे नवीन वर्गखोल्याचे बांधकाम, शाळा दुरुस्ती, संरक्षण भिंत, शौचालय बांधकाम आदी कामांसाठी प्रस्ताव आले आहेत. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडे प्रस्तावित कामांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त वर्गखोल्या व इमारतीच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ते सोडून शाळांना संरक्षणभिंत, पेव्हर यांसारख्या कामांचा आग्रहसुद्धा शाळा दुरुस्तीचे कामात अडचणीची बाब ठरत आहे.शाळांमध्ये वर्गखोल्या किंवा इतर कामे यामधील निकडीची कामे करणे आवश्यक आहे. परंतु, असे होत नसल्याने शिकस्त वर्गखोल्याचा मुद्दा निकाली काढणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, ज्या शाळांमध्ये १० वर्गखोल्या आहेत आणि पंधरा पटसंख्या आहे, अशा ठिकाणच्या चार खोल्या निर्लेखित केल्या आणि एकाच वर्गात दोन वर्ग भरले जातात, अशा ठिकाणी अनावश्यक वर्गखोल्याची बांधकामाची मागणीही अधिक असल्याचे सुत्रांनी सांगितले.धोकादायक वर्गखोल्यांचा तिढा सोडविण्यासाठी निकडीची कामेच प्राधान्याने घेतल्यास हा प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देशजिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ पंचायत समित्यांमधील जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त व धोकादायक असलेल्या इमारती, वर्गखोल्या आदीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना त्रिसदस्यीय समितीकडून नव्याने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती जयंत देशमुख यांनी मंगळवारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांना दिले आहेत. जिल्हाभरातील धोकादायक असलेल्या वर्गखोल्या, इमारती व शाळांमधील अन्य निकडीची कामे याबाबत सर्व पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी, संबंधित केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक अशा त्रिस्तरीय समितीने शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन वास्तवदर्शी अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.निर्लेखनास पात्र वर्गखोल्याची संख्याजिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक ठरत असलेल्या वर्गखोल्यांची संख्या २५० एवढी आहे. यामध्ये १४ तालुक्यांतील शाळांचा समावेश असून, तालुकानिहाय निर्लेखनास पात्र असलेल्या वर्गखोल्या चिखलदरा २१, नांदगाव खंडेश्वर ३१, भातकुली १८,मोर्शी १९, धामणगाव रेल्वे १२, चांदूर बाजार २९, तिवसा ७, दर्यापूर २४, धारणी १८, अमरावती २२, अचलपूर १३, अंजनगाव सुर्जी १५, वरूड २१ याप्रमाणे आहेत. यापैकी १०० खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले आहे.शिक्षण विभागाकडे ग्रामीण भागातील शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखन करण्याच्या प्रस्तावास बांधकाम विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार कारवाई केली जात आहे. धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांची तपासणी, स्ट्रक्चरल आॅडिट यासह इत्थंभूत माहितीचा अहवाल मागविला आहे.- जयंत देशमुखसभापती, जि.प. शिक्षण