शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नरबळीच्या घटनेमागे 'कौल' कुणाचा ?

By admin | Updated: August 23, 2016 00:48 IST

नरबळीचा जो गुन्हा पिंपळखुट्याच्या शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात घडला, त्या गुन्ह््यामागे

अमरावती : नरबळीचा जो गुन्हा पिंपळखुट्याच्या शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात घडला, त्या गुन्ह््यामागे मांत्रिकाकडून मिळालेला कौल, हे प्रमुख कारण असू शकते. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केल्यास या प्रकरणाची पाळेमुळे खणली जाऊ शकतात. सन १९७४ मध्ये मराठवाड्यातील मानवथ या गावी घडलेल्या नरबळी प्रकरणाचा अभ्यास केल्यास 'नरबळी' या विषयाने झपाटलेल्या गुन्हेगारांच्या मानसिकतेची अनेक पदरे लक्षात येऊ शकतात. या प्रकरणात तब्बल १० नरबळी देण्यात आले होते. यामध्ये १० वर्षांच्या पाच मुली, एक वर्षाचे बाळ आणि तिशीतील चार महिलांचा समावेश होता. नवऱ्याला श्रीमंत होण्यासाठी आणि त्याच्या पत्नीला मूलप्राप्तीसाठी देवाच्या कौलावरून हे नरबळी देण्यात आले होते. गावातील पिंपळाच्या झाडावर राहणाऱ्या मुंजाबाला ते अर्पण करण्यात आले होते. निरागस मुलींचे खासगी भाग कापून त्यातील रक्त मुंजाबाला अर्पण करण्यात आलेल्या नैवेद्यावर शिंपडले ेगेले होते. अत्यंत क्रूर पद्धतीच्या या नरबळी प्रकरणावर अमोल पालेकर यांनी 'आक्रीत' नावाचा मराठी चित्रपटही काढला आहे. त्यावेळी गाजलेल्या या प्रकरणात देवाने दिलेला कौल महत्त्वाचा होता. हा कौल मिळाल्यानंतरच इतका क्रूर गुन्हा घडला होता. कौल मिळाल्याशिवाय नरबळीच्या घटना घडत नाहीत, असे पुरावे उपलब्ध आहेत. कौल म्हणजे काय? ज्यांचा कर्मयोगावर विश्वास नसतो, आत्मविश्वास ज्यांनी गमावलेला असतो, अशी मंडळी त्यांना हवी असलेली भौतिक इप्सिते जसे- धन, गुप्तधन, अपत्ये, उच्चपद, पौरुषत्त्व आदी साधण्यासाठी अघोरी विद्येचा मार्ग स्वीकारला. या अघोरी विद्येत कुण्या एका देवाला खूश करण्यासाठी बळी द्यावा लागतो. हा बळी नेमका कसा हवा, हे देवाने दिलेला कौल हेरून कळते. यासाठी आवश्यक ती पूजा वा विधीची व्यवस्था मांत्रिक करतो. अर्थात् नरबळी देणारा आणि ज्याला नरबळी हवा त्या देवाच्या मधील दुवा हा मांत्रिक असतो. या मांत्रिकाशिवाय बळीची पूजा पूर्णत्वास जात नाही, अशी मान्यता आहे. पाटाचा कौल गोलाकार बुड असलेला गडू गव्हाच्या दाण्यांवर ठेवला जातो. गडूवर पाट ठेवला जातो. त्यावर मुलगा किंवा माणूस बसविला जातो. तो हातांच्या वजनावर बसतो. पाट हलला की कौल मिळाला, असे अंधश्रद्धाळू मानतात. पापी असल्यास पाट हलणार नाही, हे बसणाऱ्याला आधीच सांगितले जाते. अर्थात् तोदेखील अंधश्रद्धाळू असतो. पाटावर कुणी बसले की देवाला नाना प्रश्न विचारले जातात. बळी कुणाचा हवा? बकऱ्याचा की माणसाचा? मुलाचा की मुलीचा? कुमारिकेचा की विवाहितेचा? रक्त कुठले हवे? गळ्यातील की खासगी भागातील? प्रश्नांची सरबत्ती सुरूच असते. चिडून चिडून मांत्रिक प्रश्न विचारत असतो. कुठल्यातरी एका प्रश्नाला पाट फिरतो. आणि देवाने कौल दिल्याचे मानून तसा बळी देण्याची तयारी सुरू होते. तो दिलाही जातो. पाटामागे विज्ञान फिरणाऱ्या पाटामागे देवाची इच्छा नसून विज्ञान असते. बराच वेळ हाताच्या भारावर बसलेल्या मुलाच्या हाता-पायात मुंग्या आलेल्या असतात. प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. पाप-पुण्याशी संबंध लावला जातो. तो कधीतरी किंचित हलतो. तो हलला की बिनबुडाचा गडू फिरतो. गडुवर ठेवलेला पाटही फिरतो. हे सारे वक्राकार गतीच्या नियमानुसार घडत असते. परंतु अंधश्रद्धाळू यालाच कौल मानून नरबळी देतात. कौल मिळविण्याचे याशिवाय आणखी वेगवेगळे प्रकार आहेत. प्रांतानुसार हे प्रकार बदलतात. मानवत प्रकरणातही कौल देणारा देव आणि कौल मिळवून देणारा मांत्रिक होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासंबंधी केलेल्या प्रदीर्घ अभ्यासाचाही निष्कर्ष हाच निघतो. नरबळीच्या घटनांचा उपलब्ध तपशील तपासल्यास ही तत्थ्ये समोर येतात. पिंपळखुट्याच्या घटनेतही कौल मिळवून देणारा मांत्रिक असेलच. त्याच्या इशाऱ्यावरून सुरेंद्रने हा गुन्हा केला असणार. मात्र तो दडलेला आहे. तो मांत्रिक शोधून काढणे आवश्यक आहे. तो कुठेही असू शकतो - आश्रम परिसरात, आश्रमाबाहेर वा राज्याबाहेर. तो जेरबंद न झाल्यास सुरेंद्रची जागा आणखी दुसरा कुणी घेईल. प्रथमेश, अजयच्या जागी तिसऱ्या कुणा निरागस मुलाच्या गळ्यावरून ब्लेड फिरेल.