शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नरबळीच्या घटनेमागे 'कौल' कुणाचा ?

By admin | Updated: August 23, 2016 00:48 IST

नरबळीचा जो गुन्हा पिंपळखुट्याच्या शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात घडला, त्या गुन्ह््यामागे

अमरावती : नरबळीचा जो गुन्हा पिंपळखुट्याच्या शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात घडला, त्या गुन्ह््यामागे मांत्रिकाकडून मिळालेला कौल, हे प्रमुख कारण असू शकते. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केल्यास या प्रकरणाची पाळेमुळे खणली जाऊ शकतात. सन १९७४ मध्ये मराठवाड्यातील मानवथ या गावी घडलेल्या नरबळी प्रकरणाचा अभ्यास केल्यास 'नरबळी' या विषयाने झपाटलेल्या गुन्हेगारांच्या मानसिकतेची अनेक पदरे लक्षात येऊ शकतात. या प्रकरणात तब्बल १० नरबळी देण्यात आले होते. यामध्ये १० वर्षांच्या पाच मुली, एक वर्षाचे बाळ आणि तिशीतील चार महिलांचा समावेश होता. नवऱ्याला श्रीमंत होण्यासाठी आणि त्याच्या पत्नीला मूलप्राप्तीसाठी देवाच्या कौलावरून हे नरबळी देण्यात आले होते. गावातील पिंपळाच्या झाडावर राहणाऱ्या मुंजाबाला ते अर्पण करण्यात आले होते. निरागस मुलींचे खासगी भाग कापून त्यातील रक्त मुंजाबाला अर्पण करण्यात आलेल्या नैवेद्यावर शिंपडले ेगेले होते. अत्यंत क्रूर पद्धतीच्या या नरबळी प्रकरणावर अमोल पालेकर यांनी 'आक्रीत' नावाचा मराठी चित्रपटही काढला आहे. त्यावेळी गाजलेल्या या प्रकरणात देवाने दिलेला कौल महत्त्वाचा होता. हा कौल मिळाल्यानंतरच इतका क्रूर गुन्हा घडला होता. कौल मिळाल्याशिवाय नरबळीच्या घटना घडत नाहीत, असे पुरावे उपलब्ध आहेत. कौल म्हणजे काय? ज्यांचा कर्मयोगावर विश्वास नसतो, आत्मविश्वास ज्यांनी गमावलेला असतो, अशी मंडळी त्यांना हवी असलेली भौतिक इप्सिते जसे- धन, गुप्तधन, अपत्ये, उच्चपद, पौरुषत्त्व आदी साधण्यासाठी अघोरी विद्येचा मार्ग स्वीकारला. या अघोरी विद्येत कुण्या एका देवाला खूश करण्यासाठी बळी द्यावा लागतो. हा बळी नेमका कसा हवा, हे देवाने दिलेला कौल हेरून कळते. यासाठी आवश्यक ती पूजा वा विधीची व्यवस्था मांत्रिक करतो. अर्थात् नरबळी देणारा आणि ज्याला नरबळी हवा त्या देवाच्या मधील दुवा हा मांत्रिक असतो. या मांत्रिकाशिवाय बळीची पूजा पूर्णत्वास जात नाही, अशी मान्यता आहे. पाटाचा कौल गोलाकार बुड असलेला गडू गव्हाच्या दाण्यांवर ठेवला जातो. गडूवर पाट ठेवला जातो. त्यावर मुलगा किंवा माणूस बसविला जातो. तो हातांच्या वजनावर बसतो. पाट हलला की कौल मिळाला, असे अंधश्रद्धाळू मानतात. पापी असल्यास पाट हलणार नाही, हे बसणाऱ्याला आधीच सांगितले जाते. अर्थात् तोदेखील अंधश्रद्धाळू असतो. पाटावर कुणी बसले की देवाला नाना प्रश्न विचारले जातात. बळी कुणाचा हवा? बकऱ्याचा की माणसाचा? मुलाचा की मुलीचा? कुमारिकेचा की विवाहितेचा? रक्त कुठले हवे? गळ्यातील की खासगी भागातील? प्रश्नांची सरबत्ती सुरूच असते. चिडून चिडून मांत्रिक प्रश्न विचारत असतो. कुठल्यातरी एका प्रश्नाला पाट फिरतो. आणि देवाने कौल दिल्याचे मानून तसा बळी देण्याची तयारी सुरू होते. तो दिलाही जातो. पाटामागे विज्ञान फिरणाऱ्या पाटामागे देवाची इच्छा नसून विज्ञान असते. बराच वेळ हाताच्या भारावर बसलेल्या मुलाच्या हाता-पायात मुंग्या आलेल्या असतात. प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. पाप-पुण्याशी संबंध लावला जातो. तो कधीतरी किंचित हलतो. तो हलला की बिनबुडाचा गडू फिरतो. गडुवर ठेवलेला पाटही फिरतो. हे सारे वक्राकार गतीच्या नियमानुसार घडत असते. परंतु अंधश्रद्धाळू यालाच कौल मानून नरबळी देतात. कौल मिळविण्याचे याशिवाय आणखी वेगवेगळे प्रकार आहेत. प्रांतानुसार हे प्रकार बदलतात. मानवत प्रकरणातही कौल देणारा देव आणि कौल मिळवून देणारा मांत्रिक होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासंबंधी केलेल्या प्रदीर्घ अभ्यासाचाही निष्कर्ष हाच निघतो. नरबळीच्या घटनांचा उपलब्ध तपशील तपासल्यास ही तत्थ्ये समोर येतात. पिंपळखुट्याच्या घटनेतही कौल मिळवून देणारा मांत्रिक असेलच. त्याच्या इशाऱ्यावरून सुरेंद्रने हा गुन्हा केला असणार. मात्र तो दडलेला आहे. तो मांत्रिक शोधून काढणे आवश्यक आहे. तो कुठेही असू शकतो - आश्रम परिसरात, आश्रमाबाहेर वा राज्याबाहेर. तो जेरबंद न झाल्यास सुरेंद्रची जागा आणखी दुसरा कुणी घेईल. प्रथमेश, अजयच्या जागी तिसऱ्या कुणा निरागस मुलाच्या गळ्यावरून ब्लेड फिरेल.