शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

लोकप्रतिनिधींचे हेच का कर्तव्य?

By admin | Updated: August 23, 2015 00:27 IST

अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही.

गुंडांचा व्हावा सफाया : अचलपुरात रात्री १० वाजतानंतर शुकशुकाटअमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याने शहर रात्री १० वाजतानंतर सामसूम होत आहे. धागेदोरे कुठपर्यंत?अमरावती/अचलपूर : रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची हत्या ११ आॅगस्ट रोजी केल्यानंतर तालुका हादरला होता. खुनाला कारणीभूत असलेल्या बारूद गँगचा सफाया आता तरी व्हावा, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. 'लोकमत'ने प्रकरण रेटून धरल्यावर आरोपींचे अटकसत्र सुरू झाले. तथापि, पोलीस खाते, महसूल खाते आणि राजकीय मंडळी या गुंडांचा आपापल्या सोयीनुसार वापर करवून घेत असल्यामुळे लोकभावनेचा हवा तसा आदर करण्यात आला नाही. रेती तस्करांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास त्यांचे धागे कुण्या बड्या लोकप्रतिनिधीपर्यंत जुळलेले आहेत, हे उघड होईल. कासदपुरा, देवडी, गांधी पूल, चावलमंडी, उपजिल्हा रुग्णालयाजवळील दुकाने एरवी रात्री १२ वाजेपर्यंत उघडी रहात असे. कासदपुऱ्यातील चहापानाची दुकाने रात्री ३ वाजेपर्यंत उघडी रहात होती. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत कासदपुरा गजबजलेला असायचा. आता चित्र बदलले आहे. (प्रतिनिधी)खासदार अडसूळ यांना आम्ही हत्याकांडाची सर्व माहिती दिली आहे. ते दिल्लीला संसदेत अधिवेशनात व्यस्त आहेत. ते पुढील आठवड्यात बटाऊवाले यांच्या घरी भेट देणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ते याची माहिती वेळोवेळी मागवत आहेत.- विनय चतूर, शिवसेना शहर प्रमुखपालकमंत्री पोटे येथे प्रत्यक्ष आले नसले तरी आम्ही या हत्याकांडाची माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आहे.- अभय माथने, स्थानिक भाजपा नेते.गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जात आणि धर्म नसतो. त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देण्यात अर्थ नाही. मात्र अमितच्या हत्या करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे. या हत्येस महसूल विभागाचे काही अधिकारीही कारणीभूत आहे. त्यांचेवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. जनतेने संयम पाळावा.- बाळासाहेब वानखडे, नगरसेवक.यात्रा उत्साहात, शांतता कायमनागपंचमीनिमित्त शुक्रवारी सरायपुऱ्यातील श्रीकृष्ण पुलावर भरलेली यात्रा शांततेत व उत्साहात पार पडली. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, असे पोलीस उपनिरीक्षक अजय आखरे यांनी सांगितले.पालकमंत्र्यांची भेट नाहीहत्याकांडाची घटना होऊन १० दिवस उलटून गेलेत. लोकांच्या मनात अमितविषयी हळहळ जाणवतेच आहे. बिहारात शोभावे याप्रमाणे गुंडांनी भरदिवसा एका तरुणाला मारून टाकले. प्रशासनाचा कुठलाही धाक नसल्याचाच तो पुरावा होता. रयतेची अशी दशा होते नि शासनाला विचारपूसही करावीशी वाटत नाही. हीच का लोकशाही? हेच का पालकत्त्व? हेच का शासन, असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. ना. प्रवीण पोटे आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी बटाऊवाले यांच्याकडे अद्यापही भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदारांनी बटाऊवाले यांच्या घरी भेट दिली होती.