शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

नदी काठावरील गावे ३६ वर्षांपासून उपेक्षित

By admin | Updated: October 17, 2015 00:10 IST

तालुक्यातील नदी काठावरील गावे मागील ३६ वर्षांपासून उपेक्षित असून येथील ग्रामस्थ नशिबाला दोष देत जीवन जगत आहेत.

शासनाने राबवाव्यात कायमस्वरूपी उपाययोजना : दररोज असुरक्षिततेत काढतात दिवसधामणगाव रेल्वे : तालुक्यातील नदी काठावरील गावे मागील ३६ वर्षांपासून उपेक्षित असून येथील ग्रामस्थ नशिबाला दोष देत जीवन जगत आहेत.लालफितशाहीच्या चक्रव्युहात अडकलेल्या या गावांमध्ये विकासाची पहाट कधी उजाडणार, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. इतर धरणग्रस्त गावांना मदत, तर मग आम्हीच वाऱ्यावर का, हा सवाल या गावातील अन्यायग्रस्तांनी केला आहे़सन १९७९ मध्ये महापूर आला होता़ यामुळे उद्ध्वस्त झालेल्या तालुक्यातील चार गावांचे पुनर्वसन झाले होते़या गावातील ग्रामस्थ अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. पुराचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज, बोरगाव-धांदे, बोरगाव निस्ताने, विटाळा या चार गावांना बसला होता. वर्धा व चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे ही गावे उद्ध्वस्त झाली होती़ त्यात चार जणांचा मृत्यू व कोट्यवधी रूपयांची हानी झाली होती. तत्कालीन पुनर्वसनमंत्री शरद पवार यांनी १९८३ मध्ये या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती़ तद्नंतर या चारही गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ परंतु मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत.तालुक्यातून वर्धा, चंद्रभागा, खोलाड, विदर्भ, मोती कोळसा, अशा नद्या तर कोल्हा, बेडकी यांसह ३२ मोठे नाले वाहतात़ या नाल्यांच्या काठी ग्रामस्थांचे वास्तव्य आहे़ निंभोरा राज, दत्तापूर, कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, भातकुली बोरगाव धांदे, विटाळा यांना गावांना पुराचा फटका बसतो.प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मग्नधामणगाव तालुक्यातील निंभोरा राज हे पूरग्रस्त पुनर्वसित गाव विकासापासून कोसो दूर आहे़ येथे रस्ते नाल्या नाहीत. बाजार ओटेदेखील नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही़ दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ रात्र काढतात. चंद्रभागा नदीला रात्री पूर आल्यास कधीही पुराचे पाणी घरात शिरून धान्य ओले होऊन दुसऱ्या दिवशी दोन वेळचे अन्नही या पुनर्वसिताना मिळत नाही़ दरवर्षी शेतजमीन खरडून जाते. शासनदरबारी हेलपाटे घेऊनही योग्य तो मोबदला मिळत नाही़ सार्वजनिक भवन, व्यापारी संकु ल या गावात नाही़ शाळेला संरक्षण भिंत नाही. ग्रामपंचायत भवनाची इमारत कधी तयार होणार, असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामपंचायतीने वारंवार विकासासंदर्भात ठराव घेऊन ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सादर केलेत. परंतु कागदीघोडे नाचविण्याखेरीज अन्य कोणताही विकासाचा पर्याय काढला जात नाही़ हीच अवस्था इतर पूरग्रस्त पुनर्वसितांची झाली आहे़१६ बाय ९० चौरस फुटांच्या घरात संसारपूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ जून १९८७ साली सोळा बाय नव्वद चौरस फूट आकारातील घराचे बांधकाम करण्याकरिता तर शेतमजुरांना ३० बाय ९० स्केअर फूट प्लॉट देण्यात आले़ आज या गावातील ग्रामस्थांसाठी केवळ निवासाची व्यवस्था आहे़ परंतु शासनाने त्यावेळी कबूल केल्याप्रमाणे १७ नागरी सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. या पुनर्वसित वस्त्यांमध्ये नागरी सुविधा पुरविल्या गेल्या असत्या तर या गावांचा चेहरा-मोहरा बदलला असता़ परंतु लालफितशाहीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी या पुनर्वसित वस्त्यांमधील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या सुविधा या गावांमध्ये मिळालेल्या नाहीत. धामणगाव तालुक्यात वर्धा, चंद्रभागा, खोलाड, विदर्भ, मोती कोळसा या नद्या तर कोल्हा, बेडकी यांसह ३२ मोठे नाले आहेत़ निंभोरा राज, दत्तापूर, कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, भातकुली, बोरगाव धांदे, विटाळा तसेच वर्धा नदीच्या काठावरील गावे अस्त्विाची लढाई लढत आहेत. दरवर्षी नुकसानीचे प्रमाण अधिक व मदत अल्पच मिळत असल्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाविरूध्द नाराजी व्यक्त केली आहे़ आता नव्या शासनाकडून तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे़ आतापर्यंत न्याय न मिळाल्याने येथील नागरिक कसेबसे जीवन जगत आहेत. आता मात्र, मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा आहे. - सुधाकर पांडे, सरपंच, निंभोरा राज.