शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

टंकलेखनासाठी सवलत, कॉम्प्युटर कोर्ससाठी मात्र ठेंगा!

By admin | Updated: June 25, 2015 00:11 IST

राज्यात एसटी परिवहन महामंडळाचे ‘अच्छे दिन’ येण्याची आशा मावळली आहे. एसटी महामंडळाद्वारे सध्याच्या संगणक युगात ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना शहरात ....

अजब धोरण : राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक फटकानरेंद्र जावरे अमरावतीराज्यात एसटी परिवहन महामंडळाचे ‘अच्छे दिन’ येण्याची आशा मावळली आहे. एसटी महामंडळाद्वारे सध्याच्या संगणक युगात ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना शहरात फक्त टायपिंग वर्गासाठी सवलत पास दिली जात असून संगणक प्रशिक्षणार्थ्यांना मात्र ठेंगा दाखविला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.परिवहन महामंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी सवलतीची प्रवास पास दिली जाते. या पाससाठी सदर विद्यार्थी शहरी भागात किंवा विशिष्ट शाळेत शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र (बोनाफाईड) शाळा देते. तर मुलींसाठी मानव विकास संसाधन योजनेंतर्गत पूर्णत: मोफत प्रवास ाची सोय उपलब्ध आहे. राज्यभरातील ग्रामीणवजा आदिवासी भागात दहावी किंवा बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये मोजक्याच ठिकाणी आहेत. या विद्यार्थ्यांना शहरी भागात किंवा नजीकच्या गावात शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. त्यासाठी त्यांना महामंडळाकडून सवलतदराची पास दिली जाते. राज्यभरातील लाखो विद्यार्थी या योजनेचा फायदा घेतात. मात्र, ही सवलत केवळ टायपिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू करण्यात आल्याने इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. संगणक प्रशिक्षणार्थ्यांनाही ही पास दिली जात नाही. हा तर संगणक प्रशिक्षणार्थ्यांवर अन्यायशालेय शिक्षणाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी टार्यपिंग प्रशिक्षणाकरिता सुध्दा ‘एसटी’ प्रवासात सवलत दिली जाते. पूर्वी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी टायपिंग वर्गासाठी शहरी भागात येत असत. परंतु अलीकडे टायपिंग प्रशिक्षण कालबाह्य होत आहे. तर दुसरीकडे संगणकीय प्रशिक्षण शासनानेही अनिवार्य केले आहे. आता विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल संगणक प्रशिक्षणाकडे आहे. मात्र, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या एसटी बसमध्ये संगणक प्रशिक्षणार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासदरात सवलत न देता डबल घंटी मारली आहे. परिणामी राज्यभरातील लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टायपिंगसाठी सवलतीची प्रवास पास देणाऱ्या शासनाने संगणक प्रशिक्षणार्थ्यांवरील अन्याय दूर करावा. अपडेट महामंडळराज्य परिवहन महामंडळ संगणकीय युगात अपडेट करण्याचा प्रयत्न परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते करीत आहेत. बसमध्ये वाय-फाय सेवा मिळणार आहे. तिकिटाचे पंचिंग मशीन केव्हाचेच भंगारात गेले. नवे संगणकीय तिकीट यंत्र आले. मात्र, भंगार बसगाड्याच प्रवाशांंच्या नशिबात आहेत. चालक-वाहक मात्र मोबाईलमुळे अपटेड झाले. तपासणी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा क्रमांक तत्काळ मिळत असल्याने चोरी पकडणे कठीण झाल्याचे वास्तव आहे.